शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

रब्बी हंगाम स्थिरावला, यवतमाळ-बुलडाण्यात सरासरीपेक्षा अधिक पेरणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2018 18:54 IST

यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती : विभागात यंदाचा रब्बी हंगाम ५ लाख ३९ हजार हेक्टरवर स्थिरावला. ही टक्केवारी ९६ आहे. यामध्ये यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक क्षेत्रात पेरणी झाली, तर वाशिम, अकोला व अमरावती जिल्हे माघारले आहेत. जमिनीत आर्द्रतेचा अभाव असल्याने यंदा २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिल्याचे वास्तव आहे.

अमरावती विभागात यंदाच्या रब्बी हंगामात ५ लाख ५९ हजार ५०० हेक्टरवर पेरणाचा अंदाज होता. त्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ५ लाख ३९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली. यंदा डिसेंबरपासून थंडी असल्याने गव्हाची पेरणी यंदा लवकर आटोपली. खरिपात पाऊस सरासरीपेक्षा २६ टक्के कमी झाल्याने जमिनीत आर्द्रतेचा अभाव आहे. पाण्याची पातळी आॅक्टोबर महिन्यातच दोन मीटरपेक्षा खोल गेल्याने सिंचनक्षमतांना मर्यादा आल्या आहेत. विहिरीतील पाण्याचीदेखील कमी झाली. त्याच्या परिणामी अमरावती, अकोला व वाशिम जिल्ह्यात सरासरीपेक्षा पेरणी कमी झाली. यामुळे जिल्ह्यातील सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २० हजार २०० हेक्टर क्षेत्र नापेर राहिले आहे. अकोला जिल्ह्यात २९ हजार ८०० हेक्टर, वाशिम जिल्ह्यात ३२ हजार ६०० हेक्टर, तर अमरावती जिल्ह्यात ७ हजार ५०० हेक्टर क्षेत्र नापेर आहे. सरासरी क्षेत्राच्या तुलनेत  बुलडाणा जिल्ह्यात २३ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात २६ हजार १०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झाली आहे.

सध्या बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १ लाख ३९ हजार ८०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ६३ हजार २०० हेक्टरमध्ये अधिक पेरणी झालेली आहे. अकोला जिल्ह्यात १ लाख ४ हजार २०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ७४ हजार ४००, वाशिम जिल्ह्यात ९२ हजार ६०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ६० हजार हेक्टरमध्ये, अमरावती जिल्ह्यात १ लाख ४४ हजार ९०० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ३७ हजार ४०० हेक्टर व यवतमाळ जिल्ह्यात ७८ हजार सरासरी क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ४ हजार क्षेत्रात पेरणी झाली आहे.

हरभ-याचे ४.२३ लाख हेक्टर क्षेत्र- यंदाच्या रबीमध्ये हरभ-यासाठी ३ लाख ४२ हजार ३०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ४ लाख २३ हजार ७०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी १२४ आहे. गव्हासाठी १ लाख ८० हजार ७०० हेक्टर सरासरी क्षेत्र असताना, प्रत्यक्षात ९५ हजार ५०० हेक्टरमध्ये पेरणी झाली. ही टक्केवारी ५५ आहे. जवस, तीळ व तेलबियाचे क्षेत्र यंदा निरंक राहिले आहे. रबी ज्वार ८० टक्के, तर करडईचे १४ टक्के क्षेत्रात पेरणी झालेली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीYavatmalयवतमाळAmravatiअमरावती