शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

नाफेडची तूर खरेदी बंद,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2017 00:07 IST

स्थानिक बाजार समितीमध्ये २१ फेब्रुवारीपासून शासकीय तूरखरेदी नाफेडने बंद केल्यामुळे येथील बाजारात तुरीचे भाव कोसळले.

अंजनगावात शेतकऱ्यांचा चक्काजाम वाटाघाटीनंतर तोडगा : २८४ कास्तकार, ७९१५ क्विंटल आवक अंजनगांव सुर्जी : स्थानिक बाजार समितीमध्ये २१ फेब्रुवारीपासून शासकीय तूरखरेदी नाफेडने बंद केल्यामुळे येथील बाजारात तुरीचे भाव कोसळले. यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी दुपारी तीन वाजता समितीच्या प्रवेशद्वारावर वाहने लाऊन चक्काजाम आंदोलन केले. यामुळे अंजनगाव-अकोट मार्ग बंद झाला होता.सायंकाळी पाच वाजता बाजार समिती व शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक वाटाघाटी झाल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.नाफेडद्वारा यावर्षी अंजनगांवात शासकीय दराने एकूण २८४ शेतकऱ्यांची ७९१५ क्विंटल तूर मोजण्यात आली. यानंतर तुरीची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याचे कारण देऊन बाजार समिती पदाधिकाऱ्यांनी वृत्तपत्रातील जाहीर सूचनेद्वारे तूरखरेदी बंद केल्याची माहिती दिली. परंतु यामुळे तुरीचे दर कोसळले. - तर ‘त्या’ मालाची होणार खरेदीअंजनगांव सुर्जी : बुधवारी तुरीचा भाव अवघा ३८०० रूपये प्रतिक्विंटलवर आल्याने शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी आंदोलनाचा मार्ग पत्करला. स्थानिक बाजार समितीत यावर्षी तुरीची मोठ्या सुरुवातीपासूनच मोठी आवक सुरु होती. परंतु नाफेडच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरुन व्यापारी लॉबीने शेतकऱ्यांची तूर न मोजता आपले उखळ पांढरे केले. काही सतर्क शेतकऱ्यांनी याप्रकरणात नाफेडच्या खरेदी केंद्रावरचा घोटाळा रंगेहात पकडला. त्यामुळे दुसऱ्या दिवशीपासून शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’आले होेते. आणि व्यापारी तूरखरेदी केंद्रावरुन गायब झाले होते. परंतु ही परिस्थिती फक्त एकच दिवस राहिली आणि अचानक आवक वाढल्याचे कारण देऊन बाजार समिती मार्फत तूरखरेदी केंद्र बंद करण्यात आले. त्यानंतर बाजार समिती व शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाल्यानंतर बाजार समितीत आणखी दोन काटे वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच ज्या शेतकऱ्यांनी बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांकडे तूर विकली आहे, त्या शेतकऱ्यांना त्यांचा माल नाफेडमध्ये विक्रीसाठी नेता येईल, असेही सांगण्यात आले. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. बाजार समितीला शासकीय तूर खरेदी बंद करण्याचे पत्र कुणी दिले माहित नाही. परंतु नाफेडचे तूर खरेदीकेंद्र बुधवारी सुरू आहे.येथे शासकीय दराने खरेदी होत आहे. आम्ही कोणतीही लेखी सूचना दिलेली नाही. सर्व काही स्थानिक बाजार समितीच्या अखत्यारीत होत आहे, असे नाफेडचे ग्रेडर जी.एम. रामागडे यांनी सांगितले.