शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
7
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
8
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
9
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
10
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
11
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
12
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
13
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
14
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
15
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
16
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
17
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
18
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
19
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
20
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत

महावितरणची कारवाई, मार्च महिन्यात जिल्ह्यातील ८ हजार ग्राहकांची केली बत्ती गुल

By उज्वल भालेकर | Updated: April 6, 2023 18:04 IST

: ७४ कोटी रुपयांचे वीज बिल केले वसूल

अमरावती : आर्थिक वर्षाच्या अखेरीस वीज बिल भरण्यास प्रतिसाद न देणाऱ्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई महावितरणने केली. जिल्ह्यात जवळपास आठ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला तर, जवळपास ७४ कोटी ९४ लाख रुपयांच्या थकीत बिलाची वसुलीदेखील केल्याचे महावितरणचे म्हणणे आहे.

घरगुती ग्राहकांकडून ४५ कोटी, व्यावसायिक ग्राहक १४ कोटी, औद्योगिक ग्राहक ८.७२ कोटी, कृषी ग्राहक २.१८ कोटी, स्ट्रीट लाइट योजना २.७२ कोटी, तर पाणीपुरवठा योजना २.३२ कोटी रुपये असे एकूण ७४.९४ कोटी रुपयांचे थकीत वीज बिल वसूल केल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

८२ पाणीपुरवठा योजनेचाही वीजपुरवठा खंडित

जिल्ह्यातील १ हजार ९३० पाणीपुरवठा योजनेकडे मार्च अखेर ७७ कोटी १३ लाख ४० हजार रुपयांचे वीज बिल थकीत होते. त्यामुळे यातील ८२ पाणीपुरवठा करणाऱ्या योजनांचाही वीजपुरवठा मार्च महिन्यांमध्ये खंडित करण्यात आला. जिल्ह्यातील पथदिव्यांचेही ११५ कोटी रुपये बिल थकीत असल्याने काही गावातील पथदिव्यांचाही वीजपुरवठा महावितरणने खंडित केल्याची माहिती आहे.

मार्च महिन्यात थकीत वीजबिलाच्या वसुलीसाठी विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याने ७४ कोटी रुपयांच्या थकीत बिलाची वसुली केली. तर ज्या ग्राहकांकडून बिल भरण्यास प्रतिसाद मिळाला नाही, अशा ८ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित केला आहे.

- दिलीप खानंदे, अधीक्षक अभियंता, महावितरण.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजAmravatiअमरावती