शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मेळघाटातील ४२ गावांना मध्य प्रदेशातून वीजपुरवठा; पाणीपुरवठा खंडित, गावकऱ्यांना प्यावे लागले दूषित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 13:27 IST

या गावांना महाराष्ट्रातून वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे.

अचलपूर (अमरावती) :मेळघाटातील पाचडोंगरी, कोयलारी या गावांचा वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी पिण्याचा प्रसंग ओढावला. त्यामुळे अतिसार होऊन चारजणांचा मृत्यू तर, चारशे जणांवर उपचार सुरू आहेत. ही घटना विजेअभावी पाणीपुरवठा योजना बंद असल्याने झाली आहे. परिणामी, आता मेळघाटातील अतिदुर्गम भागातील ४२ गावांना चक्क मध्य प्रदेशातूनवीजपुरवठा केला जातो. या गावांना महाराष्ट्रातून वीजपुरवठा करणे शक्य नसल्याचे वीज वितरण कंपनीने म्हटले आहे.

३३ केव्ही भैसदेही (मध्य प्रदेश) या उपकेंद्रातून, ११ केव्ही वाहिनीद्वारे, जारीदा स्विचिंग स्टेशनच्या माध्यमातून या गावांना २२० किलोमीटर दूरवर पसरलेल्या वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जातो. मेळघाटातील दऱ्या-खोऱ्यांसह घनदाट जंगलातून ही वीजवाहिनी पसरलेली आहे. दरम्यान, या दुर्गम भागातील गावांचा वीजपुरवठा वारंवार खंडित होतो. यातच थकीत वीज बिलांमुळे त्या गावांचा व तेथील योजनांचा वीजपुरवठा वीज वितरण कंपनीकडून खंडित केला जातो. वीज पुरवठा खंडित असलेल्या काळात दुसरीकडून बॅक फिडिंगची व्यवस्था नाही. यातच जारीदा स्विचिंग स्टेशनच्या अगोदर भैसदेही ते जारीदा इन्कमर वाहिनीवर १७ गावे आहेत. त्यानंतर ११ केव्ही जारीदा स्विचिंग स्टेशनमधून एकूण ३ फिडर काढण्यात आले आहेत. याची लांबीही जवळपास १८० किलोमीटर आहे.

राज्य सरकारकडून जनरेटर वापरण्याचा सल्ला

अतिदुर्गम भागातील गावांचा वारंवार वीजपुरवठा खंडित होतो. तर दऱ्या-खोऱ्यांसह घनदाट जंगलातील दोष सुधारून वीजपुरवठा सुरळीत होण्यास वेळ लागतो. वीजपुरवठा खंडित असलेल्या काळात अतिआवश्यक सेवा असलेल्या रुग्णालयांनी जनरेटरची पर्यायी व्यवस्था ठेवावी, असे निर्देश राज्य सरकारने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

वलगाव, नया अकाेला येथे अतिसाराची लागण

अमरावतीनजीकच्या वलगाव, नया अकोला येथे जलवाहिनी लिकेजमुळे दूषित पाणी पुरवठा झाल्याने अतिसाराची लागण झाल्याची घटना सोमवारी निदर्शनास आली. अतिसाराने खुशाल दीपकराव घोम (३०, नया अकोला) यांचा सोमवारी मृत्यू झाला. तर १४ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा प्रकार जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या दुर्लक्षाने झाल्याचा आरोप जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश साबळे यांनी केला आहे. पाचडोंगरी, कोयलारी येथे अतिसाराची घटना उघडकीस आल्यानंतर आता शहर भागातही लागण होत असल्याने खळबळ माजली आहे.

टॅग्स :electricityवीजMelghatमेळघाटMadhya Pradeshमध्य प्रदेश