शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
2
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
3
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
4
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
6
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
7
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
8
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
9
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
10
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
11
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
12
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
13
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
14
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
15
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
16
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
17
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
18
घरांच्या विक्रीला ‘ब्रेक’; पुणे, मुंबईत मोठी घसरण; नव्या विमानतळामुळे...
19
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
20
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
Daily Top 2Weekly Top 5

तूर खरेदी बंद, आमदार संतापले

By admin | Updated: April 11, 2017 00:21 IST

जिल्ह्यातील नाफेडचे शासकीय तूर खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने महिनाभरापासून शेतकऱ्यांचा माल मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे.

प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती : वीरेंद्र जगताप, बच्चू कडू आक्रमकअमरावती : जिल्ह्यातील नाफेडचे शासकीय तूर खरेदी केंद्र अचानक बंद केल्याने महिनाभरापासून शेतकऱ्यांचा माल मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शेतकऱ्यांचे हाल होत असताना प्रशासन मात्र बारदाना, गोदाम नसल्याची कारणे सांगून वेळ मारून नेत असल्याने सोमवारी आ.वीरेंद्र जगताप, आ. बच्चू कडू यांनी आक्रमक होत प्रभारी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारला.चांदूररेल्वे, धामणगांव रेल्वे व अचलपूर येथील बाजार समितीच्या मार्केट यार्डवर हजारो क्विंटल तूर मोजणीच्या प्रतीक्षेत पडून आहे. शेतकरी सर्व कामे सोडून शासकीय तूर खरेदी केंद्रांवर दररोज चकरा मारत आहेत.मात्र, प्रशासनाला शेतकऱ्यांच्या समस्येविषयी अजिबात गांभीर्य नाही. मागील आठवडयात आ. वीरेंद्र जगताप यांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यावर जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शुक्रवारपासून तूर खरेदी केंद्र सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सोमवार उजाडला तरी तूर खरेदी सुरू न झाल्याने आ. जगताप व बच्चू कडू यांनी जिल्हाकचेरीवर धडक देऊन अपर जिल्हाधिकारी के.आर.परदेशी यांना जाब विचारला.ंतातडीने तूर खरेदी करण्याचे निर्देशअमरावती : यावेळी अपर जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित विभागाशी संपर्क साधला असता पुन्हा बारदाना नसल्याचे कारण पुढे करण्यात आले. मात्र, उभय आमदारांचा आक्रमक पावित्रा पाहता अपर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने तूर खरेदी करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले. यावेळी चांदूररेल्वे व धामणगाव रेल्वे बाजार समिती पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते. जिल्हा उपनिबंधक गौतम वालदे, पणन्चे जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी डी. के. वानखडे आदींचीही उपस्थिती होती. (प्रतिनिधी)बारदाना देण्यास तयारचांदूररेल्वे व धामणगांव रेल्वे बाजार समितीमधील शासकीय तूर खरेदी केंद्रात बारदानाअभावी तूर खरेदी बंद राहात असेल तर या दोन्ही केंद्रांवर बाजार समितीव्दारे बारदाना उपलब्ध करून देण्याची ग्वाही दोन्ही बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली. मात्र, नाफेडव्दारा याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. बारदाना उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दोन्ही बाजार समितींद्वारे दिल्यानंतर येथील तूर खरेदी सुरळीत होऊ शकते. हा तर शासनाचाच डावबारदाना नसल्याचे कारण सांगत शासकीय तूर खरेदी बंद ठेवली जात असेल तर हा शासनाचा डाव आहे. शासनाचे शेतकरीविरोधी धोरण यामधून दिसून येते. शेतकऱ्यांना शासनच न्याय देत नसेल तर अपेक्षा कुणाकडून करायची, असा सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत.