शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सेंद्रिय खताची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 23:21 IST

शासकीय निवासस्थान आवारातील झाडांचा पालापाचोळा, कचरा आदी गोळा करून प्रक्रियेद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती करणे,...

ठळक मुद्देआवारातील कचऱ्यावर प्रक्रिया : परसबागेत वापर, विषमुक्त भाजीपाल्याची उपलब्धी

आॅनलाईन लोकमतअमरावती : शासकीय निवासस्थान आवारातील झाडांचा पालापाचोळा, कचरा आदी गोळा करून प्रक्रियेद्वारे सेंद्रिय खताची निर्मिती करणे, पुढे हेच खत परसबागेत वापरून परिवारासाठी विषमुक्त भाजीपाला आणि फळांचे उत्पादन घेणे ही अभिनव संकल्पना जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांनी निवासस्थानी राबविली आहे. या संकल्पनेद्वारे शासकीय कार्यालये, अधिकाऱ्यांच्या निवासस्थानासाठी हा आदर्श पाठ ठरणार आहे.लोकाभिमुख प्रशासन आणि जनसामान्यांना सदैव उपलब्ध असणाऱ्या जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांची कार्यतत्परतेमुळे जिल्ह्यात एक वेगळी छबी निर्माण झालेली आहे. जिल्हाधिकाऱ्यांचे शासकीय निवासस्थान हा विस्तीर्ण परिसर असून, येथे विविध प्रकारची फळे व फुलझाडांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली आहे. झाडांची संगोपन आणि संर्वधनासाठी दोन माळी नियुक्त केले आहेत. येथे दररोज मोठ्या प्रमाणात पालापाचोळा गोळा होतो. हा कचरा पेटविला गेल्यास त्याच्या धुरामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणाने पर्यावरणाला हानी पोहोचते. हे सर्व टाळून कचऱ्यावर प्रक्रिया करून सेंद्रिय खताची निर्मिती व त्याचा परसबागेतच वापर हे दिशादर्शक ठरणारे आहे.हा तर शासकीय निवासस्थानांसाठी आदर्शपाठबहुतांश शासकीय कार्यालये व अधिकाऱ्यांच्या निवासस्थानात दररोज कचरा पेटविला जात असल्याचे बोलके छायाचित्र ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या निवासस्थानी याउलट स्थिती आहे. येथे कचऱ्यावर प्रक्रियाद्वारा सेंद्रिय खतनिर्मिती केली जाते.सेंद्रिय खतनिर्मितीचे टाके थोडे शिकस्त झाल्याने दुरुस्त करण्यात आले. याच टाक्यात आवारातील झाडांचा कचरा टाकला जाऊन सेंद्रिय खत तयार केले जाते व याचा वापर परसबागेतच करण्यात येत आहे.- अभिजित बांगर, जिल्हाधिकारी