शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

पाण्याचे योग्य नियोजन, शेतकरी सुुखावला

By admin | Updated: March 12, 2015 01:00 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर असताना ...

प्रशांत काळबेंडे जरुडविदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांची दुर्दशा पाहून तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी शरद उपसा जलसिंजन नावाचा दूरदर्शी आदर्श प्रकल्प निर्माण करून जरूड परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे. सध्या प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनामुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे.पाण्याच्या योग्य नियोजनामुळे हा संपूर्ण परिसर आंबिया बहाराच्या संत्राने सुजलाम् - सुफलाम् झाला आहे. शरद उपसा जलसिंचन योजनेमुळे बागायत शेतकऱ्यांना उभारी मिळाली असून तीन हजार एकर जमिन ओलिताखाली आली आहे. रखरखत्या उन्हात सन् १९९०-९५ या काळात जरूड परिसरात पाण्याच्या अतिवापरामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. शेतकरी हवालदिल झाले होते. होते नव्हते पैैसे खर्च करून वेळप्रसंगी पत्नीचे मंगळसूत्र विकून कुपनलिका शेतात खोदून कोठून पाणी मिळते कां ते पाहत होते. परंतु सुमारे १२०० ते १५०० ुफूट खोल बोअर करूनही शेतकऱ्यांना कुठेही पाणी दिसत नव्हते. जमिनीची चाळणी करूनही पाण्याचा थेंबही शेतकऱ्यांच्या हाती लागत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. संत्र्याची उभी झाडे वाळताना पाहून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्यात. तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी गावचे हें विदारक दृष्य पाहून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपाययोजनांची चाचपणी सुरू केली. त्यानंतर विरोधकांची अवहेलना व अडचणींवर मात करून उभा राहीला तो ‘शरद उपसा जलसिंचन प्रकल्प ! ’ अनेक विरोधकांनी हा प्रकल्प यशस्वी होऊच शकत नाही. असा सूर काढला होता. परंतु कोणत्याही विरोधाला न जुमानता घेतलेला चांगला निर्णय काही वर्षाने तो मैैैैैैैैलाचा दगड ठरतो. आज परीसरात केवळ शरद उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातुन पाण्याची पातळी तर वाढलीच परंतु त्या काळी वाळलेल्या संत्राच्या झाडांना नवसंंजीवनी देऊन आज आंबिया बहाराच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची उलाढाल जरूड परिसरातून होते. जिल्ह्यात संपूर्ण रखरखत्या उन्हात संत्राच्या आंबिया बहाराला टिकवून ठेवण्याचे काम शरद उपसाचे पाणी व जरूडचे शेतकरी मोठ्या उत्साहाने करतात. एकेकाळी आपली आर्थिक परीस्थिती डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनीही संत्र्याच्या आंबिया बहाराने नवी उभारी घेतली आहे. दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होवून जरूड परिसरातील आंबिया बहाराचा संत्रा देश -विदेशात पोहचला जातो. यासाठी देशातील अनेक व्यापारी परिसरात तळ ठोकून बसतात. ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटर लांबीवर ३ हजार एकर शेतीला पाणी देणारी शरद उपसा जलसिंचन योजनेचे कार्य सुस्थितीत सुरू आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट, शेततळे, क ोल्हापुरी शेतबंधारे मोहीम राबविण्यात आली. ड्रायझोनमध्ये गेलेला परिसर काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे सुरू आहे.