शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
2
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
3
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
4
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
5
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
6
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
7
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
8
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
9
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
10
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह
11
"मी जेहच्या खोलीत आलो, चोर त्याच्या बेडवर...", सैफने सांगितला घटनाक्रम, काजोल झाली भावुक
12
लक्ष्मीपूजन २०२५: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!
13
BMC ELection: मुंबईतील तरुणांना १८ वर्ष पूर्ण होऊनही BMC निवडणुकीत करता येणार नाही मतदान, कारण...
14
सलग ४ दिवसांच्या तेजीला ब्रेक! बाजारात नफावसुलीमुळे २.३५ लाख कोटींचे नुकसान; निफ्टी २५,१०० खाली
15
मयंतीनं छेडला कळीचा मुद्दा; संजू सॅमसननं तिला रिप्लाय दिला की, गंभीरला? (VIDEO)
16
Divya Tanwar : कडक सॅल्यूट! आधी IPS आणि नंतर IAS; आईने मजुरी करून शिकवलं, लेकीने कष्टाचं सोनं केलं
17
ट्रम्प यांचा फासा उलटा पडला, टॅरिफची अमेरिकेलाच डोकेदुखी; एक्सपर्ट म्हणाले, "US ची जनताच भोगतेय परिणाम"
18
जागावाटपावरून काँग्रेसमध्ये पेच, तेजस्वी यादव यांच्या मुख्यमंत्रि‍पदाबाबतही एकमत नाही
19
NDA मध्ये धुसफूस...? "हो न्याय अगर तो आधा दो...! 15 जागा मिळाल्या नाही तर..."; जितनरामांनी दिली सर्वात मोठी धमकी
20
'दशावतार २' येणार? प्रियदर्शिनी इंदलकर म्हणाली, "भैरवीची वेळ झाली आता पुढची जबाबदारी..."

स्पर्धा परीक्षेची तयारी करा- यश नक्कीच मिळेल !

By admin | Updated: December 19, 2015 00:18 IST

डिग्री मिळल्यानंतर परिश्रमपूर्वक स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश नक्कीच मिळेल, असे उद्गार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी काढले.

जिल्हाधिकारी गित्ते : संत गाडगेबाबा करिअर व्याख्यानमाला, सातत्याने परिश्रम करणे गरजेचे अमरावती : डिग्री मिळल्यानंतर परिश्रमपूर्वक स्पर्धा परीक्षेची तयारी केली तर यश नक्कीच मिळेल, असे उद्गार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी काढले. १४ ते २१ डिसेंबरपर्यंत संत गाडगेबाबा पुण्यतिथी महोत्सवात आयोजित संत गाडगेबाबा करिअर व्याख्यानमालेच्या चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी कशी करावी, याबाबत मार्गदर्शन केले आयईएसमध्ये देशात प्रथम रँक मिळविणारा गौरव रॉय, मिशन आयएएसचे संचालक नरेशचंद्र काठोळे तसेच विद्यार्थी व त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. गित्ते पुढे म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांची अभ्यास करण्याची मानसिक तयारी झालेली असते असे ९० टक्के विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण होतात. एमपीएससीची परीक्षा सोपी नाही. त्यासाठी खूप परिश्रम घेण्याची गरज असते. परिश्रमाची तयारी ठेवली तर यश नक्कीच मिळेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की, अभ्यास किती वेळ केला पाहिजे. यावर मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी गित्ते म्हणाले की, स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्याने दिवसातील ८ ते ९ तास दररोज अभ्यास करणे गरजेचे आहे. जे विद्यार्थी फक्त अभ्यास करतात, त्यांनी दिवसातील १४ तास तर जे विद्यार्थी अभ्यासासोबत नोकरी करतात त्यांनी दिवसातील ९ तास अभ्यास करणे गरजेचे आहे. गित्ते पुढे म्हणाले की, स्पर्धा परीक्षेसाठी कोचिंग क्लासेसवर पूर्णपणे अवलंबून राहू नये. कोचिंग क्लासेस अभ्यास कसा करायचा याचे मार्गदर्शन करू शकते. पण मूळ अभ्यास स्वत:लाच करावा लागतो. ज्या विद्यार्थ्यांना यूपीएससीची तयारी करावयाची असेल त्यांनी इंग्रजीमधील पुस्तके वाचावी. बऱ्याच विद्यार्थ्यांना इंग्रजी हा विषय कठीण वाटतो. त्यांनी दैनंदिन जीवनात नेहमी इंग्रजी वृत्तपत्रे वाचावीत. अभ्यास करताना स्वत:च्या नोट्स ह्या स्वत:च तयार कराव्यात. आपण स्पर्धा परीक्षेची सर्व परीक्षा पास झालो व आपली मुलाखत जेव्हा घेण्यात येते त्याचा पाया आपणच ठरवतो. मुलाखतीत जास्तीत जास्त प्रश्न हे आपण भरून दिलेल्या फॉर्ममधलेच असतात. त्यासाठी जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतो तेव्हा आपण आपल्या व्यक्तिमत्त्व विकासाचीही तयारी करणे गरजेचे आहे.आयएएसमध्ये भारतातून प्रथम रँक मिळविणारे गौरव रॉय हे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले, विद्यार्थ्यांनी त्याचे ध्येय ठरवावे व त्याचा पाठलाग करावा. ध्येय मिळण्यासाठी वेळ लागत असेल तर खचून न जाता ध्येय मिळेपर्यंत प्रयत्न करणे गरजेचे आहे. प्रारंभी संत गाडगे महारांजाच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. संचालन प्रवीणकुमार राऊत यांनी केले.