शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

डाळींचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 00:30 IST

तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात ...

उडीद डाळीला सर्वाधिक भाव : तूर डाळही पोहोचली १५० रुपयांवर अमरावती : तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात कमी येऊन घटलेली आवक यामुळे पुन्हा बाजारात सर्वच प्रकारच्या डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील दोन आठवड्यांत डाळीमध्ये २० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे डाळींची पुन्हा साठमारी होण्याची शक्यता असून सरकारने डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गरज निर्माण झाली आहे. मागील वर्षी आजवरची विक्री दरवाढ तुरीच्या डाळीत झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून तूरडाळ हद्दपार झाली होती. यामध्ये सरकारही हवालदिल झाले होते. यावर उपाय म्हणून सरकारने पुरवठा विभागाद्वारा धाडसत्र राबविले व डाळींचे भाव काहीसे कमी झाले. यामध्ये चार महिन्यांचा दिलासा मिळत नाही. तोच पुन्हा डाळींच्या भावात वाढ होऊ लागली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात पाऊस कमी, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात सरासरी ३० ते ३० टक्क्यांनी कमी आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव व शेंग पोखरणारी अळी व मळणीच्या हंगामात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे कडधान्याचे उत्पादन घटले. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्याने मिळेल त्या भावात तुरीची विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ भाववाढ होत असताना माल विक्रीसाठी नाही याचा फायदा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे यांच्यात काही दिवसांत डाळीची मोठ्या प्रमाणात भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)दोन आठवड्यात भाववाढसध्या वर्षभऱ्याचे धान्य व डाळ खरेदीचा हंगाम व लग्नसराई आहे. त्यात दाळीची आवक घटल्याने डाळीचे भाव कडाडत आहे. १५ ते २० दिवसात पुन्हा डाळीमध्ये तेजी येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सुत्रांनी सांगितले. दोन आठवड्यापूर्वी १२० रुपये असणारी तुरदाळ आता १५० रुपयांवर आली आहे. तर उडिद दाळीची स्थिती सर्वात गंभीर आहे. १३० ते १४० रुपये असणारी उडिद दाळ १८० रुपये मूगदाळ ८५ ते ९५ रुपयांवर १०० रुपये, हरभरा दाळ ५५ त ६० रुपयांवरुन ७५ ते ८० रुपये झालेली आहे. ज्या दाळीला मागणी नाही त्या मसुर दाळीमध्ये १५ ते २० रुपयांची वाढ होऊन ती ५५ ते ६० रुपयांवरुन ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे. तुकडा तुरदाळीची मागणी वाढलीतुरदाळीची मागणी वाढत असल्याने अनेक जन तुकडा तुरदाळीला प्राधान्य देत आहे व त्यालाही चांगली मागणी आहे. सद्यस्थितीत ही तुकडा तूरदाळ ११० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहे.