शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती जिल्हा विभागात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:23 IST

राज्यात दुस-या स्थानी : ३४ हजारांपैकी ११ हजार ३८१ घरकुल पूर्ण

- जितेंद्र दखनेअमरावती - प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामात अमरावती जिल्हा विभागात प्रथम ठरला, तर राज्यात १० हजारांपेक्षा अधिक घरकुले पूर्ण करणा-या जिल्ह्यांमध्ये राज्यात दुसरा क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. याशिवाय पंडित दीनदयाल योजनेंतर्गत घरकूल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेत राज्यात तिस-या क्रमांवर आहे. सोबतच घरासाठी जागा नसलेल्या कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यात जिल्ह्याने बाजी मारली आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शासनाने सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांसाठी ३४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अमरावती जिल्ह्याने सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात १० हजारांपेक्षा जास्त घरकुले पूर्ण करण्यात यश मिळवित राज्यात प्रथम क्रमांकावर नाशिक, तर दुस-या क्रमांकावर अमरावती जिल्हा ठरला आहे. अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने ३४ हजार घरकुलांपैकी सन २०१६-१७ मध्ये ११ हजार ६४९ पैकी ८ हजार २२४, तर २०१७-१८ मध्ये १६ हजार ३४५ पैकी ३ हजार ५७१ घरकूल जुलैअखेरपर्यंत पूर्ण केले आहेत. यामधील घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासोबतच पंडित दीनदयाल योजनेंतर्गत जिल्हाभरातील १३६ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ३६ लाख रूपयांचे अनुदान वाटप केले आहे. 

या योनजेत जिल्हा राज्यात तृतीय स्थानावर आहे. याशिवाय जे कुटुंब अतिक्रमण करून राहत होते, अशा २ हजार ३४५ अतिक्रमणे नियमानुकुल केले आहे. या दोन्ही योजनेत अमरावती जिल्ह्याने विभागात प्रथम स्थान मिळविले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत मागील तीन वर्षांत माघारलेल्या अमरावती जिल्ह्याने घरकुलांची ८९ टक्के कामे पूर्ण केली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा १४ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व अधिनस्त असलेली यंत्रणायाकरिता जोमाने कामाला लागली आहे. येत्या दिवाळीपर्यंत घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा मानस जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने केल्याचे प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी सांगितले.

१ सप्टेंबर रोजी मुंबईत गौरवप्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती जिल्ह्याने घरकूल योजना, पंडित दीनदयाल योजना व अतिक्रम नियमानुकुल करण्यात उकृष्ट कामगिरी केली आहे. याची दखल घेत शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिका-यांचा मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी गौरव केला जाणार आहे.

चांदूर बाजार तालुक्याची बाजीअमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याने १ हजार ३०७ घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे विभागात प्रधानमंत्री आवास योजनेत उकृष्ट कामगिरी करण्यात तालुक्याने बाजी मारली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हाभरात १० हजारांहून अधिक घरकुलांची कामे पूर्ण झाली. काही कामे प्रगतीपथावर आहेत. पंडित दीनदयाल योजना, अतिक्रमणे नियमानुकुल करणे आदी कामे सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या सहका-याने होऊ शकली. दिवाळीपर्यंत घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. - मनीषा खत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, अमरावती

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार