शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
2
राजीनामा-शासन भिकारी, माणिकराव कोकाटेंच्या विधानावर CM फडणवीसांची प्रतिक्रिया; म्हणाले...
3
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
4
“माणिकराव कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिंमत CM फडणवीस यांच्यात नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
Video : चाकू काढला आणि ३२ हजारांचा लेहेंगा फाडला, दुकानदाराला म्हणाला, 'तुलाही असाच फाडेन'; कल्याणमधील व्हिडीओ व्हायरल
6
Post Office मध्ये जमा करा १ लाख, मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स व्याज; चेक करा डिटेल्स
7
प्राजक्ता माळीसोबत फोटो हवा म्हणून त्याने लिफ्टच थांबवली, पुढे काय घडलं? Video व्हायरल
8
कसोटीत सर्वाधिक मेडन ओव्हर्स टाकणारे टॉप ५ भारतीय गोलंदाज!
9
उज्ज्वल निकम आता यापुढे संतोष देशमुख प्रकरणाची केस लढणार नाहीत? पण कारण काय? चर्चांना उधाण
10
अदानी-महिंद्रासह दिग्गज स्टॉक्स गडगडले! सेन्सेक्स-निफ्टी सपाट; मात्र 'या' शेअरने केली कमाल!
11
'गाढवाचं लग्न'मधील सावळ्या कुंभाराच्या खऱ्या गंगीला पाहिलंत का?, एकेकाळी होती प्रसिद्ध अभिनेत्री
12
कोंढव्यातील ‘त्या’ तरुणीवर गुन्हा दाखल; खोटी माहिती, पुरावे तयार करून पोलिसांची केली दिशाभूल
13
₹१५ वरुन ₹४५५ वर ट्रेड करतोय 'हा' शेअर; जोरदार तेजी, आता मोठा Whiskey ब्रँड खरेदी करण्याची तयारी
14
IND vs ENG: शुभमन गिल की सचिन तेंडुलकर? ३५ कसोटीनंतर कोण वरचढ? पाहा आकडे!
15
६२ वर्षांच्या सेवेनंतर मिग-२१ लढाऊ विमान निरोप घेणार; १९६५ च्या युद्धात पाकिस्तानला टक्कर दिलेली
16
स्वतःचं घर बांधण्याचं स्वप्न पाहताय? 'सेल्फ-कन्स्ट्रक्शन होम लोन' कसं मिळवायचं, व्याजासह प्रक्रिया जाणून घ्या
17
Deep Amavasya 2025: आषाढ अमावास्येला दिव्यांची आवस म्हणतात, गटारी नाही; धर्मशास्त्र सांगते...
18
ट्रेन सुटली तरीही वाया जात नाही तुमचं तिकीट...! रेल्वेचा हा नियम तुम्हाला कदाचितच माहित असेल
19
शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, मुक्ताईनगर बंद
20
Viral Video: महाकाय अजगराला जांभई देताना कधी पाहिलंय का? दृश्य पाहून तुम्हालाही भरेल धडकी...

अनुदानावरील फळबाग योजनांसाठी प्रस्ताव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:09 IST

तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन; दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ. चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला ...

तालुका कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन;

दोन हेक्टर क्षेत्र धारकांनाच मिळणार योजनेचा लाभ.

चांदूरबाजार - तालुक्यातील चांदूरबाजार तालुका कृषी विभागाला सलग फळबाग लागवडसह, बांधावरील वृक्ष लागवड, फुलपिके लागवड, नाडेप कंपोस्ट, गांडूळ खत, विहीर पुनर्भरण इत्यादी योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार आहे. तरी अनुदानावरील फळबागसह इतरही योजनांच्या

लाभासाठी शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करावे, असे तालुका कृषी अधिकारी अंकुश जोगदंड,यांनी प्रेस नोटद्वारे कळविले आहे.

सदर योजना ही फक्त दोन हेक्टर क्षेत्रधारक शेतकऱ्यांसाठी लागू आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी जाॅबकार्ड, माती, पाणी परीक्षण अहवाल, ग्रामसभेचा ठराव, ७/१२, ८/अ, इत्यादी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ दोन हेक्टर क्षेत्रापर्यंतचे अल्प, अत्यल्प शेतकरी घेऊ शकतात, तसेच अनुचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील लाभार्थी, भूसुधार योजनेचे लाभार्थी, इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी, यांचा योजनेसाठी प्राधान्यक्रमाने विचार करण्यात येईल.

फळबाग लागवडकरिता संत्रा, मोसंबी, कागदी लिंबू, सीताफळ, आवळा, आंबा, पेरू, चिकू, इत्यादींना अनुदान देण्यात येईल, तसेच बांधावरील लागवडीसाठी सांग, बांबू, शेवगा, कडूनिंब, सोनचाफा बोर, सीताफळ, आवळा, आंबा, इत्यादींना अनुदान देय असेल. त्याचप्रमाणे फुलपिकामध्ये निशिगंध, गुलाब, मोगरा, यासाठी अनुदान देण्यात येईल. कंपोज खत व गांडूळ खताच्या प्रत्येकी एका युनिटसाठी ११ हजार रुपये अनुदान देण्यात येईल. विहीर पुनर्भरणकरिता १४ हजार रुपये अनुदान देय असेल. तरी निकषात बसणाऱ्या शेतकरी लाभार्थ्यांनी लवकरात लवकर, आपले प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात सादर करावे.

प्रस्ताव सादर करण्यात शेतकऱ्यांना काही अडचणी आल्यास त्यांनी, संबंधित कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालय चांदूरबाजार यांच्याशी संपर्क साधावा, असेही कृषी विभागाकडून परदेस नोटमध्ये कळविण्यात आले आहे.

(कमी पावसात पेरणी करू नका. सध्या तालुक्यातील काही भाग वगळता, अन्य ठिकाणी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. तरी तालुक्यातील ज्या भागात कमी पाऊस झाला आहे, येथील शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. आपल्या परिसरात ८० ते १०० मि.मी. पाऊस झाल्यानंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. -- तालुका कृषी विभाग.चांदूर बाजार.)