शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
3
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
4
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
5
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
6
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
7
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
8
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
9
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
10
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
11
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
12
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
13
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती
14
आजचे राशीभविष्य : ०८ जून २०२५; आर्थिक लाभ संभवतात, विवाद व बौद्धिक चर्चेपासून दूर राहा
15
शैक्षणिक दाखले, शपथपत्रासाठी स्टॅम्प पेपरची मागणी नियमबाह्य! महसूलमंत्री बावनकुळे यांची अधिकाऱ्यांना तंबी
16
पिनकाेड विसरा; आता हा ‘पीन’ सांगेल हवा असलेला अचूक पत्ता, टपाल विभागाने सुरू केली नवीन डिजिपीन प्रणाली
17
छोट्या-छोट्या गरजांसाठी आधी घ्यावे लागायचे कर्ज, शेती क्षेत्रात झाले चांगले बदल, पंतप्रधान नरेंद्र मोदी
18
गृहप्रकल्पाच्या साइट प्रमोशनसाठी ड्रोन उडविले, अंधेरी येथे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
19
निकृष्ट अन्नधान्य कैद्यांना पुरविले; राजू शेट्टींच्या आरोपांमुळे अमिताभ गुप्ताही घेऱ्यात; जालिंदर सुपेकर, कंत्राटदार झंवर हेही रडारवर
20
छत्तीसगड सीमेवर चकमक : नक्षल कमांडर ‘भास्कर’ला कंठस्नान, ३ दिवसांत ७ नक्षलवादी ठार

प्रगतीच्या चार ‘प्र’मधूनच उत्कर्ष, उन्नती

By admin | Updated: February 7, 2016 01:04 IST

प्रगतीचे चार ‘प्र’ म्हणजे प्रयत्न, प्रेरणा, प्रेम व प्रार्थना आहेत. यामधूनच आपली उत्कर्ष व उन्नती होते,

प्रबोधक प्रल्हाद वामनराव पै : अचलपूर बाजार समितीमध्ये उसळला जनसागरअचलपूर/परतवाडा : प्रगतीचे चार ‘प्र’ म्हणजे प्रयत्न, प्रेरणा, प्रेम व प्रार्थना आहेत. यामधूनच आपली उत्कर्ष व उन्नती होते, असा जीवन आनंदीत करण्याचा अमूल्य संदेश सदगुरू वामनराव पै यांचे सुपुत्र प्रबोधक प्रल्हाद पै यांनी दिला. ते जीवन विद्या मिशनअंतर्गत हीरक महोत्सवानिमित्त अचलपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणावर आयोजित समाज प्रबोधनाच्या ‘तुमचा उत्कर्ष, तुमच्या हातात’ या विषयावर शनिवारी सायंकाळी प्रबोधन करीत होते. यावेळी परतवाडा, अचलपूर या जुळ्या नगरीतील शेकडो महिला पुरूष व नागरिक उपस्थित होते. सदगुरू वामनराव पै यांचे विचार मागील ६० वर्षांपासून समाजात मांडल्या जात आहे. जीवन जगण्यासाठी काय करायचे, आणि थोर मोठी मानस कशी झाले, असे अनेक उदाहरण प्रबोधक प्रल्हाद पै यांनी आपल प्रबोधनातून दिले. संतांनी देशभक्ती व राष्ट्रभक्ती, स्वच्छतेचे महत्त्व सांगितले. स्वच्छता ही बाहेरुन सुरू करुन आतपर्यंत आली पाहिजे. सदगुरू वामनराव पै यांनी आपले ६० वर्ष अंधश्रध्दा निर्मूलनासाठी खर्च केले. सदगुरूंनी घरी बसून जीवनविद्या अवगत केली नाही. समाजाचे भले व्हावे यासाठी तयार केल्याचे प्रल्हाद पै यांनी सांगितले. पुढे उद्बोधन करताना पै म्हणाले, उत्कर्षासाठी सर्वजण हस्तरेषा बघतात, अशी लोकांना सवय आहे. वाईट नशिबावर आणि चांगले आपले असे म्हणणे चूक आहे. आपण विमानाने प्रवास करतो आणि अपघात झाला हा अपवाद आहे. शून्यातून मोठे झाले आहेत, कारण ते मोठे झालेत. त्यांच्यामध्ये जिद्द होती. प्रयत्न, पुण्य व संधी या सर्वांचा योग म्हणजे नशीब. यशासाठी पुण्याईची गरज लागते. अनुकूल परिस्थिती राहते तेव्हाच यश मिळते. वास्तववाद स्वीकारण्याचे आवाहन सदगुरूंनी केले. दैववाद सांगितला नाही. विकासवाद, उत्कर्ष आणि उन्नती जेव्हा हातात हात घालून जातील तेव्हाच विकास होतो, असे सदगुरूंनी सांगितले. निद्रा आणि जागृती, प्रपंच आणि परमार्थ जीवनाच्या दोन बाजू आहेत. उत्कर्ष म्हणजे पैसा आपण त्यामागे धावतो हे चुकीचे आहे. उत्कर्ष हा एक प्रयत्न आहे. तो लहानपणाच्या सापसिडीसारखा असतो. उन्नती म्हणजे मनाचे उन्नयण होय, मनशुध्द करणे, शांत, निवांत कराल तर तन-मन उन्नत होईल. परमेश्वर म्हणजे कोणतीच मूर्ती नाही, परमेश्वर म्हणजे आनंद आहे. आपण तो घेत नाही. त्यामुळे सतत दु:ख सुरू राहते. दृष्टी बदलली की जीवनात आनंदच आनंद असतो, असे प्रबोधक प्रल्हाद पै यांनी सांगितले. (प्रतिनिधी)