शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

तूर दवाळबाधित, हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी ...

ठळक मुद्देबबलू देशमुख : तत्काळ सर्वेक्षण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शासनाला दिला.सलग दुष्काळ, शेतमालास हमीभाव नाही, सरसकट कर्जमाफी नाही आदी कारणांमुळे आज जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे, यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला नाही. शेतकºयांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्यानेच शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, मात्र, यामध्येही सरसकट कर्जमाफी न करता शासनाने शेतकऱ्यांची फसवणूककेलेली आहे. आता सहा महिने होऊन गेले असतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही. कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाले, यासाठी शासन मदत देण्याची घोषणादेखील संपूर्ण फसवी ठरली आहे. अपुºया पावसाळ्यामुळे तुरीच्या उत्पादनात आधीच कमी येत असताना थंडीमुळे दवाळबाधित होऊन शेतातील उभी तूर जाग्यावरच सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शासनाने तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश देऊन तूर उत्पादकाला हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत करावी, अशी मागणी बबलू देशमुख यांनी पत्रकाद्वारे केली.शासन दगाबाज, वर्षभरानंतरही शेतकऱ्यांना मदत नाहीमागील वर्षी बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. गेल्या वर्षी अतिथंडीमुळे जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरमधील तुरीवर दवाळ गेल्याने जाग्यावरच सुकली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिलेत. मात्र, यंदाचा हंगाम संपत आला असतानाही शासनाने नैसर्गिक आपत्तीची मदत दिलेली नाही. त्यामुळे हे शासनच शेतकऱ्यांसाठी दगाबाज ठरत आहे. त्यांना शेतकºयांना मदतीसाठी केलेल्या घोषणांची आठवण करून देऊ, यासाठी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरू व या सरकारला त्यांच्या घोषणांची आठवण करून देत शेतकऱ्यांना न्याय देऊ, असे बबलू देशमुख यांनी सांगीतले.