शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

राज्यात वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बढतीत गौडबंगाल?

By गणेश वासनिक | Updated: December 11, 2023 17:23 IST

वनविभागात आरएफओंची एकूण ९९६ पदे कार्यरत आहेत.

अमरावती : राज्याच्या वनविभागात ‘फिफ्टी - फिफ्टी’नुसारच्या फार्म्युल्याने पदोन्नत आणि सरळसेवा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची पदे भरली जातात. मात्र, नुकत्याच झालेल्या आरएफओंच्या डीपीडीसीच्या बैठकीत सरळसेवेतील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांचा प्रशिक्षण कालावधी ग्राह्य धरून त्यांना सहायक वनसंरक्षक पदांवर बढती देण्याचा घाट मंत्रालयाने घातला आहे.

वनविभागात आरएफओंची एकूण ९९६ पदे कार्यरत आहेत. २०१६पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून ५० टक्के जागा भरल्या जातात. सरळसेवेतून आरएफओ म्हणून येणाऱ्या वनाधिकाऱ्यांना दीड वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सेवेत दाखल करून घेतले जाते आणि तेथूनच त्यांंना सेवाज्येष्ठता लागू होते. मात्र, सहायक वनसंरक्षकांच्या बढतीमध्ये प्रशिक्षण कालावधी हा सेवाज्येष्ठता कालावधी गृहीत धरण्याची शक्कल वनमंत्रालयाने लढविली आहे. सन २०१३ - २०१४ मध्ये वनपाल पदावरून आरएफओ या पदावर पोहोचलेल्यांना बढतीत स्थान न देता सन २०१९मध्ये रूजू झालेल्या सरळसेवा आरएफओंना बढती देण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. ७ डिसेंबर २०२३ रोजी अत्यंत गोपनीय पद्धतीने १४७ पदांसाठी डीपीडीसी घेण्यात आली असून, या बढतीमध्ये सरळसेवा आरएफओंना मोठ्या प्रमाणात स्थान मिळण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कारण पदोन्नत आरएफओंना तदर्थ श्रेणीत हेरून त्यांची सेवाज्येष्ठता या बढतीत डावलली जात असल्याने नाराजीचा सूर उमटत आहे.

टॅग्स :Amravatiअमरावती