शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींच्या न्यायालयीन लढाईसाठी लोकवर्गणीची तयारी

By admin | Updated: April 24, 2017 00:42 IST

अशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची दगडाने ठेचून हत्या झाल्यानंतर त्याच समाजातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

त्रस्त नागरिकांमध्ये मंथन : कायद्याचा मान ठेवूनच पाऊल उचलणारश्यामकांत सहस्त्रभोजने बडनेराअशोक गजभिये ऊर्फ खांडेराव याची दगडाने ठेचून हत्या झाल्यानंतर त्याच समाजातील लोकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. आरोपींच्या न्यायालयीन लढाईच्या खर्चाची लोकवर्गणीतून गोळाबेरीज करण्याचे ठरविले जात आहे. यावरून ‘खांडेराव’ याच्याप्रति किती रोष होता, हे दिसून येते.बडनेरा पोलिसांनी सदर हत्येप्रकरणी हिरामन रोकडे व संतोष पकीड्डे या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यानंतर या दोन्ही आरोपींची न्यायालयाने कारागृहात रवानगी केली आहे. अशोकच्या हत्येच्या दिवशी पोलिसांनी सर्वंकष बाबींचा तपास केला. आरोपींच्या अटकेसह न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण केली. पोलिसांनी केलेल्या कारवाईबद्दल समाजात कोणताही रोष नाही. मात्र कुख्यात गुंड अशोक याच्या जाचाला कंटाळून सुटकेचा नि:श्वास सोडणाऱ्यांनी आरोपींना न्यायालयीन लढाईसाठी लागणारा खर्च लोकवर्गणीतून देण्याबाबत मंथन सुरू केले आहे. लोकवर्गणी करताना संबंधिताची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन तशी रक्कम गोळा केली जाणार आहे. सामाजिक बांधिलकीची जाणीवबडनेरा : जो काही पैसा गोळा होईल तो न्यायालयीन लढाईवर खर्च केला जाईल. याबाबत समाजात प्रचार, प्रसार सुरू झाला आहे. अशोकच्या हत्येप्रकरणी अटकेतील दोन्ही आरोपीची आर्थिक स्थिती अतिशय बेताची आहे. भविष्यात याप्रकरणी न्यायालय जो काही निर्णय देईल तो समाजमनाला मान्य राहील. मात्र अशोकचा खात्मा करण्यास ज्यांनी पुढाकार घेतला त्यांच्या जामिनासाठी तसेच न्यायालयीन लढाई लढण्यासाठी लागणारा खर्च कसा उभारावा यासाठी युवकांमध्ये मंथन सुरू झाले आहे. आरोपींच्या न्यायालयीन लढाईत सहभागी होताना त्यांच्या कुटुंबियाची होणारी हेळसांड थांबविण्याबाबतही सहकार्य करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अशोक गजभिये याची बडनेरा पोलीस दप्तरी कुख्यात गुंड म्हणून नोंद होती. त्याच्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर अंकूश बसविण्यासाठी पोलिसांनी विविध गुन्हे दाखल केले. एवढेच नव्हे तर तडीपारही करण्यात आले. दर दोन वर्षे अशोक न्यायालयीन कोठडीत होता. पोलीस त्याच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून होते. मात्र अल्पवयीन मुलीच्या छेडखानीप्रकरणी कारागृहातून जामिनावर सुटून येताच त्याने महिलांना शिवीगाळ केल्यामुळे त्याचा खात्मा करण्यात आल्याचा सूर आता नागरिकांतून निघत आहे. अशोक गजभियेच्या हत्येप्रकरणी अटकेतील दोन्ही आरोपींना कायद्याचा मान ठेवूनच जामिनासाठी समाजमन पुढे येत आहे. कायदेशीर लढाईत सहभागी होताना न्यायालयाचा अवमान होणार नाही, याचे भान ठेवण्याबाबत युवक प्रयत्नशील आहेत. आरोपींच्या जामीनसाठी लोकवर्गणीचा प्रयत्न हा बडनेरा शहरात पहिल्यांदाच अनुभवता येत आहे.