शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राज्य वनसेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदके देण्याचा प्रस्ताव प्रलंबित

By गणेश वासनिक | Updated: July 18, 2024 21:48 IST

वरिष्ठांचे दुर्लक्ष, चार वर्षांपासून वनकर्मचाऱ्यांना पदके दिली नाहीत, आयएफएस अधिकाऱ्यांकडून बोळवण

अमरावती: महाराष्ट्र वन विभागातील वनांचे संरक्षण, व्यवस्थापन व संवर्धन प्रभावीपणे होण्याकरीता क्षेत्रीय स्तरावर कार्यरत वनमजूर, वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्र अधिकारी, सहाय्यक वनसंरक्षांचे मनोधैर्य वाढविणे आणि त्यांच्या उत्कृष्ठ कार्याबाबत प्रोत्साहित करण्याकरीता पुरस्कार देण्याची योजना आहे. मात्र गत चार वर्षापासून यासंदर्भातील प्रस्ताव प्रलंबित असून, आयएफएसच्या वरिष्ठांनी याकडे अक्षम्य दुर्लक्ष चालविल्याची ओरड आहे.

शासनाच्या महसूल व वनविभागाच्या ६ डिसेंबर २००० रोजीच्या निर्णयानुसार वनमजूर ते उपवनसंरक्षक पदापर्यंत अधिकारी, कर्मचारी यांना विविध कार्यप्रकारात पदके दिली जातात. परंतु गत ४ वर्षापासून ही पदके वनकर्मचाऱ्यांना दिलेली नाहीत. सद्य:स्थितीत सन २०२० ते २०२४ या चार वर्षाच्या कालावधीतील पदके प्रदान करण्यात आली नाहीत. शासन व वरिष्ठ अधिकारी विविध योजना या वन कर्मचारी व अधिकारी यांच्यामार्फत राबवितात.

परंतु दुर्गम व अवघड परिस्थितीत कार्यरत वनकर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढविण्याकरीता फारसा प्रयत्न होताना दिसत नाही, असा वन विभागाचा कारभार सुरु आहे. मागील काही कालावधीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० कोटी वृक्षलागवडीची योजना राबविली होती. यामध्ये क्षेत्रीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. मात्र अलीकडे वन विभागात सचिव आणि वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची चलती असल्याचे दिसून येते. त्यामुळे क्षेत्रीय वनकर्मचारी किंवा महाराष्ट्र वनसेवेतील अधिकाऱ्यांच्या अडचणी सोडविण्याबाबत जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.मोक्याच्या जागेसाठी ‘आयएफएस’ने निर्माण केले पदेभारतीय वनसेवेतील अधिकाऱ्यांनी (आयएफएस) संरक्षण व व्यवस्थापनाकरीता एका वनपरिक्षेत्रापेक्षाही कमी वनक्षेत्र असताना महत्वाच्या व मोठ्या शहरामध्ये राहता यावे, याकरीता विविध पदे निर्माण करुन घेतली आहेत. मुंबईच्या बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व्यवस्थापनाकरीता २००२ च्या संवर्ग आढाव्यानुसार उपवनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याची पदस्थापना व्हायची. परंतु, आता पदामध्ये दर्जावाढ करुन मुख्य वनसंरक्षक या संवर्गाचे पद करण्यात आले असून, त्यांचे अधिनस्त दोन उपसंचालकांचे पदे निर्माण केली आहेत.सन २०१८ व २०२२ मध्ये प्राप्त कर्मचाऱ्यांना पदके प्रदान केली आहेत. आता सुद्धा पदकांसाठी प्रकरणे दाखल झाली आहेत. छाननी केली जात असूृन शासनाकडे पुढील निर्णयासाठी पाठविले जाणार आहे. केवळ दोनच वर्षांचे पदके देण्याचे शिल्लक आहे.-एन. आर. प्रवीण, सीसीएफ

टॅग्स :Amravatiअमरावती