शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अगोदर भोपळा, नंतर २५ गुण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2018 22:04 IST

बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयाच्या उन्हाळी परीक्षा- २०१८ च्या निकालात एक-दोन नव्हे, तर २५ विद्यार्थी नापास झाले होते. मात्र, याच विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात अर्ज सादर केले असता, जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. युवा सेनेने याप्रकरणी सोमवारी विद्यापीठावर धडक देत विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत देण्याची भूमिका घेतली. मात्र, कुलगुरू नसल्याने हे विद्यार्थी परतले.

ठळक मुद्देविद्यापीठाचा अजब कारभार : एमसीए द्वितीय वर्षातील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : बडनेरा येथील प्रो. राम मेघे अभियांत्रिकी महाविद्यालयातील एमसीए अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयाच्या उन्हाळी परीक्षा- २०१८ च्या निकालात एक-दोन नव्हे, तर २५ विद्यार्थी नापास झाले होते. मात्र, याच विद्यार्थ्यांनी पुनर्मूल्यांकनासाठी विद्यापीठात अर्ज सादर केले असता, जवळपास सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. युवा सेनेने याप्रकरणी सोमवारी विद्यापीठावर धडक देत विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकन शुल्क परत देण्याची भूमिका घेतली. मात्र, कुलगुरू नसल्याने हे विद्यार्थी परतले.संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाकडून अभियांत्रिकी, फार्मसी आणि विधी अभ्यासक्रमाच्या परीक्षा आॅनलाइन घेण्यात येत आहे. मात्र, या परीक्षेशी संबंधित ‘एन्ड टू एन्ड’ कामांची जबाबदारी असलेल्या ‘माइंड लॉजिक’ एजन्सीमुळे विद्यापीठावर नामुष्की ओढवली जात आहे. गेल्या वर्षभरापासून परीक्षा आणि वेळेपूर्वी निकालाचा गुंता सोडविला गेलेला नाही. अशातच विद्यापीठाने सुरू केलेल्या सेमिस्टर पॅटर्न परीक्षा निकालात असंख्य चुका, त्रुटी असल्याने विद्यार्थी वैतागले आहेत.एमसीएचा विद्यार्थी श्रीकांत कोरडे याला द्वितीय वर्षातील चौथ्या सेमिस्टरच्या सीजीएस विषयात अगोदर नऊ गुण मिळाले होते. त्याने पुर्नमूल्यांकनासाठी अर्ज केला होता. १२ सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या आॅनलाइन निकालात आता ३० गुण मिळाले आहे. स्वप्निल जोगी या विद्यार्थ्यास सायलन्ट सर्व्हर कम्प्यूटिंग या विषयात भोपळा होता. पुर्नमूल्यांकनात चक्क २५ गुण मिळाले. रजत देशमुखला याच विषयात आधी सहा व पुनर्मूल्यांकनात २२ गुण देण्याची किमया झाली. स्वप्नील जोगी, अक्षय शिंदे, अक्षय चिंचोळकर, राजल मोरे, अक्षय ईखार, श्रीकांत कोरडे, संचित पाठक,ऋ षिका चव्हाण, शिवानी काळे, शुभम निमजे, भूमिका खंडेलवाल, दिव्यांनी कंकाळे, प्रतीक्षा म्हसंगे, पल्लवी खवशी आदी विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गाठले होते.कुलसचिवांसोबत चर्चायुवा सेनेचे राहुल माटोडे यांच्या नेतृत्वात अन्यायग्रस्त अभियांत्रिकी विद्यार्थ्यांनी आॅनलाइन निकालात असलेले दोष, त्रुटींबाबत कैफियत मांडली. मात्र, अगोदर नापास अन् पुनर्मूल्यांकनात पास याबाबत विद्यापीठ प्रशासनाचा खरपूस समाचार घेतला. कुलसचिव अजय देशमुख यांना परीक्षा विभागात सुरू असलेल्या अजब- गजब कारभाराची महिमा सांगण्यात आली. परीक्षेत पास असूनही आॅनलाइन निकालात नापास दर्शविल्याने विद्यार्थी हताश झाले आहेत. पुर्नमूल्यांकनासाठी आकारलेले शुल्क परत मिळण्यासाठी बहुतेकांनी धाव घेतली आहे.