शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

ग्रामसभांना स्थगिती, गावाच्या विकासाला ब्रेक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:24 IST

अमरावती : गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी म्हणून शासनाने ग्रामपंचायतीला विशेष अधिकार प्राप्त करून ...

अमरावती : गावाचा विकास म्हणजे देशाचा विकास ग्रामीण भागातील विकासाला चालना मिळावी म्हणून शासनाने ग्रामपंचायतीला विशेष अधिकार प्राप्त करून दिला. ग्रामसभेच्या माध्यमातून ग्रामस्थ निर्णय घेऊन गावाची प्रगती करू शकतात. मात्र, शासनाने कोरोना पार्श्वभूमीवर येत्या ३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिल्याने गावच्या विकासाला ब्रेक लागला आहे.

ग्रामविकास विभागाच्या या आदेशामुळे ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटला आहे. कोरोना काळात रखडलेल्या ग्रामसभा २६ जानेवारीपासून घेण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. मात्र, हा आदेश ग्रामपंचायतीपर्यत पोहोचतो ना पोहोचतो तोच पुन्हा नव्याने आदेश काढून ३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिल्याचे परिपत्रक ग्रा.पं.मध्ये धडकले. ५५३ ग्रामपंचायतींच्या अलीकडे सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. सरपंचपदाची निवड झालेली नाही. त्यामुळे सध्या ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांमार्फत चालविला जात आहे. यापैकी बर्‍याच प्रशासकांकडे एकापेक्षा अधिक ग्रामपंचायतींचा कारभार सोपविला आहे. त्यामुळे प्रशासकांनी एकाच वेळी एकापेक्षा अधिक ठिकाणी ग्रामसभेचे अध्यक्षस्थान भूषविणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्रामसभा घेणे परिणामकारक ठरणार नाहीत, असे सांगत ग्रामसभांना स्थगिती देण्यात आली आहे. परिणामी गाव विकास कृती आराखडा, १५ वित्त आयोग, ग्रामस्वच्छता अभियान नियोजन, तंटामुक्त गाव, पाणीपुरवठा योजना अशा विविध विकास कामाच्या योजना ग्रामसभेच्या माध्यमातून होत असतात. मात्र, ग्रामसभांना स्थगिती दिली असल्याने ग्रामस्थांमधून नाराजी व्यक्त होत आहे.