शहरं
Join us  
Trending Stories
1
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
2
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
3
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
4
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
5
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
6
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
7
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
8
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
9
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
10
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
11
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
12
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
13
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
14
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
15
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
16
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
17
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
18
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
19
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!
20
मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ‘हिट’, शेतकरी, धारावी पुनर्वसन आंदोलन याच मार्गाने जाणार?

पूर्णा धरणाची पातळी घसरली

By admin | Updated: July 12, 2014 00:35 IST

पावसाळा सुरू होऊन ३२ दिवस झाले. एरवी मृगात पेरणी होणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. यंदा मृगाच्या ‘हत्ती’ने तर शेतकऱ्यांना दगा दिलाच; मात्र आर्द्राच्या ‘मोरा’नेही तारले नाही.

सुरेश सवळे चांदूरबाजारपावसाळा सुरू होऊन ३२ दिवस झाले. एरवी मृगात पेरणी होणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. यंदा मृगाच्या ‘हत्ती’ने तर शेतकऱ्यांना दगा दिलाच; मात्र आर्द्राच्या ‘मोरा’नेही तारले नाही. म्हणून प्रतीक्षा करून थकलेल्या शेतकऱ्यांनी नाईलाजाने पुनर्वसूच्या ‘गाढव’वर विश्वास ठेवून घाईगर्दीने खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणी सुरू केली आहे. मागील वर्षी या काळात पूर्णा धरणात अतिरिक्त पावसाचे पाणी पाठवल्यामुळे दोनदा धरणाची दारे उघडावी लागली होती. मात्र यंदा अतिरिक्त साठा तर सोडाच; आहे त्या पातळीतही एक मिटरने झालेली घट भविष्यातील पाणी टंचाईची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे. मृगात पेरणी करण्यासाठी किमान १०० मि.मी. पावसाची गरज असताना ती अपेक्षा मृगाने पूर्ण केली नाही. परिणामी मृगात पेरल्या जाणारे मूग, उडीद या सारख्या पिकांना पेरणीतून हद्दपार व्हावे लागले. सोयाबीन पिकालाही मृग किंवा आर्द्राच्या पावसाची गरज असते. या पिकाची पेरणी जास्तीत जास्त १५ जुलैपर्यंत व्हावी, तेव्हाच अपेक्षेप्रमाणे उत्पादन होण्याची शक्यता असते. त्याच आशेवर आता शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध सोयाबीन बियाण्यांच्या पेरणीला सुरूवात केली आहे. यंदा जिल्ह्यात ४ लाख ७९ हजार ८८० पीक पेरणीचे लक्ष प्रशासनाचे होते. मात्र पेरणीला आवश्यक पाऊस न झाल्यामुळे १ जूनपासून जिल्ह्यात केवळ ८०.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, ज्वारीसह अन्य तेलबिया ही खरिपातील नगदी पिके आहेत. यंदा जिल्ह्यात पडलेला पाऊस सार्वत्रिक नसल्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी दैव व नशिबावर विश्वास टाकून १० हजार हेक्टरवर सोयाबीन, २ हजार ३१२ हेक्टर कापूस, २ हजार ९४० हेक्टर तूर व केवळ २४० हेक्टर जमिनीत मुगाची पेरणी केली. जिल्ह्यात एकूण ३३ हजार ८७७ हेक्टरवर पेरणी करण्याचे धाडस आजपर्यंत शेतकऱ्यांनी दाखविले आहे. मात्र पुनर्वसूतील पावसाने नियमित हजेरी लावली नाही तर शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण नगण्य असल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत आहे. दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडे अद्याप तरी कोणत्याच उपाययोजना नसल्याने शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे. काही शेतकऱ्यांना पेरणी न करताच कर्ज भरण्याचा तगादा लावल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा स्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता प्रशासनाकडे यावर योजना अद्याप तरी नसल्याचे वास्तव आहे.