शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

ग्राहकाला देताना ४० रुपये भाव, शेतकऱ्याच्या हातावर मात्र फक्त ३ रुपये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2020 14:21 IST

शेतकऱ्यांची हिरवी वांगी तीन रुपये किलो दराने घेऊन तीच बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत.

ठळक मुद्देहिरव्या वांग्याची कवडीमोल भावात खरेदी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : शेतकऱ्यांची हिरवी वांगी तीन रुपये किलो दराने घेऊन तीच बाजारात ३० ते ४० रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत. साधारणत: एका कट्ट्यात ५० किलो वांगी बसतात. मात्र, व्यापारी व मापारी यांच्या संगणमतामुळे ५० किलोचे पोते ४२ ते ४५ किलो असे मोजले जाते. त्यातच एक क्विंटलमागे दोन किलो वांगी सड म्हणून जास्त घेतली जातात. या पिळवणुुकीवर बाजार समितीने मौन धारण केले आहे.पथ्रोट परिसरात दरवर्षी मे महिन्याच्या शेवटी हिरव्या वांगीची लागवड केली जाते. दरवर्षी विक्रमी पीक घेण्याची स्पर्धा शेतकऱ्यांमध्ये असते. हिरव्या वांग्याच्या पिकाचा मोबदला रोखीने मिळत असल्यामुळे आणि खरीप हंगामाच्या वेळी तो कामी पडत असल्याने शेकडो शेतकरी हिरव्या वांग्याच्या पिकाकडे वळला आहे. बरेचसे मजूर मोठ्या शेतकऱ्यांची शेती वांगी उत्पादनाकरिता २० हजार रुपये मक्त्याने करतात.

वांगी पिकाच्या लागवणीपासून तर वांगे तोडणाऱ्या महिला मजुराला चार तासांचे प्रत्येकी २०० रुपये मजुरी, तर पुरुष वर्गाला वांगी डोहारणे, पोत्यात भरणे याकरिता ३०० ते ४०० रुपये, आठवड्यातून अळीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता दोनदा कीटकनाशक फवारणी, १५ दिवसांतून एकदा एकरी दोन पोते मिश्रखताची मात्रा एवढा खर्च शेतकऱ्यांना करावाच लागतो. मात्र, व्यापाऱ्यांकडून पाच रुपये प्रतिकिलोचा भाव जरी मिळाला तरी शेतकरी तोट्यात आहेत. वांग्याच्या अत्यल्प भावामुळे शेतकरी वांग्याचा तोडा न करता झाडाला सडू देत आहेत, तर काही गुराढोरांपुढे टाकत आहेत.वांग्याचे दर पाडण्याला व्यापारी व दलालच कारणीभूत आहे, व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची चेष्टा थांबवावी.- अनूप अरबट, शेतकरी, पथ्रोट

टॅग्स :agricultureशेतीvegetableभाज्या