शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

डाळींचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 00:30 IST

तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात ...

उडीद डाळीला सर्वाधिक भाव : तूर डाळही पोहोचली १५० रुपयांवर अमरावती : तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात कमी येऊन घटलेली आवक यामुळे पुन्हा बाजारात सर्वच प्रकारच्या डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील दोन आठवड्यांत डाळीमध्ये २० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे डाळींची पुन्हा साठमारी होण्याची शक्यता असून सरकारने डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गरज निर्माण झाली आहे. मागील वर्षी आजवरची विक्री दरवाढ तुरीच्या डाळीत झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून तूरडाळ हद्दपार झाली होती. यामध्ये सरकारही हवालदिल झाले होते. यावर उपाय म्हणून सरकारने पुरवठा विभागाद्वारा धाडसत्र राबविले व डाळींचे भाव काहीसे कमी झाले. यामध्ये चार महिन्यांचा दिलासा मिळत नाही. तोच पुन्हा डाळींच्या भावात वाढ होऊ लागली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात पाऊस कमी, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात सरासरी ३० ते ३० टक्क्यांनी कमी आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव व शेंग पोखरणारी अळी व मळणीच्या हंगामात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे कडधान्याचे उत्पादन घटले. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्याने मिळेल त्या भावात तुरीची विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ भाववाढ होत असताना माल विक्रीसाठी नाही याचा फायदा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे यांच्यात काही दिवसांत डाळीची मोठ्या प्रमाणात भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)दोन आठवड्यात भाववाढसध्या वर्षभऱ्याचे धान्य व डाळ खरेदीचा हंगाम व लग्नसराई आहे. त्यात दाळीची आवक घटल्याने डाळीचे भाव कडाडत आहे. १५ ते २० दिवसात पुन्हा डाळीमध्ये तेजी येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सुत्रांनी सांगितले. दोन आठवड्यापूर्वी १२० रुपये असणारी तुरदाळ आता १५० रुपयांवर आली आहे. तर उडिद दाळीची स्थिती सर्वात गंभीर आहे. १३० ते १४० रुपये असणारी उडिद दाळ १८० रुपये मूगदाळ ८५ ते ९५ रुपयांवर १०० रुपये, हरभरा दाळ ५५ त ६० रुपयांवरुन ७५ ते ८० रुपये झालेली आहे. ज्या दाळीला मागणी नाही त्या मसुर दाळीमध्ये १५ ते २० रुपयांची वाढ होऊन ती ५५ ते ६० रुपयांवरुन ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे. तुकडा तुरदाळीची मागणी वाढलीतुरदाळीची मागणी वाढत असल्याने अनेक जन तुकडा तुरदाळीला प्राधान्य देत आहे व त्यालाही चांगली मागणी आहे. सद्यस्थितीत ही तुकडा तूरदाळ ११० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहे.