शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा प्रकल्पाची उदासीनता जिवावर बेतली

By admin | Updated: February 28, 2015 00:40 IST

मागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही

सुरेश सवळे चांदूरबाजारमागील दोन वर्षांपासून कालव्याचे पाणी शेतात साचत असल्यामुळे अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान झाले. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतरही पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी कुटुंबातील मुलाने आत्महत्या केली. या आत्महत्येला प्रकल्प उपविभागातील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असून त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल करण्याची तक्रार मृताच्या भावाने पोलिसात केली आहे. नानोरी येथील शेतकरी विठ्ठलराव धर्माळे यांचे बोरज शिवारात गट नंबर ७२/१ मध्ये ६८ आर शेत आहे. या जिरायती शेतातील उत्पन्नाच्या भरवशावर विठ्ठलराव त्यांच्या कुटुंबाची उपजिविका भागविते. शेताच्या मध्यभागातून विश्रोळी येथे पूर्णा प्रकल्पाचे रेल क्रमांक १२ च्या कालव्याची मुख्य १२ इंच व्यासाची पाईपलाईन गेली आहे. ही पाईप लाईन दोन वर्षांपासून फुटल्यामुळे संपूर्ण शेतात पाण्याचा प्रवाह सुरू झाला आहे. त्यामुळे अर्ध्याअधिक शेतात पाणी साचले आहे. या बाबीची तक्रार दोन वर्षांपासून धर्माळे कुटुंब पूर्णा मध्यम प्रकल्प उपविभाग क्रमांक ४ च्या अधिकाऱ्यांकडे करीत आहे. शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढल्यामुळे दोन वर्षांपासून अर्ध्याअधिक शेतातील पिकांचे नुकसान होत असून पेरलेले पिकही हाती लागत नाही. ही बाबसुद्धा तक्रारीच्या माध्यमातून पूर्णा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले.सध्या शेतात हरभऱ्याचे पीक आहे. या साचलेल्या पाण्यामुळे हरभऱ्याचे पीक सडत असल्याचे पाहून २५ फेब्रुवारी रोजी आशिष धर्माळे हा संबंधित अधिकाऱ्याकडे गेला व लिकेज पाईप लाईन जोडण्याची विनंती केली. परंतु तेथील उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आशिषला शिवीगाळ करून हाकलून लावल्याचे त्याने आईला सांगितले. इतकेच नव्हे तर आशिषने विषारी औषध प्राशन केले ही बाब आईच्या लक्षात आल्यावर शेजारी नागरिकांच्या मदतीने त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आशिषच्या आत्महत्येला जलसंपदा विभागाच्या पूर्णा प्रकल्प उपविभाग क्र. ४ चांदूरबाजार येथील अधिकारी व कर्मचारीच जबाबदार असल्याचा आरोप मृताचा भाऊ भूजंग धर्माळे यांनी केला आहे. पोलिसात व तहसीलदाराकडे या प्रकरणाची तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस तपास करीत आहे.