शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
3
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
6
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
7
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
8
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन फेका
9
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
10
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
11
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
12
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
13
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
14
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
15
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
16
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
17
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
18
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
19
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...
20
बाजारासाठी 'अ'मंगळवार! सेन्सेक्स ८४९ अंकांनी कोसळला; 'या' ५ मोठ्या कारणांमुळे झाली ऐतिहासिक घसरण

प्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती जिल्हा विभागात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:23 IST

राज्यात दुस-या स्थानी : ३४ हजारांपैकी ११ हजार ३८१ घरकुल पूर्ण

- जितेंद्र दखनेअमरावती - प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामात अमरावती जिल्हा विभागात प्रथम ठरला, तर राज्यात १० हजारांपेक्षा अधिक घरकुले पूर्ण करणा-या जिल्ह्यांमध्ये राज्यात दुसरा क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. याशिवाय पंडित दीनदयाल योजनेंतर्गत घरकूल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेत राज्यात तिस-या क्रमांवर आहे. सोबतच घरासाठी जागा नसलेल्या कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यात जिल्ह्याने बाजी मारली आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शासनाने सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांसाठी ३४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अमरावती जिल्ह्याने सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात १० हजारांपेक्षा जास्त घरकुले पूर्ण करण्यात यश मिळवित राज्यात प्रथम क्रमांकावर नाशिक, तर दुस-या क्रमांकावर अमरावती जिल्हा ठरला आहे. अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने ३४ हजार घरकुलांपैकी सन २०१६-१७ मध्ये ११ हजार ६४९ पैकी ८ हजार २२४, तर २०१७-१८ मध्ये १६ हजार ३४५ पैकी ३ हजार ५७१ घरकूल जुलैअखेरपर्यंत पूर्ण केले आहेत. यामधील घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासोबतच पंडित दीनदयाल योजनेंतर्गत जिल्हाभरातील १३६ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ३६ लाख रूपयांचे अनुदान वाटप केले आहे. 

या योनजेत जिल्हा राज्यात तृतीय स्थानावर आहे. याशिवाय जे कुटुंब अतिक्रमण करून राहत होते, अशा २ हजार ३४५ अतिक्रमणे नियमानुकुल केले आहे. या दोन्ही योजनेत अमरावती जिल्ह्याने विभागात प्रथम स्थान मिळविले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत मागील तीन वर्षांत माघारलेल्या अमरावती जिल्ह्याने घरकुलांची ८९ टक्के कामे पूर्ण केली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा १४ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व अधिनस्त असलेली यंत्रणायाकरिता जोमाने कामाला लागली आहे. येत्या दिवाळीपर्यंत घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा मानस जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने केल्याचे प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी सांगितले.

१ सप्टेंबर रोजी मुंबईत गौरवप्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती जिल्ह्याने घरकूल योजना, पंडित दीनदयाल योजना व अतिक्रम नियमानुकुल करण्यात उकृष्ट कामगिरी केली आहे. याची दखल घेत शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिका-यांचा मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी गौरव केला जाणार आहे.

चांदूर बाजार तालुक्याची बाजीअमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याने १ हजार ३०७ घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे विभागात प्रधानमंत्री आवास योजनेत उकृष्ट कामगिरी करण्यात तालुक्याने बाजी मारली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हाभरात १० हजारांहून अधिक घरकुलांची कामे पूर्ण झाली. काही कामे प्रगतीपथावर आहेत. पंडित दीनदयाल योजना, अतिक्रमणे नियमानुकुल करणे आदी कामे सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या सहका-याने होऊ शकली. दिवाळीपर्यंत घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. - मनीषा खत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, अमरावती

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार