शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
5
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
6
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
7
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
8
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
9
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
10
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
11
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
12
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
13
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
14
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
15
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
16
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
17
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
18
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
19
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
20
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!

पंतप्रधान बेटी बचाओ योजना हे भाजपचेच कटकारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:53 IST

पंतप्रधान बेटी बचाओ योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये अनुदान जमा करण्याच्या नावाखाली गोरगरिबांची फसवणूक करण्याचे कटकारस्थान भाजपचेच आहे,.....

ठळक मुद्देबुरे दिन : मोदी सरकारची लाट ओसरल्याने काँग्रेसला बदनाम करण्याचे षड्यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंतप्रधान बेटी बचाओ योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये अनुदान जमा करण्याच्या नावाखाली गोरगरिबांची फसवणूक करण्याचे कटकारस्थान भाजपचेच आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपक्षीयांनीच रचलेल्या या कटकारस्थानाचे पाप काँग्रेसच्या माथी मारले जात आहे. अशा बोगस योजना काँग्रेसने कधीही राबविल्या नाहीत. भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली बंद पडलेल्या योजनांआडून गोरगरिबांची थट्टा चालविल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री बेटी बचाओ योजनेंतर्गंत महिला व मुलींच्या बँक खात्यात दोन लाख रूपये जमा करण्यात येणार असल्याच्या वावड्या मागील काही दिवसांपासून बडनेरा व ग्रामीण भागात उठत आहेत. या योजनेंतर्गत ६ ते ३२ वर्षे वयोगटातील मुलींना सदर रक्कम दिली जाणार असल्याचे सांगून, त्या योजनेचे अर्जही भरून घेण्यात येत आहेत. अर्ज केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण, शांती भवन, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठवावे, असेही नमूद करण्यात आले आहे. अर्जात आई-वडिलांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, राज्य, शैक्षणिक पात्रता, आधार क्रमांक, ई-मेल आयडी, प्रवर्ग, धर्म, जात, बँक खातेक्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड, सरपंचाची स्वाक्षरीसुद्धा मागितली आहे. या योजनेशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसताना भाजप पदाधिकारी मात्र राजकीय द्वेषभावनेतून गैरसमज पसरवून बदनामी करीत आहेत. भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची मते घेतली. आता तीन वर्षात जनहितविरोधी धोरणांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मोदी व फडणवीस सरकारचा घसरता आलेख व भाजपला ‘बुरे दिन’ पुढ्यात दिसत असल्याने विविध आरोपांतून विरोधी पक्षाला बदनाम केले जात आहे. काँग्रेसने सुरू केलेल्या जनआक्रोश मेळाव्यांना जनतेचा कौल पाहून ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पंतप्रधान बेटी बचाओ योजनेत काँग्रेसला खेचणाºयांची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य पुढे आणावे, अशी मागणी आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर व बबलू देशमुख यांनी केली.देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री भाजपचे; मग पंतप्रधान बेटी बचाओ - बेटी पढाओ योजना काँग्रेस कशी राबविणार आहे? खोटंही रेटून बोला हा भाजपचा अजेंडाच आहे. आता जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. काँग्रेस पक्षावर भाजप बिनबुडाचे आरोप करीत आहे.- यशोमती ठाकूरआमदार, तिवसा‘अच्छे दिन’च्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. सरकार भाजपचे, त्यांच्याच योजना; विरोधक कशाला त्या राबवतील, हा साधा प्रश्न आहे. पंतप्रधान बेटी बचाओ - बेटी पढाओ योजनेच्या नावावर फसवणूक होत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी.- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगाव रेल्वेपंतप्रधान बेटी बचाओ योजनेशी काँग्रेसचा काडीचाही संबंध नसताना भाजपचे पदाधिकारी नाहक आमच्यावर खापर फोडत आहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. या प्रकरणाची चौकशी केली जावी. यापुढे भाजपचे आरोप कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत.- बबलू देशमुखजिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस