शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

प्रगतीच्या चार ‘प्र’मधूनच उत्कर्ष, उन्नती

By admin | Updated: February 7, 2016 01:04 IST

प्रगतीचे चार ‘प्र’ म्हणजे प्रयत्न, प्रेरणा, प्रेम व प्रार्थना आहेत. यामधूनच आपली उत्कर्ष व उन्नती होते,

प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै : अचलपूर बाजार समितीमध्ये उसळला जनसागरअचलपूर/परतवाडा : प्रगतीचे चार ‘प्र’ म्हणजे प्रयत्न, प्रेरणा, प्रेम व प्रार्थना आहेत. यामधूनच आपली उत्कर्ष व उन्नती होते, असा जीवन आनंदीत करण्याचा अमूल्य संदेश सदगुरू वामनराव पै यांचे सुपुत्र प्रबोधक प्रल्हाद पै यांनी दिला. ते जीवन विद्या मिशनअंतर्गत हीरक महोत्सवानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर आयोजित समाज प्रबोधनाच्या ‘तुमचा उत्कर्ष, तुमच्या हातात’ या विषयावर शनिवारी सायंकाळी प्रबोधन करीत होते. यावेळी परतवाडा, अचलपूर या जुळ्या नगरीतील शेकडो महिला पुरूष व नागरिक उपस्थित होते. सदगुरू वामनराव पै यांचे विचार मागील ६० वर्षांपासून समाजात मांडल्या जात आहे. जीवन जगण्यासाठी काय करायचे, आणि थोर मोठी मानस कशी झाले, असे अनेक उदाहरण प्रबोधक प्रल्हाद पै यांनी आपल प्रबोधनातून दिले. संतांनी देशभक्ती व राष्ट्रभक्ती, स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. स्वच्छता ही बाहेरुन सुरू करुन आतपर्यंत आली पाहिजे. सदगुरू वामनराव पै यांनी आपले ६० वर्ष अंधश्रध्दा निर्मूलनासाठी खर्च केले. सदगुरूंनी घरी बसून जीवनविद्या अवगत केली नाही. समाजाचे भले व्हावे यासाठी तयार केल्याचे प्रल्हाद पै यांनी सांगितले. पुढे उद्बोधन करताना पै म्हणाले, उत्कर्षासाठी सर्वजण हस्तरेषा बघतात, अशी लोकांना सवय आहे. वाईट नशिबावर आणि चांगले आपले असे म्हणणे चूक आहे. आपण विमानाने प्रवास करतो आणि अपघात झाला हा अपवाद आहे. शून्यातून मोठे झाले आहेत, कारण ते मोठे झालेत. त्यांच्यामध्ये जिद्द होती. प्रयत्न, पुण्य व संधी या सर्वांचा योग म्हणजे नशीब. यशासाठी पुण्याईची गरज लागते. अनुकूल परिस्थिती राहते तेव्हाच यश मिळते. वास्तववाद स्वीकारण्याचे आवाहन सदगुरूंनी केले. दैववाद सांगितला नाही. विकासवाद, उत्कर्ष आणि उन्नती जेव्हा हातात हात घालून जातील तेव्हाच विकास होतो, असे सदगुरूंनी सांगितले. निद्रा आणि जागृती, प्रपंच आणि परमार्थ जीवनाच्या दोन बाजू आहेत. उत्कर्ष म्हणजे पैसा आपण त्यामागे धावतो हे चुकीचे आहे. उत्कर्ष हा एक प्रयत्न आहे. तो लहानपणाच्या सापसिडीसारखा असतो. उन्नती म्हणजे मनाचे उन्नयण होय, मनशुध्द करणे, शांत, निवांत कराल तर तन-मन उन्नत होईल. परमेश्वर म्हणजे कोणतीच मूर्ती नाही, परमेश्वर म्हणजे आनंद आहे. आपण तो घेत नाही. त्यामुळे सतत दु:ख सुरू राहते. दृष्टी बदलली की जीवनात आनंदच आनंद असतो, असे प्रबोधक प्रल्हाद पै यांनी सांगितले. (प्रतिनिधी)