शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

ग्रामसभांना स्थगिती, गावाच्या विकासाला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST

अमरावती : गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी म्हणून शासनाने ग्रामपंचायतीला विशेष अधिकार प्राप्त करून ...

अमरावती : गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी म्हणून शासनाने ग्रामपंचायतीला विशेष अधिकार प्राप्त करून दिला. ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थ निर्णय घेऊन गावाची प्रगती करू शकतात. मात्र, शासनाने कोरोना पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिल्याने गावच्या विकासाला ब्रेक लागला आहे.

ग्रामविकास विभागाच्या या आदेशामुळे ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. कोरोना काळात रखडलेल्या ग्रामसभा २६ जानेवारीपासून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. मात्र, हा आदेश ग्रामपंचायतीपर्यत पोहोचतो ना पोहोचतो तोच पुन्हा नव्याने आदेश काढून ३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिल्याचे परिपत्रक ग्रा.पं.मध्ये धडकले. ५५३ ग्रामपंचायतींच्या अलीकडे सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. सरपंचपदाची निवड झालेली नाही. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांमार्फत चालविला जात आहे. यापैकी बर्‍याच प्रशासकांकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला आहे. त्यामुळे प्रशासकांनी एकाच वेळी एकापेक्षा अधिक ठिकाणी ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषविणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्रामसभा घेणे परिणामकारक ठरणार नाहीत, असे सांगत ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली आहे. परिणामी गाव विकास कृती आराखडा, १५ वित्त आयोग, ग्रामस्वच्छता अभियान नियोजन, तंटामुक्त गाव, पाणीपुरवठा योजना अशा विविध विकास कामाच्या योजना ग्रामसभेच्या माध्यमातून होत असतात. मात्र, ग्रामसभांना स्थगिती दिली असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.