शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

दिव्यांग निधी खर्चासाठी निवारण अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

अमरावती: दिव्यांगांसाठी पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पन्नातून ५ टक्के निधीतून अपंग कल्याणासाठीच्या खर्चासंबंधीची तक्रार दाखल झाल्यास त्याची योग्य दखल ...

अमरावती: दिव्यांगांसाठी पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पन्नातून ५ टक्के निधीतून अपंग कल्याणासाठीच्या खर्चासंबंधीची तक्रार दाखल झाल्यास त्याची योग्य दखल घेण्यासाठी जिल्हा, तालुकास्तर व ग्राम स्तरावर दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रामविकास विभागाने पंचायतराज संस्थांनी त्यांच्या उत्पन्नात ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ग्राम स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या ५ टक्के निधीसंबंधी तक्रारीचे निवारण करण्यासंबंधी अर्ज प्राप्त झाल्याचे ३० दिवसात कार्यवाही करावी. कार्यकर्त्याचे समाधान न झाल्यास संबंधितांकडून आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील अर्ज दाखल करावेत. दिव्यांगांच्या निधीसंबंधी तक्रारीचे निराकरण करण्याचे काम, ग्रामस्तरावरील निधीबाबत असलेल्या अपिलावर प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून करते. त्यामध्ये तक्रारकर्त्याचे समाधान न झालेल्या जिल्हास्तरीय समितीकडे अपील अर्ज सादर करावा. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद सीईओंच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण समितीची रचना करावी. अतिरिक्त सीईओ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे समितीचे सदस्य तर ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. समितीची बैठक दर महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात ठेवण्यात यावी. या बैठकीमध्ये जिल्हा स्तरावर प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी, तसेच तालुका स्तरावर लागतील यांच्या कार्यवाहीबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. तिकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा अपिलाबाबत समितीकडून ४५ दिवसांत कार्यवाही करण्यात येणार आहे.

बॉक्स

बीडीओ तक्रार निवारण करणार

पंचायत समिती स्तरावर तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या दिव्यांगांच्या ५ टक्के निधीसंबंधी तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांगांच्या तक्रारी निवारण होतील.