शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

चिथावणीखोर वक्तव्य; पालघरच्या स्वामीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:32 IST

गोवंश संरक्षण यात्रेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोवंश संरक्षण यात्रेदरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पालघर येथील हिंदू शक्तिपीठाचे स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्याविरुद्ध २० मे रोजी रात्री भादंविचे कलम १५३ अ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यांच्या भाषणामुळे दोन धर्मांत जातीय तेढ निर्माण होऊन एकमेकांविरुद्ध क्रोध निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी स्वत: ही फिर्याद दाखल केली.

सकल हिंदू समाजाच्या वतीने १४ मे रोजी सायंकाळी स्थानिक गांधी चौक ते इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरापर्यंत गोवंश संरक्षण यात्रा काढण्यात आली. यात खासदारांसह अनेक राजकीय पदाधिकारी सहभागी झाले. तेथे स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराजांनी भाषण केले. त्यांनी भाषणाची सुरुवातच आक्षेपार्ह शब्दांनी केली. भाषणादरम्यान दोन धर्मांमध्ये, समाजामध्ये शत्रुत्व वाढून सामाजिक एकोपा भंग होईल, असे प्रक्षोभक वक्तव्य केले.

विशिष्ट धर्माविरुद्ध एकजुटीचे आवाहन   पालघर येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी भाषणादरम्यान विशिष्ट धर्माविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले.   अशा भाषणामुळे दोन धर्मांत जातीय तेढ निर्माण होऊन, एकमेकांविरुद्ध क्रोध निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे चोरमले यांनी नमूद केले आहे.