शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

बडनेरा ते नांदगाव पेठ मेट्रोचा प्रस्ताव

By admin | Updated: January 2, 2017 01:07 IST

मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याच्या मागणीने जोर धोर धरला आहे.

रवि राणांचा पुढाकार : पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना साकडे अमरावती: मुंबई, नागपूर व पुणेनंतर आता अमरावतीतही मेट्रो सुरू करण्याच्या मागणीने जोर धोर धरला आहे. बडनेरा ते नांदगाव पेठ पंचतारांकित औद्योगिक वसाहत दरम्यान मेट्रोचा प्रस्ताव आ. रवि राणा यांनी निवेदनाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केला. आ. राणा यांच्या मागणीनुसार, विदर्भात नागपूरनंतर अमरावती हे विभागीय स्तरावरील मोठे केंद्र आहे. अमरावती जिल्ह्याचा झपाट्याने विकास आणि विस्तार होत असल्याच्या पार्श्वभूमिवर मेट्रो सुरू करण्याच्या मागणीने यात विकासात्मकदृष्ट्या वाढ केली आहे. मेट्रोचा प्रस्ताव सादर करताना आ. राणांनी अमरावती महानगराचा प्रमुख भाग समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गलतच्या बडनेरा व नांदगाव पेठ या दोन प्रमुख शहरांना मेट्रोने जोडण्याचे त्यांनी प्रस्तावित केले आहे. भविष्यात नांदगाव पेठ येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहत परिसरात विविध उद्योग साकारले जाणार आहे. औद्योगिक वसाहतीमधील उद्योगधंद्याना कामगार, कुशल मनुष्यबळ लागणार आहे. बडनेरा शहरालगतच्या गाव, खेड्यातून मोठ्या संख्येने कामगार, मजूर हे रोजगारासाठी दरदिवशी अमरावती शहरात येतात. परंतु भविष्यात नांदगाव पेठ एमआयडीसीतील कारखाने, उद्योगधंद्यांना लागणारे कामगार, मजुरांना ये-जा करता यावी, यासाठी मेट्रो हे सुलभ व स्वत: असे साधन आहे. आ. राणांनी काळाची गरज लक्षात घेऊन बडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसीदरम्यान मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव केंद्र व राज्य शासनाकडे सादर केला आहे. नव्या वर्षात ही मागणी पूर्णत्वासाठी प्रयत्नांची परकाष्टा केली जाईल, असे आ. राणा यांनी बडनेरा येथे शनिवारी पार पडलेल्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात संकल्पदेखील सोडला, हे विशेष. मुंबई येथे एमएमआरडीसीच्या कार्यालयात सरत्या वर्षात मेट्रो विषयी बैठक पार पडली आहे. मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी, प्रवीण दराळे यांच्यासोबत आ. राणांनी बैठक घेतली आहे. (प्रतिनिधी) असा दिला मेट्रोचा मार्ग आ. रवि राणा यांनी बडनेरा ते नांदगाव पेठ एमआयडीसीदरम्यान मेट्रो सुरू करण्याची मागणी केली आहे. मेट्रोचा प्रस्ताव सादर करताना राणांनी मार्गदेखील सुचविला आहे. यात बडनेरा, साईनगर, गोपालनगर, नवाथे, राजापेठ, राजकमल चौक, कॉटनमार्केट चौक, इर्विन चौक, पंचवटी, अर्जुननगर, रहाटगाव पुढे नांदगाव पेठ या मार्गांचा समावेश केला आहे. पंचतारांकित एमआयडीसीत हे प्रकल्प येणार नांदगाव पेठ येथील पंचतारांकित एमआयडीसीत रेमण्ड, सियाराम कापड उद्योगांना मान्यता मिळाली आहे. इंडिया बुल्स औष्णिक वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. तसेच पतजंली फूड पार्क, भारत डायनामिक, हर्मन मेडिसीन प्रकल्प येणार आहे. टाटा, अशोक लेलॅण्डचे प्रकल्प लवकरच येणार असल्याची माहिती आ. रवि राणा यांनी दिली आहे. विकासाची पायाभरणी करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. मात्र नागरिकांच्या हाताला रोजगार मिळवून देण्याची नैतिक जबाबदारीसुद्धा आहे. त्यामुळे मजूर, कामगार, सामान्यांना ये-जा करता यावे, यासाठी बडनेरा ते नांदगाव पेठ दरम्यान मेट्रो सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. नव्या वर्षात तो मार्गी लावणारच. - रवि राणा, आमदार, बडनेरा मतदारसंघ