शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ जणांचा मृत्यू, वाहून गेलेल्यांचा शोध सुरू; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
2
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
3
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
4
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
5
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
6
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
7
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
8
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
9
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
10
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
11
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
12
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
13
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
14
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
15
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
16
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
17
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
18
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
19
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कुत्र्यांवर पायरो व्हायरस आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2021 05:01 IST

अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्ये हे प्रमाण आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत . त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही, .....

नरेंद्र जावरे लोकमत न्यूज नेटवर्कचिखलदरा : अमरावती, नागपूर, मुंबईसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाळीव व मोकाट श्वानांवर पायरो व्हायरस आजाराचे संकट आले आहे. अमरावती शहरात दररोज शंभरावर श्वानांवर उपचार केले जात आहेत. रेबीज आणि पायरो व्हायरसचे लसीकरण करण्याचे आवाहन पशुधन विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.अमरावती शहरात पाळीव आणि मोकाट कुत्र्यांमध्ये चार ते पाच आठवड्यापासून पायरो व्हायरसचा संसर्ग दिसून आला आहे. शंभरपेक्षा अधिक कुत्री, तर जवळपास दहा बकऱ्यांमध्ये हे प्रमाण आहे. डायरिया, ओकारी, रक्ताची हगवण अशी लक्षणे यात दिसून येत आहेत. या आजारामुळे हे प्राणी काही खात नाहीत. आठ ते दहा दिवसांपर्यंत ही लक्षणे लागोपाठ दिसून येत आहेत . त्यांच्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजाराने मृत्यू ओढवतो. हा संसर्ग कुत्र्यांपासून कुत्र्यांना होतो, माणसांना होत नाही, असे मत  पशुधन विकास अधिकारी डी.एन. हटकर यांनी लोकमतला सांगितले. अमरावती शहरातील जिल्हा पशू सर्वचिकित्सालयात पायरो व्हायरसची लागण झालेले श्वान व शेळीवर उपचार केले जात आहेत. आठ ते दहा दिवस सलाईनने उपचार केला जात आहे. दररोज शंभरपेक्षा अधिक कुत्री गत चार ते पाच आठवड्यांपासून उपचाराकरिता आणली जात आहेत. 

रेबीज आणि पायरो व्हायरसचे व्हॅक्सिन जरुरीगावठी आणि पाळीव कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. याची लागण होऊ नये, यासाठी रेबीज आणि पायरो व्हायरसचे व्हॅक्सिन लावणे गरजेचे आहे. तथापि, ७५० रुपयांपेक्षा अधिक किंमत असल्याने पशुपालकदेखील त्यांच्याकडील कुत्री, बकऱ्या या जनावरांना ही लस टोचून घेत नाहीत, याकडे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. 

मुंबई, नागपूर, अमरावतीत लागण चार ते पाच आठवड्यांपासून मुंबई, नागपूर, अमरावती व राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये पायरो व्हायरसची लागण मोठ्या प्रमाणात कुत्र्यांमध्ये झाली आहे. इतरही जिल्ह्यात संपर्क करून पशुधन विकास अधिकाऱ्यांनी माहिती घेतली असता ही बाब उघड झाली आहे. पावसाळा व हिवाळ्याच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणात हा संसर्ग या प्राण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात होतो.

शहरात दररोज शंभरावर पायरो व्हायरस झालेल्या श्वानांवर उपचार सुरू आहेत. नागपूर-मुंबई व इतरही जिल्ह्यांमध्ये हा आजार पसरला आहे. रेबीज आणि पायरो व्हायरससंबंधी लसीकरण करणे गरजेचे आहे. तथापि, एकाही जनावराचा या व्हायरसच्या संसर्गाने मृत्यू झालेला नाही. - डी.एन. हटकर, पशुधन विकास अधिकारी, अमरावती

 

टॅग्स :dogकुत्राHealthआरोग्य