शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
2
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
3
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
4
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
5
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
6
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
7
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
8
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
9
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
10
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
11
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
12
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."
13
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
14
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
15
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
16
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
17
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
18
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
20
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!

‘स्मार्ट सिटी’साठी १७० पानांचा प्रस्ताव पाठविला

By admin | Updated: December 15, 2015 00:09 IST

देशात स्मार्ट सिटीसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या २० शहरांत अमरावतीचा समावेश व्हावा,....

केंद्र शासनाच्या निकषावर आधारित : ‘ग्रीन फिल्ड’ यादीत अमरावतीचे नावअमरावती : देशात स्मार्ट सिटीसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या २० शहरांत अमरावतीचा समावेश व्हावा, यासाठी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे महापालिकेने १७० पानांचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे.‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत समाविष्ट झाल्यानंतर केंद्र शासनाने निवड झालेल्या महापालिकांना ४३ प्रश्नांच्या प्रश्नावलीचा आराखडा प्रस्तावरुपाने पाठविण्याचे निर्देश दिले होते. १५ डिसेंबरपर्यंत हा प्रस्ताव केंद्राकडे सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार महापालिकेने पाच विभागान्वये १७० पानांचा आराखडा प्रस्ताव स्वरुपात उपायुक्त चंदन पाटील यांना मंत्रालयात घेऊन जाण्याचे निर्देशित केले आहे. हा प्रस्ताव मंगळवारी केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाचे (स्मार्ट सिटी) सहसचिव संजय शर्मा यांच्याकडे सादर केला जाणार आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजना, शहराची सद्यस्थिती, क्षेत्रविकास आराखडा, पॅनसिटी आराखडा, अंमलबजावणीबाबतचे नियोजन, आर्थिक नियोजन आदींचा समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे. या प्रस्तावासोबत डिव्हीडी, छायाचित्रे, क्षेत्रविकासाचे ‘एससीपी फॉर्मेट’ पाठविण्यात आले आहे. शासनाने केंद्राकडे पाठविलेल्या ग्रीन फिल्डच्या यादीत नाशिक, औरंगाबाद व अमरावतीचा समावेश असल्यामुळे पहिल्या २० शहरांच्या यादीत अमरावतीचे ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात नक्कीच नाव असणार, असा विश्वास आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केला. ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा पुणे येथील आलिया कंपनीने तयार केला आहे. मागील आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी नागपूर विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ फेज-२ साठी तयार केलेल्या प्रस्तावाचा आराखडा दाखविला आहे. राज्याने केंद्र शासनाकडे ‘स्मार्ट सिटी’साठी पाठविलेल्या १० शहरांमध्ये अमरावती शहराचे ग्रीन फिल्डमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात घोषित होणाऱ्या २० ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत अमरावतीची निवड होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’चे मॉडेल निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा सुटल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या बादफेरीत २० शहरांची निवड होणार आहे. शहराचा ‘स्मार्ट सिटी’त पहिल्या नंबर लागावे, यासाठी १०० टक्के प्रयत्न करण्यात आले आहेत. ४३ प्रश्नांच्या प्रश्नावलीत शहराला अव्वल स्थान मिळेल. इतर महापालिकांच्या तुलनेत अमरावतीचा प्रस्ताव सर्वांगिण आहे.- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महानगरपालिका.