शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
3
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
4
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
5
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
6
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
7
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
8
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
9
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
10
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
11
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
12
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
13
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
14
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
15
अखेर 'या' तारखेपासून नवी मुंबई विमानतळावरुन विमाने झेपावणार! पहिल्या टप्प्यात 10 शहरांसाठी सेवा सुरू होणार
16
IPL 2026 Retain and Released Player Full List : KKR नं महागड्या खेळाडूला दिल्ला धक्का; कुणी कुणावर ठेवला भरवसा?
17
बिहारचा मुख्यमंत्री कोण होणार? जेडीयू म्हणतोय नीतीशच राहणार, भाजप म्हणतोय आमदार ठरवणार!
18
चीन-पाकिस्तानशी 'इलेक्ट्रोमॅग्नेटिक युद्ध'?; मुंबईनजीक GPS साठी भारताकडून NOTAM जारी, अर्थ काय?
19
Viral Video : एका दिवसात किती कमाई करतो मोमो विक्रेता? आकडा ऐकून हैराण व्हाल!
20
वीज बिल न भरल्याने कनेक्शन तोडले; रागात तरुणाने अख्ख्या शहराची लाईट बंद केली, वीज कर्मचाऱ्यांना रात्रभर कामाला लावलं
Daily Top 2Weekly Top 5

बंद पडलेल्या दुग्ध संस्था वाचविण्यासाठी खासगी-सार्वजनिक सहभाग, शासनाचा पुढाकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2017 18:36 IST

दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या वा बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दुग्ध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनरुज्जीवित करण्यास शासनाने मंगळवारी मान्यता दिली आहे.

- संदीप मानकर 

अमरावती :  दुग्धव्यवसाय विकास विभागांतर्गत बंद पडलेल्या वा बंद पडण्याची शक्यता असलेल्या शासकीय दुग्ध योजना व शीतकरण केंद्रे खासगी-सार्वजनिक सहभाग (पीपीपी) तत्त्वावर पुनरुज्जीवित करण्यास शासनाने मंगळवारी मान्यता दिली आहे. अमरावती विभागातील बंद पडण्याच्या स्थितीत असलेल्या दुग्ध योजनांना त्याचा पायदा होणार आहे. खासगी-सार्वजनिक सहभाग तत्त्वावर दुग्धशाळांच्या पुनरुज्जीवनाकरिता तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागाने १७ सप्टेंबरच्या २०१४ रोजी विहीत केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करून करण्यात येणार आहे तसेच तांत्रिक सल्लागाराने पीपीपी तत्त्वानुसार तयार केलेल्या अहवालाच्या आधारे अंतिम स्वरूपात योजना राबविण्याबाबत स्वतंत्र प्रस्तावही मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात येणार आहे.तांत्रिक सल्लागाराचा मेहनताना दुग्धव्यवसाय विभागांतर्गत मंजूर असलेल्या अनुदानातून भागविण्यात येणार आहे.

राज्यात १२ दुग्ध योजना बंद राज्यात एकूण ३८ दुग्धशाळा व ८१ शीतकरण केंद्रे आहेत. त्यापैकी शासनाच्या मालकीच्या १२ दुग्ध योजना व ४५ दूध शीतकरण केंद्रे पूर्णत: बंद आहेत. उर्वरित शासकीय दूध योजना व शीतकरण केंद्रे भविष्यात बंद होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. दुग्धव्यवसाय विभागाचा संचित तोटा ४६६७.२५ कोटी इतका असल्याचे शासनाने जाहीर केले आहे. तोट्यामध्ये सातत्याने वाढच होत आहे. दुग्धव्यवसाय विभागाचा ०.५ टक्का इतकाच सहभाग दुग्धव्यवसायामध्ये सहभाग उरला आहे. यामुळे शासकीय योजनांचे नूतनीकरण शासकीय निधीद्वारे करण्याऐवजी खासगी सहभागातून (पीपीपी) तत्त्वावर करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

महसूल वाढविण्याचा प्रयोग दुग्धव्यवसाय विकास विभागाचा तोटा कमी करून महसूल वाढविण्याच्या दृष्टीने विभागातील शासनावर कोणताही बोजा न पडता आणि शासनाच्यावतीने कोणतीही भांडवली गुंतवणूक न करता, ‘आरे’ या शासकीय ब्रॅण्डची जोपासना व संवर्धन करून विभागांअंतर्गत असलेल्या दूध विक्री केंद्रांना अद्ययावत सुविधा उपलब्ध करून तेथे विपणनाची कार्यवाही करणे व आरए ब्रॅण्डची उत्पादने अन्य दुकाने व मॉल्स आदी ठिकाणी विकण्यास मुभा देण्याबाबतची तसेच बंद पडलेल्या व बंद पडण्याची शक्यता असलेल्या दूध योजनांचे पीपीपी (पब्लिक प्राव्हेट पार्टनशिप) या तत्त्वावर पुनरुज्जीवित करण्यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या २०१४ शासन निर्णयान्वये विहित केलेल्या प्रक्रियद्वारे तज्ज्ञ सल्लागारांचीही नियुक्ती करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील तीन शीतकरण केंद्रे बंद अमरावती जिल्ह्यात मोर्शी, सेमाडोह व परतवाडा येथील दूध शीतकरण केंद्रे बंद पडले आहे, तर चांदूर रेल्वे तालुक्यातील एकमेव शीतकरण केंद्र सुरू आहे. परतवाडा येथील केंद्राच्या हस्तांतरणाची मागणी प्रहार महिला तालुका संघाने केली असून, त्याचा प्रस्ताव शासनाकडे गेला आहे. विभागात अमरावती, यवतमाळ, अकोला येथील दुग्ध योजना सुरू असल्या तरी कर्मचारी कमी आहेत. नांदुरा येथील दुग्ध योजना बंद पडली आहे.  शासनाच्या निर्णयाने जिल्ह्यातील बंद पडणाºया योजना वाचविण्यास मदत होईल. जिल्ह्यात तीन शीतकरण केंद्रे बंद पडली आहेत.- एस.बी. जांभुळे, जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, अमरावती

टॅग्स :Amravatiअमरावती