शहरं
Join us  
Trending Stories
1
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
2
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
3
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
4
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
5
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
6
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
7
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
8
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
9
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
10
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
11
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
12
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
13
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
14
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
15
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
16
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
17
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
18
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
19
"...तोपर्यंत मी तुरुंगात राहण्यास तयार आहे"; सोनम वांगचुक यांनी जोधपूरहून भावाकडे पाठवला मेसेज
20
INDW vs PAKW: अचानक मैदानात पसरला पांढरा धूर: भारत-पाक सामन्यात नेमकं काय घडलं?

‘स्मार्ट सिटी’साठी १७० पानांचा प्रस्ताव पाठविला

By admin | Updated: December 15, 2015 00:09 IST

देशात स्मार्ट सिटीसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या २० शहरांत अमरावतीचा समावेश व्हावा,....

केंद्र शासनाच्या निकषावर आधारित : ‘ग्रीन फिल्ड’ यादीत अमरावतीचे नावअमरावती : देशात स्मार्ट सिटीसाठी निवडल्या गेलेल्या पहिल्या २० शहरांत अमरावतीचा समावेश व्हावा, यासाठी केंद्र शासनाने ठरवून दिलेल्या निकषांच्या आधारे महापालिकेने १७० पानांचा प्रस्ताव केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयाकडे पाठविला आहे. आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या अथक प्रयत्नांचे हे फलित मानले जात आहे.‘स्मार्ट सिटी’ स्पर्धेत समाविष्ट झाल्यानंतर केंद्र शासनाने निवड झालेल्या महापालिकांना ४३ प्रश्नांच्या प्रश्नावलीचा आराखडा प्रस्तावरुपाने पाठविण्याचे निर्देश दिले होते. १५ डिसेंबरपर्यंत हा प्रस्ताव केंद्राकडे सादर करणे अनिवार्य आहे. त्यानुसार महापालिकेने पाच विभागान्वये १७० पानांचा आराखडा प्रस्ताव स्वरुपात उपायुक्त चंदन पाटील यांना मंत्रालयात घेऊन जाण्याचे निर्देशित केले आहे. हा प्रस्ताव मंगळवारी केंद्र शासनाच्या नगरविकास विभागाचे (स्मार्ट सिटी) सहसचिव संजय शर्मा यांच्याकडे सादर केला जाणार आहे. ‘स्मार्ट सिटी’च्या अनुषंगाने आतापर्यंत केलेल्या उपाययोजना, शहराची सद्यस्थिती, क्षेत्रविकास आराखडा, पॅनसिटी आराखडा, अंमलबजावणीबाबतचे नियोजन, आर्थिक नियोजन आदींचा समावेश या प्रस्तावात करण्यात आला आहे. या प्रस्तावासोबत डिव्हीडी, छायाचित्रे, क्षेत्रविकासाचे ‘एससीपी फॉर्मेट’ पाठविण्यात आले आहे. शासनाने केंद्राकडे पाठविलेल्या ग्रीन फिल्डच्या यादीत नाशिक, औरंगाबाद व अमरावतीचा समावेश असल्यामुळे पहिल्या २० शहरांच्या यादीत अमरावतीचे ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्पात नक्कीच नाव असणार, असा विश्वास आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केला. ‘स्मार्ट सिटी’चा आराखडा पुणे येथील आलिया कंपनीने तयार केला आहे. मागील आठवड्यात राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन क्षत्रिय यांनी नागपूर विधिमंडळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना महापालिकेने ‘स्मार्ट सिटी’ फेज-२ साठी तयार केलेल्या प्रस्तावाचा आराखडा दाखविला आहे. राज्याने केंद्र शासनाकडे ‘स्मार्ट सिटी’साठी पाठविलेल्या १० शहरांमध्ये अमरावती शहराचे ग्रीन फिल्डमध्ये नाव समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात घोषित होणाऱ्या २० ‘स्मार्ट सिटी’च्या यादीत अमरावतीची निवड होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ‘स्मार्ट सिटी’चे मॉडेल निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या जागेचा तिढा सुटल्याने प्रशासनाने सुटकेचा श्वास सोडला आहे.स्मार्ट सिटीच्या दुसऱ्या बादफेरीत २० शहरांची निवड होणार आहे. शहराचा ‘स्मार्ट सिटी’त पहिल्या नंबर लागावे, यासाठी १०० टक्के प्रयत्न करण्यात आले आहेत. ४३ प्रश्नांच्या प्रश्नावलीत शहराला अव्वल स्थान मिळेल. इतर महापालिकांच्या तुलनेत अमरावतीचा प्रस्ताव सर्वांगिण आहे.- चंद्रकांत गुडेवार, आयुक्त, महानगरपालिका.