शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

पंतप्रधान बेटी बचाओ योजना हे भाजपचेच कटकारस्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:53 IST

पंतप्रधान बेटी बचाओ योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये अनुदान जमा करण्याच्या नावाखाली गोरगरिबांची फसवणूक करण्याचे कटकारस्थान भाजपचेच आहे,.....

ठळक मुद्देबुरे दिन : मोदी सरकारची लाट ओसरल्याने काँग्रेसला बदनाम करण्याचे षड्यंत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पंतप्रधान बेटी बचाओ योजनेंतर्गत प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दोन लाख रुपये अनुदान जमा करण्याच्या नावाखाली गोरगरिबांची फसवणूक करण्याचे कटकारस्थान भाजपचेच आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख, आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपक्षीयांनीच रचलेल्या या कटकारस्थानाचे पाप काँग्रेसच्या माथी मारले जात आहे. अशा बोगस योजना काँग्रेसने कधीही राबविल्या नाहीत. भाजप सरकारने ‘अच्छे दिन’च्या नावाखाली बंद पडलेल्या योजनांआडून गोरगरिबांची थट्टा चालविल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री बेटी बचाओ योजनेंतर्गंत महिला व मुलींच्या बँक खात्यात दोन लाख रूपये जमा करण्यात येणार असल्याच्या वावड्या मागील काही दिवसांपासून बडनेरा व ग्रामीण भागात उठत आहेत. या योजनेंतर्गत ६ ते ३२ वर्षे वयोगटातील मुलींना सदर रक्कम दिली जाणार असल्याचे सांगून, त्या योजनेचे अर्जही भरून घेण्यात येत आहेत. अर्ज केंद्र शासनाच्या महिला व बालकल्याण, शांती भवन, नवी दिल्ली ११०००१ या पत्त्यावर पाठवावे, असेही नमूद करण्यात आले आहे. अर्जात आई-वडिलांचे नाव, पत्ता, जन्मतारीख, राज्य, शैक्षणिक पात्रता, आधार क्रमांक, ई-मेल आयडी, प्रवर्ग, धर्म, जात, बँक खातेक्रमांक, आय.एफ.एस.सी. कोड, सरपंचाची स्वाक्षरीसुद्धा मागितली आहे. या योजनेशी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नसताना भाजप पदाधिकारी मात्र राजकीय द्वेषभावनेतून गैरसमज पसरवून बदनामी करीत आहेत. भाजप सरकारने ‘अच्छे दिन’चे स्वप्न दाखवून जनतेची मते घेतली. आता तीन वर्षात जनहितविरोधी धोरणांमुळे सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. मोदी व फडणवीस सरकारचा घसरता आलेख व भाजपला ‘बुरे दिन’ पुढ्यात दिसत असल्याने विविध आरोपांतून विरोधी पक्षाला बदनाम केले जात आहे. काँग्रेसने सुरू केलेल्या जनआक्रोश मेळाव्यांना जनतेचा कौल पाहून ही मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पंतप्रधान बेटी बचाओ योजनेत काँग्रेसला खेचणाºयांची उच्चस्तरीय चौकशी करून सत्य पुढे आणावे, अशी मागणी आ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर व बबलू देशमुख यांनी केली.देशाचे पंतप्रधान, मुख्यमंत्री भाजपचे; मग पंतप्रधान बेटी बचाओ - बेटी पढाओ योजना काँग्रेस कशी राबविणार आहे? खोटंही रेटून बोला हा भाजपचा अजेंडाच आहे. आता जनता यांच्या भूलथापांना बळी पडणार नाही. काँग्रेस पक्षावर भाजप बिनबुडाचे आरोप करीत आहे.- यशोमती ठाकूरआमदार, तिवसा‘अच्छे दिन’च्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. सरकार भाजपचे, त्यांच्याच योजना; विरोधक कशाला त्या राबवतील, हा साधा प्रश्न आहे. पंतप्रधान बेटी बचाओ - बेटी पढाओ योजनेच्या नावावर फसवणूक होत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी व्हावी.- वीरेंद्र जगतापआमदार, धामणगाव रेल्वेपंतप्रधान बेटी बचाओ योजनेशी काँग्रेसचा काडीचाही संबंध नसताना भाजपचे पदाधिकारी नाहक आमच्यावर खापर फोडत आहेत. हा खोटारडेपणाचा कळस आहे. या प्रकरणाची चौकशी केली जावी. यापुढे भाजपचे आरोप कदापिही खपवून घेतले जाणार नाहीत.- बबलू देशमुखजिल्हाध्यक्ष, कॉँग्रेस