शहरं
Join us  
Trending Stories
1
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
2
Conversion Law: राजस्थानात धर्मांतरण कायदा लागू, राज्यपाल हरीभाऊ बागडे यांची मंजुरी, उल्लंघन केल्यास किती शिक्षा होणार? जाणून घ्या
3
टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
4
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
5
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
6
"चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
7
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
8
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
9
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
10
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
11
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
12
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
13
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?
14
Cough Syrup : "पप्पा, मला मोबाईल द्या ना...", वेदांशचे शेवटचे शब्द; १२ लाख खर्च करूनही वाचला नाही जीव
15
मृत सासूला चितेवर ठेवताना शरीरावर दिसल्या जखमा; संशय येताच तपास झाला अन् समोर आलं विदारक सत्य!
16
"WhatsApp वर नोट आणि वरिष्ठांची नाव..."; IAS पत्नीने केले १५ कॉल, लेकीलाही पाठवलं पण...
17
Ratan Tata Death Anniversary: असे होते रतन टाटा... ज्या व्यवसायात हात घातला सोनं केलं, १० पॉईंट्समध्ये पाहा त्यांचा प्रवास
18
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: गणपतीसह लक्ष्मी देवीचेही करा पूजन, मंत्राचे जप ठरतील उपयुक्त!
19
शून्य बँक शिल्लक असतानाही होईल UPI पेमेंट? 'भीम ॲप'चं 'हे' खास फीचर जाणून घ्या!
20
भ्रष्टाचारामध्ये महाराष्ट्र आघाडीवर; ७८५ शासकीय कर्मचारी, खासगी व्यक्तींना अटक; देशभरात २,८७५ ठिकाणी कारवाई

दिव्यांग निधी खर्चासाठी निवारण अधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:14 IST

अमरावती: दिव्यांगांसाठी पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पन्नातून ५ टक्के निधीतून अपंग कल्याणासाठीच्या खर्चासंबंधीची तक्रार दाखल झाल्यास त्याची योग्य दखल ...

अमरावती: दिव्यांगांसाठी पंचायतराज संस्थांनी त्यांच्या स्व उत्पन्नातून ५ टक्के निधीतून अपंग कल्याणासाठीच्या खर्चासंबंधीची तक्रार दाखल झाल्यास त्याची योग्य दखल घेण्यासाठी जिल्हा, तालुकास्तर व ग्राम स्तरावर दिव्यांग तक्रार निवारण अधिकारी नेमण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले आहेत. यासोबतच जिल्हा स्तरावर समिती गठित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ग्रामविकास विभागाने पंचायतराज संस्थांनी त्यांच्या उत्पन्नात ५ टक्के निधीतून घ्यावयाच्या अपंग कल्याणासाठी योजना व खर्चाबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. ग्राम स्तरावर प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवकांना तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. दिव्यांगांच्या ५ टक्के निधीसंबंधी तक्रारीचे निवारण करण्यासंबंधी अर्ज प्राप्त झाल्याचे ३० दिवसात कार्यवाही करावी. कार्यकर्त्याचे समाधान न झाल्यास संबंधितांकडून आदेश मिळाल्यापासून ३० दिवसांच्या आत पंचायत समिती स्तरावरील गटविकास अधिकारी यांच्याकडे अपील अर्ज दाखल करावेत. दिव्यांगांच्या निधीसंबंधी तक्रारीचे निराकरण करण्याचे काम, ग्रामस्तरावरील निधीबाबत असलेल्या अपिलावर प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून करते. त्यामध्ये तक्रारकर्त्याचे समाधान न झालेल्या जिल्हास्तरीय समितीकडे अपील अर्ज सादर करावा. जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद सीईओंच्या अध्यक्षतेखाली जिल्हा तक्रार निवारण समितीची रचना करावी. अतिरिक्त सीईओ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी हे समितीचे सदस्य तर ग्रामपंचायतीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हे सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. समितीची बैठक दर महिन्याच्या दुसऱ्या व तिसऱ्या आठवड्यात ठेवण्यात यावी. या बैठकीमध्ये जिल्हा स्तरावर प्राप्त होणाऱ्या सर्व तक्रारी, तसेच तालुका स्तरावर लागतील यांच्या कार्यवाहीबाबत आढावा घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे. तिकडे प्राप्त होणाऱ्या तक्रारी अथवा अपिलाबाबत समितीकडून ४५ दिवसांत कार्यवाही करण्यात येणार आहे.

बॉक्स

बीडीओ तक्रार निवारण करणार

पंचायत समिती स्तरावर तालुका स्तरावर गटविकास अधिकारी यांच्या दिव्यांगांच्या ५ टक्के निधीसंबंधी तक्रार निवारण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे पंचायत समितीच्या माध्यमातून दिव्यांगांच्या तक्रारी निवारण होतील.