शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

प्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती जिल्हा विभागात अव्वल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2018 16:23 IST

राज्यात दुस-या स्थानी : ३४ हजारांपैकी ११ हजार ३८१ घरकुल पूर्ण

- जितेंद्र दखनेअमरावती - प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामात अमरावती जिल्हा विभागात प्रथम ठरला, तर राज्यात १० हजारांपेक्षा अधिक घरकुले पूर्ण करणा-या जिल्ह्यांमध्ये राज्यात दुसरा क्रमांकावर असल्याचे एका सर्वेक्षणाअंती स्पष्ट झाले. याशिवाय पंडित दीनदयाल योजनेंतर्गत घरकूल जागा खरेदी अर्थसाह्य योजनेत राज्यात तिस-या क्रमांवर आहे. सोबतच घरासाठी जागा नसलेल्या कुटुंबांना जागा उपलब्ध करून देण्यात जिल्ह्याने बाजी मारली आहे.जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेसाठी शासनाने सन २०१६-१७ ते २०१८-१९ या तीन वर्षांसाठी ३४ हजार घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी अमरावती जिल्ह्याने सन २०१६-१७ आणि २०१७-१८ या दोन वर्षांच्या कालावधीत राज्यात १० हजारांपेक्षा जास्त घरकुले पूर्ण करण्यात यश मिळवित राज्यात प्रथम क्रमांकावर नाशिक, तर दुस-या क्रमांकावर अमरावती जिल्हा ठरला आहे. अमरावती जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेने ३४ हजार घरकुलांपैकी सन २०१६-१७ मध्ये ११ हजार ६४९ पैकी ८ हजार २२४, तर २०१७-१८ मध्ये १६ हजार ३४५ पैकी ३ हजार ५७१ घरकूल जुलैअखेरपर्यंत पूर्ण केले आहेत. यामधील घरकुलांची कामे प्रगतीपथावर आहेत. यासोबतच पंडित दीनदयाल योजनेंतर्गत जिल्हाभरातील १३६ लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी ३६ लाख रूपयांचे अनुदान वाटप केले आहे. 

या योनजेत जिल्हा राज्यात तृतीय स्थानावर आहे. याशिवाय जे कुटुंब अतिक्रमण करून राहत होते, अशा २ हजार ३४५ अतिक्रमणे नियमानुकुल केले आहे. या दोन्ही योजनेत अमरावती जिल्ह्याने विभागात प्रथम स्थान मिळविले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत मागील तीन वर्षांत माघारलेल्या अमरावती जिल्ह्याने घरकुलांची ८९ टक्के कामे पूर्ण केली आहेत. शासनाने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा १४ पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व अधिनस्त असलेली यंत्रणायाकरिता जोमाने कामाला लागली आहे. येत्या दिवाळीपर्यंत घरकुलांचे काम पूर्ण करण्याचा मानस जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनात प्रशासनाने केल्याचे प्रकल्प संचालक के.एम. अहमद यांनी सांगितले.

१ सप्टेंबर रोजी मुंबईत गौरवप्रधानमंत्री आवास योजनेत अमरावती जिल्ह्याने घरकूल योजना, पंडित दीनदयाल योजना व अतिक्रम नियमानुकुल करण्यात उकृष्ट कामगिरी केली आहे. याची दखल घेत शासनामार्फत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिका-यांचा मुंबई येथे १ सप्टेंबर रोजी गौरव केला जाणार आहे.

चांदूर बाजार तालुक्याची बाजीअमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्याने १ हजार ३०७ घरकुलांची कामे पूर्ण केली आहेत. त्यामुळे विभागात प्रधानमंत्री आवास योजनेत उकृष्ट कामगिरी करण्यात तालुक्याने बाजी मारली आहे.

प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत जिल्हाभरात १० हजारांहून अधिक घरकुलांची कामे पूर्ण झाली. काही कामे प्रगतीपथावर आहेत. पंडित दीनदयाल योजना, अतिक्रमणे नियमानुकुल करणे आदी कामे सर्व अधिकारी व कर्मचा-यांच्या सहका-याने होऊ शकली. दिवाळीपर्यंत घरकुलाचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. - मनीषा खत्री, मुख्यकार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषद, अमरावती

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार