शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगाम स्थिरावला, यवतमाळ-बुलडाण्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 18:54 IST

यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती : विभागात यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती विभागात यंदाच्या रब्बी हंगामात ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टरवर पेरणाचा अंदाज होता. त्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ५ लाख ३९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यंदा डिसेंबरपासून थंडी असल्याने गव्हाची पेरणी यंदा लवकर आटोपली. खरिपात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झाल्याने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पाण्याची पातळी आॅक्टोबर महिन्यातच दोन मीटरपेक्षा खोल गेल्याने सिंचनक्षमतांना मर्यादा आल्या आहेत. विहिरीतील पाण्याचीदेखील कमी झाली. त्याच्या परिणामी अमरावती, अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा पेरणी कमी झाली. यामुळे जिल्ह्यातील सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. अकोला जिल्ह्यात २९ हजार ८०० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३२ हजार ६०० हेक्टर, तर अमरावती जिल्ह्यात ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नापेर आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत  बुलडाणा जिल्ह्यात २३ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात २६ हजार १०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झाली आहे.

सध्या बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ३९ हजार ८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६३ हजार २०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख ४ हजार २०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७४ हजार ४००, वाशिम जिल्ह्यात ९२ हजार ६०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६० हजार हेक्टरमध्ये, अमरावती जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ३७ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात ७८ हजार सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ४ हजार क्षेत्रात पेरणी झाली आहे.

हरभ-याचे ४.२३ लाख हेक्टर क्षेत्र- यंदाच्या रबीमध्ये हरभ-यासाठी ३ लाख ४२ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ४ लाख २३ हजार ७०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी १२४ आहे. गव्हासाठी १ लाख ८० हजार ७०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ९५ हजार ५०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी ५५ आहे. जवस, तीळ व तेलबियाचे क्षेत्र यंदा निरंक राहिले आहे. रबी ज्वार ८० टक्के, तर करडईचे १४ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळAmravatiअमरावती