शहरं
Join us  
Trending Stories
1
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; 9 प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानाला नेमकं काय घडलं?
2
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
3
टाटा-महिंद्राच्या कंपनीचे शेअर आपटले! पण अदानींचा 'हा' स्टॉक ठरला टॉप गेनर; IT क्षेत्राला सर्वाधिक फटका
4
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
5
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
6
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
7
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
8
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
9
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
10
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
11
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
12
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
13
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
14
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
15
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
16
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
17
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
18
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
19
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
20
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र

रब्बी हंगाम स्थिरावला, यवतमाळ-बुलडाण्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 18:54 IST

यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती : विभागात यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती विभागात यंदाच्या रब्बी हंगामात ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टरवर पेरणाचा अंदाज होता. त्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ५ लाख ३९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यंदा डिसेंबरपासून थंडी असल्याने गव्हाची पेरणी यंदा लवकर आटोपली. खरिपात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झाल्याने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पाण्याची पातळी आॅक्टोबर महिन्यातच दोन मीटरपेक्षा खोल गेल्याने सिंचनक्षमतांना मर्यादा आल्या आहेत. विहिरीतील पाण्याचीदेखील कमी झाली. त्याच्या परिणामी अमरावती, अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा पेरणी कमी झाली. यामुळे जिल्ह्यातील सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. अकोला जिल्ह्यात २९ हजार ८०० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३२ हजार ६०० हेक्टर, तर अमरावती जिल्ह्यात ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नापेर आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत  बुलडाणा जिल्ह्यात २३ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात २६ हजार १०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झाली आहे.

सध्या बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ३९ हजार ८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६३ हजार २०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख ४ हजार २०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७४ हजार ४००, वाशिम जिल्ह्यात ९२ हजार ६०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६० हजार हेक्टरमध्ये, अमरावती जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ३७ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात ७८ हजार सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ४ हजार क्षेत्रात पेरणी झाली आहे.

हरभ-याचे ४.२३ लाख हेक्टर क्षेत्र- यंदाच्या रबीमध्ये हरभ-यासाठी ३ लाख ४२ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ४ लाख २३ हजार ७०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी १२४ आहे. गव्हासाठी १ लाख ८० हजार ७०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ९५ हजार ५०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी ५५ आहे. जवस, तीळ व तेलबियाचे क्षेत्र यंदा निरंक राहिले आहे. रबी ज्वार ८० टक्के, तर करडईचे १४ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळAmravatiअमरावती