शहरं
Join us  
Trending Stories
1
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
2
"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
3
8th Central Pay Commission : आठव्या वेतन आयोगात या कर्मचाऱ्यांचा समावेश होणार, नवीन नियम जाणून घ्या
4
दिल्ली स्फोट घडवणाऱ्या दहशतवाद्यांकडे एवढा पैसा आला कुठून? आता सगळ्यांची कुंडली काढणार
5
पगारदार कर्मचाऱ्यांसाठी EPFO ची खास योजना; 'VPF' द्वारे मिळवा FD पेक्षा जास्त सुरक्षित परतावा
6
सूर्य गोचर २०२५: १६ नोव्हेंबर, बुधादित्य योगात 'या' ७ राशींच्या व्यक्तिमत्त्वाला मिळेल नवी झळाळी!
7
फक्त ६ महिन्यांत पैसा डबल! कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 3 वर्षांत दिला 2300% परतावा!
8
निर्मात्यांकडे ना बजेट आहे ना पेैसा, प्रसिद्ध अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, आजही करावा लागतो संघर्ष
9
बाई हा काय प्रकार? लिप फिलरने हवा होता एकदम ग्लॅमरस लूक, पण ओठ इतके सुजले की...
10
VIDEO: बिबट्याच्या धाडसाला सलाम! ना घाबरला, ना शरण गेला... ५ मगरींना बिनधास्त एकटा भिडला !
11
एका श्वानामुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा, रोमान्स करताना नको ते घडले; पतीने मागितला घटस्फोट
12
दिल्ली स्फोट प्रकरणात देवेंद्र अन् अमितही अडकणार? चौकशी होणार? 'असं' आहे या दोघांच कनेक्शन 
13
Delhi Blast: दिल्ली स्फोट प्रकरणात मोठी अपडेट, चौथी संशयित कार जप्त, कुठं सापडली? 
14
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकाणी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
15
बिहार विधानसभा निकालापूर्वी गुंतवणूकदार सावध? बाजार सपाट बंद; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
16
Vastu Tips: तिजोरीत स्थिर लक्ष्मी हवी? घरात करा हे ६ बदल, पैसा टिकेल आणि वाढेलही!
17
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
18
एसबीआयला ४,४०० रुपयांचा चुकीचा दंड लावणे महागात! आता द्यावी लागणार १.७० लाख रुपये भरपाई
19
IPL 2026: शेन वॉटसनचे आयपीएलमध्ये पुनरागमन, 'या' संघाशी जुडलं नाव!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदानावरील फळबाग योजनांसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन; दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ. चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला ...

तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन;

दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ.

चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला सलग फळबाग लागवडसह, बांधावरील वृक्ष लागवड, फुलपिके लागवड, नाडेप कंपोस्ट, गांडूळ खत, विहीर पुनर्भरण इत्यादी योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. तरी अनुदानावरील फळबागसह इतरही योजनांच्या

लाभासाठी शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करावे, असे तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड,यांनी प्रेस नोटद्वारे कळविले आहे.

सदर योजना ही फक्त दोन हेक्टर क्षेत्रधारक शेतकऱ्यांसाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जाॅबकार्ड, माती, पाणी परीक्षण अहवाल, ग्रामसभेचा ठराव, ७/१२, ८/अ, इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ दोन हेक्टर क्षेत्रापर्यंतचे अल्प, अत्यल्प शेतकरी घेऊ शकतात, तसेच अनुचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, यांचा योजनेसाठी प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल.

फळबाग लागवडकरिता संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, आंबा, पेरू, चिकू, इत्यादींना अनुदान देण्यात येईल, तसेच बांधावरील लागवडीसाठी सांग, बांबू, शेवगा, कडूनिंब, सोनचाफा बोर, सीताफळ, आवळा, आंबा, इत्यादींना अनुदान देय असेल. त्याचप्रमाणे फुलपिकामध्ये निशिगंध, गुलाब, मोगरा, यासाठी अनुदान देण्यात येईल. कंपोज खत व गांडूळ खताच्या प्रत्येकी एका युनिटसाठी ११ हजार रुपये अनुदान देण्यात येईल. विहीर पुनर्भरणकरिता १४ हजार रुपये अनुदान देय असेल. तरी निकषात बसणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर, आपले प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे.

प्रस्ताव सादर करण्यात शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी, संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदूरबाजार यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून परदेस नोटमध्ये कळविण्यात आले आहे.

(कमी पावसात पेरणी करू नका. सध्या तालुक्यातील काही भाग वगळता, अन्य ठिकाणी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तरी तालुक्यातील ज्या भागात कमी पाऊस झाला आहे, येथील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. आपल्या परिसरात ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. -- तालुका कृषी विभाग.चांदूर बाजार.)