शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सेंद्रिय खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:21 IST

शासकीय निवासस्थान आवारातील झाडांचा पालापाचोळा, कचरा आदी गोळा करून प्रक्रियेद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती करणे,...

ठळक मुद्देआवारातील कचऱ्यावर प्रक्रिया : परसबागेत वापर, विषमुक्त भाजीपाल्याची उपलब्धी

आॅनलाईन लोकमतअमरावती : शासकीय निवासस्थान आवारातील झाडांचा पालापाचोळा, कचरा आदी गोळा करून प्रक्रियेद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती करणे, पुढे हेच खत परसबागेत वापरून परिवारासाठी विषमुक्त भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेणे ही अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी निवासस्थानी राबविली आहे. या संकल्पनेद्वारे शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी हा आदर्श पाठ ठरणार आहे.लोकाभिमुख प्रशासन आणि जनसामान्यांना सदैव उपलब्ध असणाऱ्या जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची कार्यतत्परतेमुळे जिल्ह्यात एक वेगळी छबी निर्माण झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान हा विस्तीर्ण परिसर असून, येथे विविध प्रकारची फळे व फुलझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. झाडांची संगोपन आणि संर्वधनासाठी दोन माळी नियुक्त केले आहेत. येथे दररोज मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गोळा होतो. हा कचरा पेटविला गेल्यास त्याच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने पर्यावरणाला हानी पोहोचते. हे सर्व टाळून कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती व त्याचा परसबागेतच वापर हे दिशादर्शक ठरणारे आहे.हा तर शासकीय निवासस्थानांसाठी आदर्शपाठबहुतांश शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात दररोज कचरा पेटविला जात असल्याचे बोलके छायाचित्र ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी याउलट स्थिती आहे. येथे कचऱ्यावर प्रक्रियाद्वारा सेंद्रिय खतनिर्मिती केली जाते.सेंद्रिय खतनिर्मितीचे टाके थोडे शिकस्त झाल्याने दुरुस्त करण्यात आले. याच टाक्यात आवारातील झाडांचा कचरा टाकला जाऊन सेंद्रिय खत तयार केले जाते व याचा वापर परसबागेतच करण्यात येत आहे.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी