शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींची अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
4
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
5
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
6
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
7
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
8
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
9
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
10
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
11
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
12
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
13
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
14
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
15
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
16
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
17
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
18
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
19
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन
20
समसप्तक नीचभंग राजयोग: ९ राशींना सुवर्ण काळ, अडकलेले पैसे मिळतील; शेअर बाजारात नफा, शुभ-लाभ!

राज्यातील वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, आरएफओंना धक्का

By गणेश वासनिक | Updated: June 3, 2023 13:55 IST

वनविभागाच्या गोटात खळबळ

गणेश वासनिक

अमरावती : राज्याच्या वनविभागात नुकत्याच झालेल्या २०० पेक्षा जास्त वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या (आरएफओ) राज्यस्तरीय आणि विभागस्तरावरील बदल्यांमध्ये अनियमितता झाल्याबाबतची तक्रार दस्तूरखुद्द वनमंत्र्यांनी केल्याने मुख्यमंत्र्यांनी आरएफओंच्या बदल्यांना स्थगितीचे आदेश शुक्रवारी जारी केले आहेत. वनविभागाच्या इतिहासात प्रथमच असा प्रकार घडला असून, कार्यमुक्त झालेल्या आरएफओंना या आदेशामुळे परत बोलावण्याची नामुष्की ओढवली आहे.

वनविभागात आरएफओंच्या बदल्यांमध्ये अर्थकारण आणि राजकारण होत असल्याने बदलीच्या हंगामात वनभवन नेहमीच चर्चेत राहते. लागेबांधे आणि लक्ष्मीदर्शन आरएफओंच्या बदल्यामध्ये होत असल्याने वनविभागाची प्रतिमा मलिन होत असल्याने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आरएफओंच्या बदल्यांचे अधिकार वनबल प्रमुख व मुख्य वनसंरक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना दिले, मात्र, या बदल्यांमध्ये मोठे अर्थकारण होत असल्याचे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक शोमिता बिश्वास यांनी जारी केलेल्या आदेशावरून स्पष्ट झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून वनभवन व वनमंत्रालयात बदल्यांच्या कारणावरून खटके उडत आहेत. मे मध्ये झालेल्या बदल्यांमध्ये सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी सोयीनुसार बदल्या करण्यासाठी वनबल प्रमुख व मुख्य वनसंरक्षकांना शिफारशी केल्या आहेत. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केलेले होते.

बदल्या रद्द, शासनाचे निर्देश

मे महिन्यात झालेल्या आरएफओंच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचे काही लोकप्रतिनिधींनी ही बाब शासनाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे महसूल व वनविभागाने पत्र क्रमांक ०६/२३/१२१/फ-४ दि. ०२ जून २०२३ रोजी आदेश काढून वनबल प्रमुख व मुख्य वनसंरक्षकांनी केलेल्या बदल्या तत्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. या बदल्या रद्द करण्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी टिप्पणी शासनास सादर केल्यानंतर स्थगिती देताना तपासणी व चौकशीचे आदेश दिले आहे. सोमवारी, ५ जून रोजी वनबल प्रमुख वाय. एस. पी. राव यांना मंत्रालयात हजर राहण्याचे आदेश या पत्रात दिले आहे.

कार्यमुक्त झालेल्या अधिकाऱ्यांचे काय?

बहुतांश आरएफओ बदली व पदस्थापनेच्या ठिकाणी रुजू झाले आहेत, अशावेळी त्यांना परत बोलावले जाणार असल्याने अनेकांना धडकी भरली आहे. काही लोकप्रतिनिधींच्या मनासारख्या बदल्या न झाल्याने याला स्थगिती दिली आहे. तिवसा व अमरावती येथील सामाजिक वनीकरण परिक्षेत्रासाठी एका अधिकाऱ्याने थेट मुख्यमंत्र्यांचे पत्र आणल्याचे बोलले जाते, ही जागा सध्या रिक्त आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागTransferबदलीAmravatiअमरावती