शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
3
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
4
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
5
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
6
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
7
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश
8
Navratri 2025: अष्टमी-नवमीला 'या' दिशेला दिवा लावा; अखंड दिवा लावण्याचे लाभ मिळतील 
9
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
10
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
11
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
12
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
14
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
15
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
16
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
17
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
18
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
19
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
20
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...

डाळींचे भाव कडाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2016 00:30 IST

तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात ...

उडीद डाळीला सर्वाधिक भाव : तूर डाळही पोहोचली १५० रुपयांवर अमरावती : तूरडाळीचे गतवर्षी भाव २०० रुपयांवर पोहोचले होते. त्यानंतर सरकारचे वेगवेगळे धोरण व यंदा अपुऱ्या पावसामुळे डाळवर्गीय पिकांच्या सरासरी उत्पन्नात कमी येऊन घटलेली आवक यामुळे पुन्हा बाजारात सर्वच प्रकारच्या डाळींचा तुटवडा निर्माण झाला आहे. मागील दोन आठवड्यांत डाळीमध्ये २० ते ४० रुपयांची दरवाढ झाली आहे. त्यामुळे डाळींची पुन्हा साठमारी होण्याची शक्यता असून सरकारने डाळीच्या दरवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी गरज निर्माण झाली आहे. मागील वर्षी आजवरची विक्री दरवाढ तुरीच्या डाळीत झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाक घरातून तूरडाळ हद्दपार झाली होती. यामध्ये सरकारही हवालदिल झाले होते. यावर उपाय म्हणून सरकारने पुरवठा विभागाद्वारा धाडसत्र राबविले व डाळींचे भाव काहीसे कमी झाले. यामध्ये चार महिन्यांचा दिलासा मिळत नाही. तोच पुन्हा डाळींच्या भावात वाढ होऊ लागली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात पाऊस कमी, पावसात खंड व नैसर्गिक आपत्ती यामुळे डाळवर्गीय पिकांच्या उत्पादनात सरासरी ३० ते ३० टक्क्यांनी कमी आली. जमिनीत आर्द्रतेचा अभाव व शेंग पोखरणारी अळी व मळणीच्या हंगामात अवकाळी पाऊस व गारपीट यामुळे कडधान्याचे उत्पादन घटले. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने त्याने मिळेल त्या भावात तुरीची विक्री केली. त्यामुळे शेतकऱ्यांजवळ भाववाढ होत असताना माल विक्रीसाठी नाही याचा फायदा साठेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांनाच होत आहे. सरकारचे नियंत्रण नसल्यामुळे यांच्यात काही दिवसांत डाळीची मोठ्या प्रमाणात भाववाढ होण्याची शक्यता व्यापारी सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)दोन आठवड्यात भाववाढसध्या वर्षभऱ्याचे धान्य व डाळ खरेदीचा हंगाम व लग्नसराई आहे. त्यात दाळीची आवक घटल्याने डाळीचे भाव कडाडत आहे. १५ ते २० दिवसात पुन्हा डाळीमध्ये तेजी येण्याची शक्यता असल्याचे व्यापारी सुत्रांनी सांगितले. दोन आठवड्यापूर्वी १२० रुपये असणारी तुरदाळ आता १५० रुपयांवर आली आहे. तर उडिद दाळीची स्थिती सर्वात गंभीर आहे. १३० ते १४० रुपये असणारी उडिद दाळ १८० रुपये मूगदाळ ८५ ते ९५ रुपयांवर १०० रुपये, हरभरा दाळ ५५ त ६० रुपयांवरुन ७५ ते ८० रुपये झालेली आहे. ज्या दाळीला मागणी नाही त्या मसुर दाळीमध्ये १५ ते २० रुपयांची वाढ होऊन ती ५५ ते ६० रुपयांवरुन ७० ते ७५ रुपयांवर पोहोचली आहे. तुकडा तुरदाळीची मागणी वाढलीतुरदाळीची मागणी वाढत असल्याने अनेक जन तुकडा तुरदाळीला प्राधान्य देत आहे व त्यालाही चांगली मागणी आहे. सद्यस्थितीत ही तुकडा तूरदाळ ११० ते १२० रुपये किलोप्रमाणे विकल्या जात आहे.