शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना 'सर्वोच्च' दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेला स्थगिती; आमदारकीही जाणार नाही
2
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
3
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
4
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
5
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
6
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
7
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
8
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
9
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
10
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
11
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
12
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
13
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
14
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
15
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
16
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
17
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
18
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
19
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
20
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
Daily Top 2Weekly Top 5

पूर्णा धरणाची पातळी घसरली

By admin | Updated: July 12, 2014 00:35 IST

पावसाळा सुरू होऊन ३२ दिवस झाले. एरवी मृगात पेरणी होणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. यंदा मृगाच्या ‘हत्ती’ने तर शेतकऱ्यांना दगा दिलाच; मात्र आर्द्राच्या ‘मोरा’नेही तारले नाही.

सुरेश सवळे चांदूरबाजारपावसाळा सुरू होऊन ३२ दिवस झाले. एरवी मृगात पेरणी होणे शेतकऱ्यांना अपेक्षित असते. यंदा मृगाच्या ‘हत्ती’ने तर शेतकऱ्यांना दगा दिलाच; मात्र आर्द्राच्या ‘मोरा’नेही तारले नाही. म्हणून प्रतीक्षा करून थकलेल्या शेतकऱ्यांनी नाईलाजाने पुनर्वसूच्या ‘गाढव’वर विश्वास ठेवून घाईगर्दीने खरेदी केलेल्या बियाण्यांची पेरणी सुरू केली आहे. मागील वर्षी या काळात पूर्णा धरणात अतिरिक्त पावसाचे पाणी पाठवल्यामुळे दोनदा धरणाची दारे उघडावी लागली होती. मात्र यंदा अतिरिक्त साठा तर सोडाच; आहे त्या पातळीतही एक मिटरने झालेली घट भविष्यातील पाणी टंचाईची जाणीव करून देण्यास पुरेशी आहे. मृगात पेरणी करण्यासाठी किमान १०० मि.मी. पावसाची गरज असताना ती अपेक्षा मृगाने पूर्ण केली नाही. परिणामी मृगात पेरल्या जाणारे मूग, उडीद या सारख्या पिकांना पेरणीतून हद्दपार व्हावे लागले. सोयाबीन पिकालाही मृग किंवा आर्द्राच्या पावसाची गरज असते. या पिकाची पेरणी जास्तीत जास्त १५ जुलैपर्यंत व्हावी, तेव्हाच अपेक्षेप्रमाणे उत्पादन होण्याची शक्यता असते. त्याच आशेवर आता शेतकऱ्यांनी आपल्याकडील उपलब्ध सोयाबीन बियाण्यांच्या पेरणीला सुरूवात केली आहे. यंदा जिल्ह्यात ४ लाख ७९ हजार ८८० पीक पेरणीचे लक्ष प्रशासनाचे होते. मात्र पेरणीला आवश्यक पाऊस न झाल्यामुळे १ जूनपासून जिल्ह्यात केवळ ८०.०३ मि.मी. पावसाची नोंद झाली. सोयाबीन, कापूस, मूग, तूर, उडीद, ज्वारीसह अन्य तेलबिया ही खरिपातील नगदी पिके आहेत. यंदा जिल्ह्यात पडलेला पाऊस सार्वत्रिक नसल्यामुळे जिल्ह्यातील काही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी दैव व नशिबावर विश्वास टाकून १० हजार हेक्टरवर सोयाबीन, २ हजार ३१२ हेक्टर कापूस, २ हजार ९४० हेक्टर तूर व केवळ २४० हेक्टर जमिनीत मुगाची पेरणी केली. जिल्ह्यात एकूण ३३ हजार ८७७ हेक्टरवर पेरणी करण्याचे धाडस आजपर्यंत शेतकऱ्यांनी दाखविले आहे. मात्र पुनर्वसूतील पावसाने नियमित हजेरी लावली नाही तर शेतकरी अडचणीत येण्याची दाट शक्यता आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण नगण्य असल्यामुळे जिल्हा दुष्काळाच्या गर्तेत आहे. दुष्काळग्रस्त स्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाकडे अद्याप तरी कोणत्याच उपाययोजना नसल्याने शेतकरी आत्महत्येच्या दारात उभा आहे. काही शेतकऱ्यांना पेरणी न करताच कर्ज भरण्याचा तगादा लावल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा स्थितीवर नियंत्रण आणण्याकरिता प्रशासनाकडे यावर योजना अद्याप तरी नसल्याचे वास्तव आहे.