शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात पदवी प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 00:01 IST

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दहावा पदवी प्रदान समारंभ शनिवारी स्थानिक व्ही.एम.व्ही. परिसर कठोरा नाका येथील संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह उत्साहात पार पडला. यात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४५० बी.टेक व १०६ एम. टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणपत्र प्रदान करण्यात आली.

ठळक मुद्देकेंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्र्यांची उपस्थिती : ४५० बी-टेक, १०६ एम.टेक विद्यार्थ्यांचा गौरव

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात दहावा पदवी प्रदान समारंभ शनिवारी स्थानिक व्ही.एम.व्ही. परिसर कठोरा नाका येथील संगीत सूर्य केशवराव भोसले सभागृह उत्साहात पार पडला. यात विविध अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या एकूण ४५० बी.टेक व १०६ एम. टेक विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र व गुणपत्र प्रदान करण्यात आली.या समारंभात केंद्रीय मनुष्यबळ विकास, दळणवळण, इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय धोत्रे, कुलगुरू मुरलीधर चांदेकर, सहसंचालक, विभागीय तंत्रशिक्षण सहसंचालक डी.व्ही जाधव, विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यांकन मंडळाचे संचालक हेमंत देशमुख, महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष संजय जाधव, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू विलास सपकाळ, संस्थेच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष किरण पातुरकर व महाविद्यालयाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य मो. झुबेर, कुणाल टिकले, प्राचार्य आर.पी. बोरकर, विविध विद्याशाखांचे विभागप्रमुख, अधिष्ठाता, शैक्षणिक अधिष्ठाता अनंत धात्रक, परीक्षा नियंत्रक वसंत जपे आदीे उपस्थित होते. प्राचार्य आर.पी. बोरकर यांनी महाविद्यालयाच्या प्रगतीचा वार्षिक अहवाल सादर केला.यावेळी ना. संजय धोत्रे म्हणाले, मी या संस्थेचा माजी विद्यार्थी असल्याचे अगोदर स्पष्ट केले. सदोतिद विद्यार्जन करत राहून विपरीत परिस्थितीतही निर्मित क्षमता जपून समाजजीवन सुकर करण्याचा मोलाचा सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. समस्यांच्या निराकरणासाठी विचार व चाकोरी बदलण्याचे आव्हान त्यांनी केले.विद्यार्थ्यांनी समाजाच्या गरजांसाठी नविन्यपूर्ण, सक्षम, समाधानकारक उत्तरे शोधावीत, उत्तम संशोधक व उद्योजक बनून राष्ट्र निर्मितीत हातभार लावावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. संचालन अनंत धात्रक व शांतनू लोही यांनी केले.हे विद्यार्थी ठरलेत प्रावीण्य श्रेणीचे मानकरी४बी.टेक. अभियांत्रिकीच्या श्रेया बोरीकर (स्थापत्य) पलक कटीरा व मो. समीर शेख (यंत्र अभियांत्रिकी), स्नेहा जावरे (विद्युत), स्रेहा तायडे (अणु विद्युत), सुखदा कुळकर्णी (संगणक विज्ञान), दिशा बात्रा (माहिती तंत्रज्ञान), रविना संगतानी (उपकरणीकरण) यांना विद्याशाखांमध्ये अव्वल क्रमांकासाठी सुवर्ण पदके प्रदान करण्यात आली. पदव्युत्तर (एम.टेक) अभियांत्रिकीच्या अव्वलस्थानी गौरव मानकर (थर्मल), संतोष कणसे (स्ट्रक्चरल), सायली राउत (ईलेक्ट्रीकल पॉवर सिस्टीम), स्वराज खंडेश्वर व वैष्णवी गुल्हाने (परिसर अभियांत्रिकी), प्रणिता मागान्ती (संगणक विज्ञान), अदिती गायगोले (अणुविद्युत), शरयू बेलसरे (जिओटेक्निकल), सुरेंद्रकुमार आगाशे (प्रोडक्शन) यांना मान्यवरांच्या हस्ते विशेष प्रावीण्य प्रमाणपत्राद्वारे सन्मानित करण्यात आले.

टॅग्स :collegeमहाविद्यालय