शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
2
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
3
अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
4
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
5
Robert Kiyosaki Alert: 'लाखो लोक उद्ध्वस्त होतील, एक मोठा विनाश येणार...' ‘या’ दिग्गजाचा भयानक इशारा, सुटण्याचा मार्ग काय?
6
Stock Market Today: शेअर बाजाराची आजही सुस्त सुरुवात; ऑटो-FMCG शेअर्समध्ये विक्री
7
माजी क्रिकेट प्रशिक्षकाची हत्या, हल्लेखोरांनी पत्नी आणि सुनेसमोरच झाडल्या गोळ्या  
8
प्रियकरासमोरच गाडीतून खेचत नेलं, विमानतळाजवळ सामूहिक अत्याचार; पोलिसांकडून आरोपींचा एन्काऊंटर
9
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
10
मेट्रोत पुन्हा तांत्रिक बिघाड; प्रवाशांना गाडीतून उतरवले; कार्यालय सुटण्याच्या वेळीच गोंधळ
11
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
12
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
13
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
14
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
15
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
16
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
17
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
18
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
19
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
20
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य

तूर दवाळबाधित, हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2018 01:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी ...

ठळक मुद्देबबलू देशमुख : तत्काळ सर्वेक्षण करा, अन्यथा रस्त्यावर उतरू

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अपुऱ्यां पावसाने यंदाचा खरीप हंगाम उद्ध्वस्त झाला. कपाशीचे पीक हातचे गेले आता तुरीवरदेखील दवाळचे संकट ओढावले आहे. शेतकरी आर्थिक संकटात आहे, त्यामुळे शासनाने तुरीच्या सर्वेक्षणाचे तत्काळ आदेश देऊन हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्यावी, अन्यथा रस्त्यावर उतरून जाब विचारू, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी शासनाला दिला.सलग दुष्काळ, शेतमालास हमीभाव नाही, सरसकट कर्जमाफी नाही आदी कारणांमुळे आज जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक संकटात आहेत. कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या वाढलेल्या आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे, यासाठी कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाने घेतला नाही. शेतकºयांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्यानेच शासनाला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, मात्र, यामध्येही सरसकट कर्जमाफी न करता शासनाने शेतकऱ्यांची फसवणूककेलेली आहे. आता सहा महिने होऊन गेले असतानाही शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ अद्याप मिळालेला नाही. कपाशीचे पीक बोंडअळीने उद्ध्वस्त झाले, यासाठी शासन मदत देण्याची घोषणादेखील संपूर्ण फसवी ठरली आहे. अपुºया पावसाळ्यामुळे तुरीच्या उत्पादनात आधीच कमी येत असताना थंडीमुळे दवाळबाधित होऊन शेतातील उभी तूर जाग्यावरच सुकत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शासनाने तत्काळ सर्वेक्षणाचे आदेश देऊन तूर उत्पादकाला हेक्टरी ५० हजारांची सरसकट मदत करावी, अशी मागणी बबलू देशमुख यांनी पत्रकाद्वारे केली.शासन दगाबाज, वर्षभरानंतरही शेतकऱ्यांना मदत नाहीमागील वर्षी बेभाव विकल्या गेलेल्या सोयाबीनचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळाले नाही. गेल्या वर्षी अतिथंडीमुळे जिल्ह्यातील २५ हजार हेक्टरमधील तुरीवर दवाळ गेल्याने जाग्यावरच सुकली. जिल्हाधिकाऱ्यांनी सर्वेक्षणाचे आदेश दिलेत. मात्र, यंदाचा हंगाम संपत आला असतानाही शासनाने नैसर्गिक आपत्तीची मदत दिलेली नाही. त्यामुळे हे शासनच शेतकऱ्यांसाठी दगाबाज ठरत आहे. त्यांना शेतकºयांना मदतीसाठी केलेल्या घोषणांची आठवण करून देऊ, यासाठी आक्रमक होऊन रस्त्यावर उतरू व या सरकारला त्यांच्या घोषणांची आठवण करून देत शेतकऱ्यांना न्याय देऊ, असे बबलू देशमुख यांनी सांगीतले.