शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025 Date: बिहारमध्ये निवडणुकीचा बिगुल! विधानसभेच्या २४३ जागांसाठी दोन टप्प्यांत मतदान; बालदिनी निकाल
2
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
3
मोठी बातमी! राज्यातील २४७ नगरपालिका, १४७ नगरपंचायतींसाठी आरक्षण जाहीर; कोण मिळवणार सत्तेची खुर्ची?
4
SIP की RD? दरमहा गुंतवणूक कुठे करावी? तज्ज्ञांच्या मते 'हा' आहे मोठा फरक, निर्णयापूर्वी वाचा महत्त्वाचे मुद्दे
5
'जेव्हा तू खराब फॉर्मशी झुंजशील, तेव्हा..." धोनीनं दिलेला कानमंत्र सिराजसाठी ठरतोय करिअरचा यु-टर्न
6
VIDEO: अमेरिकन बुद्धिबळपटूनं भारताच्या डी. गुकेशच्या 'राजा'ला प्रेक्षकांमध्ये का फेकलं?
7
"मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधींबद्दल वापरलेली भाषा निषेधार्ह, त्यांच्या वक्तव्यांना राजकीय वास’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया   
8
"देशात पेरलं जाणारं विष आता...'; सरन्यायाधीशांवर हल्ल्याचा प्रयत्न, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता
9
आयटी, फार्मा आणि बँकिंग क्षेत्रात तेजी! निफ्टी २५,००० च्या पुढे; गुंतवणूकदारांनी कमावले २.०१ लाख कोटी
10
नवा ट्रेंड! मूल नको, कुत्रा-मांजर हवं; मुलांची जागा घेतली प्राण्यांनी, का वाढतंय पेट पॅरेंटिंग?
11
“१९९४ला आमच्या हक्काचे १६ टक्के शरद पवारांनी ओबीसींना दिले, आमचे वाटोळे केले”: मनोज जरांगे
12
’प्रस्तावाची वाट कसली पाहता, अमित शाहांच्या दौऱ्याआधीच शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करायला हवे होते’, काँग्रेसचा टोला   
13
‘आनंदाचा शिधा’वर पुन्हा गदा! आर्थिक चणचणीमुळे योजनेसाठी निधीच नाही; गरिबांची दिवाळी फराळाविना
14
“मनोज जरांगेंना आता देव झाल्यासारखे वाटतेय, काही झाले तर चिठ्ठीत लिहिणार की...”: वडेट्टीवार
15
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारताने पाकिस्तानचे F-16 विमानाचे नुकसान केले होते, अमेरिकेने त्यांची दुरुस्ती केली
16
Flipkart: फ्लिपकार्टकडून ग्राहकांची फसवणूक? ५ हजारांचा पास घेऊनही आयफोन न मिळाल्यानं ग्राहक संतप्त
17
अंबानींच्या अँटिलियाला कडवी टक्कर! 'या' अब्जाधीश राजकारण्याची इमारत अँटिलियापेक्षा उंच आणि अलिशान
18
IAS Govind Jaiswal : लोकांनी खिल्ली उडवली पण 'तो' डगमगला नाही; रिक्षा चालकाच्या लेकाने IAS होऊन दिलं उत्तर
19
सरन्यायाधीशांवर बूट फेकण्याचा प्रयत्न; गोंधळ घालणाऱ्या 'त्या' वकिलाला काय शिक्षा होणार?
20
"गर्लफ्रेंडमुळे तीन वर्षे जगायला मिळाली, आता..."; नाशिकमध्ये विद्यार्थ्याने इंजिनिअरिंग कॉलेजमध्येच आयुष्य संपवलं

पाण्याचे योग्य नियोजन, शेतकरी सुुखावला

By admin | Updated: March 12, 2015 01:00 IST

विदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर असताना ...

