शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी वायरमनचा वीज खांबावर मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2019 00:58 IST

केबल टाकण्याकरिता विद्युत खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील साऊर येथे ही घटना घडली. दादाराव श्रीराम सोळंके (४०, रा. साऊर) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या शाखा अभियंत्याला घटनास्थळी बोलावण्याची संतप्त गावकऱ्यांची मागणी होती.

ठळक मुद्देचार तासांनी काढला मृतदेह : महावितरणवर हलगर्जीपणाचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्कटाकरखेडा संभू : केबल टाकण्याकरिता विद्युत खांबावर चढलेल्या खासगी वायरमनचा जिवंत तारेला स्पर्श झाल्याने मृत्यू झाला. भातकुली तालुक्यातील साऊर येथे ही घटना घडली. दादाराव श्रीराम सोळंके (४०, रा. साऊर) असे मृताचे नाव आहे. या घटनेनंतर महावितरणच्या शाखा अभियंत्याला घटनास्थळी बोलावण्याची संतप्त गावकऱ्यांची मागणी होती. अखेर निमलष्करी दलाच्या हस्तक्षेपानंतर चार तासांनी मृतदेह खाली काढण्यात आला.दादाराव सोळंके हे घरगुती वीज दुरुस्तीची कामे १५ वर्षांपासून करीत होते. अनेकदा ते गावातही काम करीत होते. मंगळवारी सकाळी ७:४५ वाजता जनावरांच्या धर्माळाची केबल टाकण्यासाठी संस्थेच्या पदाधिकाºयाने त्यांना नेले. ही नवीन केबल टाकण्यासाठी ते खांबावर चढले. त्यापूर्वी डीबी बॉक्समधील फ्यूज काढून वीजपुरवठा बंद केला होता. मात्र, याच खांबावरून शेतातील वीज पुरवठ्याची तार गेली होती. त्याचा पुरवठा सकाळी ८ वाजता सुरू होतो. त्यामुळे विद्युत प्रवाह सुरू होण्यापूर्वी केबलचे काम पूर्ण करण्याच्या उद्देशाने सोळंके खांबावर चढले होते. मात्र, अचानक कृषिवाहिनीचा विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्यांना विजेचा जबर झटका बसला. ते खांबावरच मृतावस्थेत लटकून होते. ही बाब माहिती होताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी जमली.दोन मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलीदादाराव सोळंके यांच्या पश्चात पत्नी चित्रकला, मुलगी वैष्णवी (१६) व मुलगा भावेश (१३) आहेत. दादाराव यांच्या मृत्यूनंतर निराधार झालेल्या त्यांच्या दोन्ही मुलांची शिक्षणाची जबाबदारी निसर्ग इसेंटियल सर्व्हिस, ईसार पेट्रोल पंप व निलांशी फाउंडेशनचे डॉ. श्रीकांत देशमुख व श्रीकांत बोंडे यांनी घेतली. त्यांच्या या पुढाकाराबाबत ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत.सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखलधर्माळाचा केबल टाकण्याकरिता संस्थेचे सदस्य हिरालाल रामधन लढ्ढा (६०) यांनी दादाराव सोळंके यांना घरी जाऊन सांगितले होते. त्यांच्या सांगण्यावरून सोळंके मंगळवारी खांबावर चढले होते. यातच विजेच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे वलगाव पोलिसांनी हिरालाल लढ्ढाविरुद्ध भादंविच्या कलम ३०४ (सदोष मनुष्यवध) गुन्हा नोंदविला आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणDeathमृत्यू