शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राम्होस क्षेपणास्त्र डागणार...
3
Video: पाक समर्थकांना एकटाच भिडला परदेशी नागरिक; हाती तिरंगा घेत 'जय महाराष्ट्र'ची घोषणा
4
दिलजीत दोसांझने 'पॉप क्वीन' शकिरालाही हसवलं, Met Gala साठी दोघं एकाच व्हॅनिटीतून पोहोचले
5
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
6
पीएम किसान सन्मान निधीच्या २०व्या हप्त्यापूर्वी मोठा बदल; 'या' शेतकऱ्यांना होणार फायदा
7
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
8
LIC नं मार्च तिमाहीत खरेदी केले ₹४७,००० कोटी रुपयांचे शेअर्स; 'या' स्टॉक्समध्ये मोठी गुंतवणूक, तुमच्याकडे आहे का?
9
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
10
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
11
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
12
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
13
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
14
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
15
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
16
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
17
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
18
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
19
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
20
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार

तूर दवाळबाधित, हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी ...

ठळक मुद्देबबलू देशमुख : तत्काळ सर्वेक्षण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शासनाला दिला.सलग दुष्काळ, शेतमालास हमीभाव नाही, सरसकट कर्जमाफी नाही आदी कारणांमुळे आज जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे, यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला नाही. शेतकºयांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्यानेच शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, मात्र, यामध्येही सरसकट कर्जमाफी न करता शासनाने शेतकऱ्यांची फसवणूककेलेली आहे. आता सहा महिने होऊन गेले असतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही. कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाले, यासाठी शासन मदत देण्याची घोषणादेखील संपूर्ण फसवी ठरली आहे. अपुºया पावसाळ्यामुळे तुरीच्या उत्पादनात आधीच कमी येत असताना थंडीमुळे दवाळबाधित होऊन शेतातील उभी तूर जाग्यावरच सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शासनाने तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश देऊन तूर उत्पादकाला हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत करावी, अशी मागणी बबलू देशमुख यांनी पत्रकाद्वारे केली.शासन दगाबाज, वर्षभरानंतरही शेतकऱ्यांना मदत नाहीमागील वर्षी बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. गेल्या वर्षी अतिथंडीमुळे जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरमधील तुरीवर दवाळ गेल्याने जाग्यावरच सुकली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिलेत. मात्र, यंदाचा हंगाम संपत आला असतानाही शासनाने नैसर्गिक आपत्तीची मदत दिलेली नाही. त्यामुळे हे शासनच शेतकऱ्यांसाठी दगाबाज ठरत आहे. त्यांना शेतकºयांना मदतीसाठी केलेल्या घोषणांची आठवण करून देऊ, यासाठी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरू व या सरकारला त्यांच्या घोषणांची आठवण करून देत शेतकऱ्यांना न्याय देऊ, असे बबलू देशमुख यांनी सांगीतले.