शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

‘शहानूर’च्या सिंचनावर प्रश्नचिन्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 23:23 IST

अंजनगाव-दर्यापूर या मुख्य शहरांसह दोन्ही तालुक्यांतील अडीचशे गावांना पाणीपुरवठा करणाºया शहानूर धरणाची सिंचनक्षमता यंदा बाधित झाली आहे.

ठळक मुद्देदुष्काळाचे सावट : उपसा जलसिंचन योजनांचे भविष्य अंधारात

सुदेश मोरेलोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : अंजनगाव-दर्यापूर या मुख्य शहरांसह दोन्ही तालुक्यांतील अडीचशे गावांना पाणीपुरवठा करणाºया शहानूर धरणाची सिंचनक्षमता यंदा बाधित झाली आहे. आॅगस्टमध्येसुद्धा अर्धेच भरलेल्या या धरणात परतीच्या दमदार पावसामुळे सध्या ६८ टक्के पाणी साठा आहे. या धरणातून यंदा सिंचनाला पाणी द्यावे की नाही? या दुविधेत वरिष्ठ अधिकारी अडकले आहेत.जिल्ह्यातील इतर धरणांच्या रबी हंगामाचे नियोजन पूर्ण झाले असताना शहानूर धरणाच्या सिंचनासाठी अजूनही जाहिरनामे काढण्यात आलेले नाहीत. यावरून यंदा धरणाच्या सिंचनक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकाºयांना याबाबत विचाराणा केली असता हा मुद्दा अजूनही चर्चेसाठी साहेबांच्या टेबलावर असल्याचे सांगण्यात आले आहे.सिंचन अभियंत्यांच्या अहवालानुसार या धरणाची सिंचनक्षमता धरण पूर्ण भरले असताना १० हजार हेक्टर एवढीच आहे. मात्र धरण निर्मितीपासून आजपर्यंत महत्तम एक हजार ५०० हेक्टर ओलीत केले गेले. कालव्याद्वारे प्रवाही पद्धतीने दिलेले पाणी मोठ्या प्रमाणावर वाया जाते म्हणून आमदार बुंदिले यांनी पाईपलाइनने पाणी देण्याची योजना सादर केली. मात्र ही योजना उजव्या कालव्यावर सविस्तर वितरिकेद्वारा नियोजित आहे. या योजनेला जलसंपदा मंत्रालयाने रेंगाळत ठेवून डाव्या वितरिकेद्वारा पाईपलाइनने पाणी देणाºया दोन खासगी उपसा जलसिंचन योजनांना नाहरकत पत्र दिले आहे.शेतकरी झाले पाणीपट्टीसाठी कर्जदार...: एका प्लास्टिक पाईप कंपनीने जानेवारी २०१५ व फेब्रुवारी २०१७ मध्ये पाच-पाच कोटी रूपयांचे कर्ज देऊन अंजनगाव सुर्जी तालुक्यातील शेतकºयांच्या जमिनीचे गहाणखत केले. शहानूर धरणाची सिंचन क्षमता बाधित झाल्याने सध्या तूर्त या दोन्ही उपसा सिंचन योजना पाण्यापासून वंचित झाल्या आहेत आणि दोन्ही संस्थामधील शेतकरी १० कोटी रूपयांच्या कर्जात व व्याजात अडकले आहेत.अनेक प्रश्न अनुत्तरितपाणीपुरवठा व जलसिंचन विभागातील बेजबाबदार अधिकारी शहानूरच्या सिंचन व्यवस्थेचे नियोजन अजूनही करू शकले नाहीत, हे वास्तव आहे. यावर्षीची आपत्ती नैसर्गिक असली तरीही या तालुक्यातील शेतकºयांना उपसा जलसिंचनाचे गाजर दाखवून १० कोटी रुपयांच्या कर्जात अडकविणारे अधिकारी कोण आहेत? शासकीय खर्चाने प्रस्तावित पाणीपुरवठा योजना का रेंगाळत ठेवली? यावर्षी धरणातून शेतकºयांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल का, असे प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत.शहानूर धरण गतवर्षी पूर्ण क्षमतेने भरले होते. यंदा ती परिस्थिती नाही. पुढील उन्हाळा किती तीव्रतेचा राहील याचा अंदाज घेऊनच सिंचनाबाबत निर्णय घेण्यात येईल. हा मुद्दा वरिष्ठ अधिकाºयांच्या टेबलवर असल्याने सिंचनाबाबत सध्या काहीही सांगता येणार नाही.- सचिन हिरेकर,शाखा अधीक्षक, शहानूर कालवे उपविभाग