शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
7
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
8
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
9
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
10
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
11
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
12
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
13
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
14
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
15
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
16
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
19
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
20
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुत्र्यांवर पायरो व्हायरस आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:01 IST

अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्ये हे प्रमाण आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत . त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही, .....

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अमरावती, नागपूर, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाळीव व मोकाट श्वानांवर पायरो व्हायरस आजाराचे संकट आले आहे. अमरावती शहरात दररोज शंभरावर श्वानांवर उपचार केले जात आहेत. रेबीज आणि पायरो व्हायरसचे लसीकरण करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्ये हे प्रमाण आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत . त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही, असे मत  पशुधन विकास अधिकारी डी.एन. हटकर यांनी लोकमतला सांगितले. अमरावती शहरातील जिल्हा पशू सर्वचिकित्सालयात पायरो व्हायरसची लागण झालेले श्वान व शेळीवर उपचार केले जात आहेत. आठ ते दहा दिवस सलाईनने उपचार केला जात आहे. दररोज शंभरपेक्षा अधिक कुत्री गत चार ते पाच आठवड्यांपासून उपचाराकरिता आणली जात आहेत. 

रेबीज आणि पायरो व्हायरसचे व्हॅक्सिन जरुरीगावठी आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याची लागण होऊ नये, यासाठी रेबीज आणि पायरो व्हायरसचे व्हॅक्सिन लावणे गरजेचे आहे. तथापि, ७५० रुपयांपेक्षा अधिक किंमत असल्याने पशुपालकदेखील त्यांच्याकडील कुत्री, बकऱ्या या जनावरांना ही लस टोचून घेत नाहीत, याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. 

मुंबई, नागपूर, अमरावतीत लागण चार ते पाच आठवड्यांपासून मुंबई, नागपूर, अमरावती व राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पायरो व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात कुत्र्यांमध्ये झाली आहे. इतरही जिल्ह्यात संपर्क करून पशुधन विकास अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. पावसाळा व हिवाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात हा संसर्ग या प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

शहरात दररोज शंभरावर पायरो व्हायरस झालेल्या श्वानांवर उपचार सुरू आहेत. नागपूर-मुंबई व इतरही जिल्ह्यांमध्ये हा आजार पसरला आहे. रेबीज आणि पायरो व्हायरससंबंधी लसीकरण करणे गरजेचे आहे. तथापि, एकाही जनावराचा या व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झालेला नाही. - डी.एन. हटकर, पशुधन विकास अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :dogकुत्राHealthआरोग्य