शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
3
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
4
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
5
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
6
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
7
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
8
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
9
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
10
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
11
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
12
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
13
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
14
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
15
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
16
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
17
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
18
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
19
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?

दारावर लाल पाण्याची बॉटल ठेवते जनावरांना दूर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 22:20 IST

घराच्या प्रवेशद्वारावर कुंकुमिश्रित लाल पाणी बॉटलमध्ये भरून ठेवल्यास जनावरे थांबत नाहीत, असा समज करून घेण्याचे एक आगळेवेगळे फॅड सध्या अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. एरवी गावखेड्यात अंधश्रद्धा पसरल्याची बोंब असते. मात्र, सदर प्रकार अमरावती शहरात बऱ्यापैकी रुजला आहे. हा अंधश्रद्धेचाच भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देघरोघरी पसरली अंधश्रद्धा : गावखेड्यातीलच नव्हे, शहरातील सुशिक्षितांनाही विळखा

वैभव बाबरेकर ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : घराच्या प्रवेशद्वारावर कुंकुमिश्रित लाल पाणी बॉटलमध्ये भरून ठेवल्यास जनावरे थांबत नाहीत, असा समज करून घेण्याचे एक आगळेवेगळे फॅड सध्या अमरावती शहरात पाहायला मिळत आहे. एरवी गावखेड्यात अंधश्रद्धा पसरल्याची बोंब असते. मात्र, सदर प्रकार अमरावती शहरात बऱ्यापैकी रुजला आहे. हा अंधश्रद्धेचाच भाग असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.पावसाळ्यातील दिवसांमध्ये श्वान, वराह व गाई शहरातील गल्लोगल्ली फिरताना आढळतात. हे प्राणी कुठेही लघुशंका किंवा शौचसुद्धा करतात. बरेचदा नागरिकांच्या घरापुढील रस्त्यावर किंवा आवारात हे प्राणी बसून आपल्या विधी उरकतात. घरापुढील आवार अस्वच्छ ही जनावरे करीत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या प्राण्यांना हाकलून लावणेही इतके सोपे नसते; उलट ते अंगावर धावून जाण्याची शक्यता असते. त्यावर काही नागरिकांनी सोपा उपाय शोधला आहे. तो म्हणजे, घराच्या दरवाजावर लाल पाण्याची बॉटल लावून ठेवणे. ही लाल पाण्याची बॉटल पाहून हे प्राणी घरासमोर किंवा आवारात बसत नाही. एवढेच नव्हे तर लाल पाणी दिसल्यामुळे ते थांबतदेखील नसल्याचा समज नागरिकांनी करून घेतला आहे. मात्र, हे कितपत खरे आहे, यात खरोखर तथ्य आहे का, हा प्रकार काय आहे, हे जाणून घेतले असता, हा गैरसमज व अंधश्रद्धेचाच भाग असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.का एकत्र येतात श्वान?पावसाळा हा कुत्र्यांच्या मीलनाचा काळ. त्यामुळे मादीचा नर श्वान माग घेतात. अशावेळी मादी श्वानाने एखाद्या घरासमोर जाऊन मूत्र किंवा घाण केल्यास, त्या गंधामुळे नर प्राणी आकर्षित होऊन एका ठिकाणी जमतात. अशावेळी ते श्वानसुद्धा तेथे मूत्र किंवा घाण करून जातात.सुशिक्षितांनीही लावली बॉटलअंधश्रद्धेचे प्रमाण अशिक्षितांमध्ये अधिक असते. मात्र, लाल पाणी बॉटल प्रवेशद्वारासमोर लावणाऱ्यांमध्ये सुशिक्षितांचाच भरणा मोठ्या प्रमाणात आहे. विशेष म्हणजे, जे श्वान पाळतात, त्यांच्याही घरासमोर ही लाल पाणी असलेली बॉटल आढळून येत आहे.या ठिकाणी लाल पाण्याची बॉटलजनावरांना दूर ठेवण्यासाठी लाल पाण्याची बॉटल प्रवेशद्वारावर लटकवून ठेवण्यात आल्याचे बडनेरातील माताफैल, नवीवस्ती, आदिवासीनगर, इंदिरानगर, रुक्मिणीनगर, यशोदानगर, नवाथेनगर अशा सर्वच सामाजिक, आर्थिक स्तरांतील वस्त्यांमध्ये आढळून येत आहे. या गैरसमजाला सर्वाधिक महिला आहारी गेल्या आहेत.श्वानांना या बॉटलच्या लाल पाण्याशी काही देणेघेणे नाही. हा गैरसमज खेड्यापाड्यातून शहरापर्यंत पोहोचला आहे.- शुभम सायंके, प्राणिप्रेमी.लाल पाण्याची बॉटल घरासमोर लटकविल्यास श्वान घाण करीत नाहीत. आता घरासमोर श्वान उभेसुद्धा राहत नाहीत.- नीलेश ठाकरे, नवाथेनगरकुंकवाच्या लाल पाण्याने जनावरे पळून जातात, अशा गोष्टीवर लोक विश्वास ठेवतात तरी कसे? हा अंधश्रद्धेचाच भाग आहे.- हरीश केदार, अंनिस