शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
4
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
5
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
6
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
7
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
8
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
9
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
10
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
11
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
12
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
13
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
14
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
15
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
16
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
17
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
18
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
19
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

कडबी बाजार परिसरात मानवी हस्तक्षेपामुळे वारंवार होतो वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:10 IST

अमरावती : महावितरणच्या कडबी बाजार केंद्र व आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याला तांत्रिक दोष कारणीभूत नसून, मानवी हस्तक्षेप ...

अमरावती : महावितरणच्या कडबी बाजार केंद्र व आजूबाजूच्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याला तांत्रिक दोष कारणीभूत नसून, मानवी हस्तक्षेप आहे. नागरिकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांनी पाहणीनंतर केले.

कडबी बाजार व परिसरात वीजपुरवठा करताना चायना मांजा व पंतंग ही अडथळा ठरतात. वीज वाहिन्या, रोहित्र आणि वीजखांबावर पतंग अडकल्याने तसेच मांजा वीजवाहिन्यांमध्ये गुंतल्यामुळे त्या एकामेकांत स्पर्शून फॉल्ट होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. अडकलेली पंतग व मांजा काढण्यासाठी त्या संपूर्ण वीज वाहिनीचा वीज पुरवठा बंद करावा लागतो. चायना मांजा पक्का असल्याने तुटलेला मांजा ओढताना वीज वाहिन्या एकामेकांना घासून प्रसंगी मोठा अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

बॉक्स:

उच्चदाबाच्या वीज वाहिन्यापासून सुरक्षीत अंतर न ठेवता बांधली घरे

११ केव्ही उच्चदाबाच्या वीज वाहिनींपासून सुरक्षित अंतर न ठेवता अनेक नागरीकांनी घरे बांधली. यानंतर मात्र नागरीकच बांबूने ११ केव्ही वीज वाहिन्यांना घरापासून दूर करण्याचे काम करतात. यामुळेही अनेक वेळा वीज पुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. विजेच्या अतिरिक्त, अनाधिकृत जोडण्यांमुळे रोहित्र अतिभारित होऊन वीजपुरवठा खंडित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. याशिवाय महापालिका, जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्ता रुंदीकरण, पाईप लाईनच्या कामांसाठी जेसीबी मशीनमुळे काही ठिकाणी महावितरणची भूमीगत वाहिनी तुटल्यानेही वीजपुरवठा खंडित झाला आहे.

बॉक्स:

वीज वाहिन्यांपासून दूर पतंग उडवा

वीज वाहिन्यांपासून दूर मोकळ्या मैदानातच पतंग उडवावी. सुरक्षेचा उपाय म्हणून घराला लागून गेलेल्या वीज वाहिन्यांना कोणीही लाकडी टेकू देऊ नये तसेच विजेचा अनाधिकृत वापर टाळण्याचे आवाहन मुख्य अभियंत्यांनी केले आहे.