शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

पूर्णा प्रकल्पाची उदासीनता जिवावर बेतली

By admin | Updated: February 28, 2015 00:40 IST

मागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही

सुरेश सवळे चांदूरबाजारमागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलाने आत्महत्या केली. या आत्महत्येला प्रकल्प उपविभागातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार मृताच्या भावाने पोलिसात केली आहे. नानोरी येथील शेतकरी विठ्ठलराव धर्माळे यांचे बोरज शिवारात गट नंबर ७२/१ मध्ये ६८ आर शेत आहे. या जिरायती शेतातील उत्पन्नाच्या भरवशावर विठ्ठलराव त्यांच्या कुटुंबाची उपजिविका भागविते. शेताच्या मध्यभागातून विश्रोळी येथे पूर्णा प्रकल्पाचे रेल क्रमांक १२ च्या कालव्याची मुख्य १२ इंच व्यासाची पाईपलाईन गेली आहे. ही पाईप लाईन दोन वर्षांपासून फुटल्यामुळे संपूर्ण शेतात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक शेतात पाणी साचले आहे. या बाबीची तक्रार दोन वर्षांपासून धर्माळे कुटुंब पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांकडे करीत आहे. शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दोन वर्षांपासून अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान होत असून पेरलेले पिकही हाती लागत नाही. ही बाबसुद्धा तक्रारीच्या माध्यमातून पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.सध्या शेतात हरभऱ्याचे पीक आहे. या साचलेल्या पाण्यामुळे हरभऱ्याचे पीक सडत असल्याचे पाहून २५ फेब्रुवारी रोजी आशिष धर्माळे हा संबंधित अधिकाऱ्याकडे गेला व लिकेज पाईप लाईन जोडण्याची विनंती केली. परंतु तेथील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आशिषला शिवीगाळ करून हाकलून लावल्याचे त्याने आईला सांगितले. इतकेच नव्हे तर आशिषने विषारी औषध प्राशन केले ही बाब आईच्या लक्षात आल्यावर शेजारी नागरिकांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आशिषच्या आत्महत्येला जलसंपदा विभागाच्या पूर्णा प्रकल्प उपविभाग क्र. ४ चांदूरबाजार येथील अधिकारी व कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप मृताचा भाऊ भूजंग धर्माळे यांनी केला आहे. पोलिसात व तहसीलदाराकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.