प्रशांत काळबेंडे जरुडविदर्भाचा कॅलिफोर्निया म्हणून ओळखला जाणारा जरूड-वरूड परिसर १९९० च्या काळातील पाण्याच्या दुर्भीक्ष्यामुळे वाळवंट होण्याच्या मार्गावर असताना शेतकऱ्यांची दुर्दशा पाहून तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी शरद उपसा जलसिंजन नावाचा दूरदर्शी आदर्श प्रकल्प निर्माण करून जरूड परिसरातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी दिली आहे. सध्या प्रकल्पातील पाण्याच्या नियोजनामुळे या भागातील शेतकरी सुखावला आहे.पाण्याच्या योग्य नियोजनामुळे हा संपूर्ण परिसर आंबिया बहाराच्या संत्राने सुजलाम् - सुफलाम् झाला आहे. शरद उपसा जलसिंचन योजनेमुळे बागायत शेतकऱ्यांना उभारी मिळाली असून तीन हजार एकर जमिन ओलिताखाली आली आहे. रखरखत्या उन्हात सन् १९९०-९५ या काळात जरूड परिसरात पाण्याच्या अतिवापरामुळे पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले होते. शेतकरी हवालदिल झाले होते. होते नव्हते पैैसे खर्च करून वेळप्रसंगी पत्नीचे मंगळसूत्र विकून कुपनलिका शेतात खोदून कोठून पाणी मिळते कां ते पाहत होते. परंतु सुमारे १२०० ते १५०० ुफूट खोल बोअर करूनही शेतकऱ्यांना कुठेही पाणी दिसत नव्हते. जमिनीची चाळणी करूनही पाण्याचा थेंबही शेतकऱ्यांच्या हाती लागत नसल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती खालावत चालली होती. संत्र्याची उभी झाडे वाळताना पाहून अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्याही केल्यात. तत्कालीन कृषीमंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी गावचे हें विदारक दृष्य पाहून आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन उपाययोजनांची चाचपणी सुरू केली. त्यानंतर विरोधकांची अवहेलना व अडचणींवर मात करून उभा राहीला तो ‘शरद उपसा जलसिंचन प्रकल्प ! ’ अनेक विरोधकांनी हा प्रकल्प यशस्वी होऊच शकत नाही. असा सूर काढला होता. परंतु कोणत्याही विरोधाला न जुमानता घेतलेला चांगला निर्णय काही वर्षाने तो मैैैैैैैैलाचा दगड ठरतो. आज परीसरात केवळ शरद उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातुन पाण्याची पातळी तर वाढलीच परंतु त्या काळी वाळलेल्या संत्राच्या झाडांना नवसंंजीवनी देऊन आज आंबिया बहाराच्या माध्यमातून कोट्यवधी रूपयांची उलाढाल जरूड परिसरातून होते. जिल्ह्यात संपूर्ण रखरखत्या उन्हात संत्राच्या आंबिया बहाराला टिकवून ठेवण्याचे काम शरद उपसाचे पाणी व जरूडचे शेतकरी मोठ्या उत्साहाने करतात. एकेकाळी आपली आर्थिक परीस्थिती डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांनीही संत्र्याच्या आंबिया बहाराने नवी उभारी घेतली आहे. दरवर्षी कोट्यावधींची उलाढाल होवून जरूड परिसरातील आंबिया बहाराचा संत्रा देश -विदेशात पोहचला जातो. यासाठी देशातील अनेक व्यापारी परिसरात तळ ठोकून बसतात. ७५ मीटर उंचीवर १३ किलोमीटर लांबीवर ३ हजार एकर शेतीला पाणी देणारी शरद उपसा जलसिंचन योजनेचे कार्य सुस्थितीत सुरू आहे. पाणी अडवा पाणी जिरवा या मोहिमेंतर्गत नाला खोलीकरण, सिमेंट, शेततळे, क ोल्हापुरी शेतबंधारे मोहीम राबविण्यात आली. ड्रायझोनमध्ये गेलेला परिसर काढण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणे सुरू आहे.