शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

चिथावणीखोर वक्तव्य; पालघरच्या स्वामीवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2023 08:32 IST

गोवंश संरक्षण यात्रेतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गोवंश संरक्षण यात्रेदरम्यान प्रक्षोभक वक्तव्य केल्याप्रकरणी पालघर येथील हिंदू शक्तिपीठाचे स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांच्याविरुद्ध २० मे रोजी रात्री भादंविचे कलम १५३ अ व अन्य कलमान्वये गुन्हा दाखल केला. त्यांच्या भाषणामुळे दोन धर्मांत जातीय तेढ निर्माण होऊन एकमेकांविरुद्ध क्रोध निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केला, असा आरोप तक्रारीतून करण्यात आला आहे. गाडगेनगरचे ठाणेदार आसाराम चोरमले यांनी स्वत: ही फिर्याद दाखल केली.

सकल हिंदू समाजाच्या वतीने १४ मे रोजी सायंकाळी स्थानिक गांधी चौक ते इर्विन चौकस्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरापर्यंत गोवंश संरक्षण यात्रा काढण्यात आली. यात खासदारांसह अनेक राजकीय पदाधिकारी सहभागी झाले. तेथे स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराजांनी भाषण केले. त्यांनी भाषणाची सुरुवातच आक्षेपार्ह शब्दांनी केली. भाषणादरम्यान दोन धर्मांमध्ये, समाजामध्ये शत्रुत्व वाढून सामाजिक एकोपा भंग होईल, असे प्रक्षोभक वक्तव्य केले.

विशिष्ट धर्माविरुद्ध एकजुटीचे आवाहन   पालघर येथील स्वामी श्री भारतानंद सरस्वतीजी महाराज यांनी भाषणादरम्यान विशिष्ट धर्माविरुद्ध एकजूट होण्याचे आवाहन केले.   अशा भाषणामुळे दोन धर्मांत जातीय तेढ निर्माण होऊन, एकमेकांविरुद्ध क्रोध निर्माण होऊन सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याचे चोरमले यांनी नमूद केले आहे.