शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, आरएफओंना धक्का

By गणेश वासनिक | Updated: June 3, 2023 13:55 IST

वनविभागाच्या गोटात खळबळ

गणेश वासनिक

अमरावती : राज्याच्या वनविभागात नुकत्याच झालेल्या २०० पेक्षा जास्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) राज्यस्तरीय आणि विभागस्तरावरील बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याबाबतची तक्रार दस्तूरखुद्द वनमंत्र्यांनी केल्याने मुख्यमंत्र्यांनी आरएफओंच्या बदल्यांना स्थगितीचे आदेश शुक्रवारी जारी केले आहेत. वनविभागाच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला असून, कार्यमुक्त झालेल्या आरएफओंना या आदेशामुळे परत बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे.

वनविभागात आरएफओंच्या बदल्यांमध्ये अर्थकारण आणि राजकारण होत असल्याने बदलीच्या हंगामात वनभवन नेहमीच चर्चेत राहते. लागेबांधे आणि लक्ष्मीदर्शन आरएफओंच्या बदल्यामध्ये होत असल्याने वनविभागाची प्रतिमा मलिन होत असल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार वनबल प्रमुख व मुख्य वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिले, मात्र, या बदल्यांमध्ये मोठे अर्थकारण होत असल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांनी जारी केलेल्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वनभवन व वनमंत्रालयात बदल्यांच्या कारणावरून खटके उडत आहेत. मे मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी सोयीनुसार बदल्या करण्यासाठी वनबल प्रमुख व मुख्य वनसंरक्षकांना शिफारशी केल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केलेले होते.

बदल्या रद्द, शासनाचे निर्देश

मे महिन्यात झालेल्या आरएफओंच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे काही लोकप्रतिनिधींनी ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे महसूल व वनविभागाने पत्र क्रमांक ०६/२३/१२१/फ-४ दि. ०२ जून २०२३ रोजी आदेश काढून वनबल प्रमुख व मुख्य वनसंरक्षकांनी केलेल्या बदल्या तत्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या बदल्या रद्द करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी टिप्पणी शासनास सादर केल्यानंतर स्थगिती देताना तपासणी व चौकशीचे आदेश दिले आहे. सोमवारी, ५ जून रोजी वनबल प्रमुख वाय. एस. पी. राव यांना मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश या पत्रात दिले आहे.

कार्यमुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे काय?

बहुतांश आरएफओ बदली व पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले आहेत, अशावेळी त्यांना परत बोलावले जाणार असल्याने अनेकांना धडकी भरली आहे. काही लोकप्रतिनिधींच्या मनासारख्या बदल्या न झाल्याने याला स्थगिती दिली आहे. तिवसा व अमरावती येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्रासाठी एका अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांचे पत्र आणल्याचे बोलले जाते, ही जागा सध्या रिक्त आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागTransferबदलीAmravatiअमरावती