शहरं
Join us  
Trending Stories
1
आता ओबीसींचे वादळ रस्त्यावर;  ...तर मुंबई, ठाणे, पुणे जाम करू !
2
नोबेल पुरस्कारापासून वंचित ट्रम्प यांचा रागाने थयथयाट; मारिया मचाडो यांना यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार  
3
लाडक्या बहिणींना ‘दिवाळी भेट’; सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा
4
मंत्र्यांना फर्मान : आश्वासने दिली तर ती ९० दिवसांत पूर्णही करा !
5
आमदार विलास भुमरे म्हणाले, २० हजार मतदार बाहेरून आणले 
6
तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; नियोजन करून पडा बाहेर
7
शाळांमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती नकोच; प्रश्नावलीची गरज तरी काय? भाषातज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित
8
आधी धुरळा कुणाचा? जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीबाबत निर्णय दिवाळीनंतर
9
घुंगट, बुरखाधारी महिला मतदारांची पटवणार ओळख; बिहार निवडणुकीत घेणार अंगणवाडी सेविकांची मदत
10
दहशतवादासाठी आमची भूमी वापरू देणार नाही; अफगाणिस्तानचे भारताला आश्वासन
11
शांततेचा नोबेल: हुकूमशाहीकडून लोकशाहीकडे नेणारी रणरागिणी; २० वर्षांचा लढा जिंकली
12
प्रवीण आमरेने दिलेले बूट नाही विसरणार : सचिन तेंडुलकर
13
अमली पदार्थ तस्करीत १०० कोटींचे व्यवहार; ईडीचे नऊ ठिकाणी छापे
14
चांगले साहित्य सहानुभूती निर्माण करते; ‘अनंतरंग’ सांस्कृतिक महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांचे प्रतिपादन
15
Royal Enfield: आता घरबसल्या बूक करा रॉयल एनफील्ड, 'हे' मॉडेल्स ऑनलाइन खरेदीसाठी उपलब्ध!
16
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
17
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
18
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
19
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
20
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?

कोरोनामुळे ग्रामसभा आयोजनास स्थगिती; ग्रामविकासचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:26 IST

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना याबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.

ठळक मुद्देग्रामपंचयातींना सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमातील कलम ७ अन्वये घेण्यात येणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे. यासंदर्भात १२ मे रोजी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाला आदेश प्राप्त झाले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ८४० ग्रामपंचायतींना याबाबत जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून माहिती देण्यात आली आहे.महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलम ७ नुसार प्रत्येक वित्तीय वर्षात निदान चार ग्रामसभाचे आयोजन करणे बंधनकारक आहे. अशाप्रकारे ग्रामसभेचे आयोजन न केल्यास संबंधित सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवकांना जबाबदार धरून त्याच्याविरूद्ध कार्यवाहीची तरतूद आहे. सद्यस्थितीत कोरोना विषाणू कोविड-१९ हा आजार वैश्विक महामारीच्या स्वरुपात संपूर्ण जगात पसरलेला आहे. या आजाराला रोखण्यासाठी विविध जिल्ह्यात सदर विषाणूच्या प्रतिबंधासाठी केंद्र व राज्य शासनाने मार्गदर्शनानुसार अंमलबजावणी केली जात आहे. त्यानुसार सध्या शाळा, कार्यालये, सिनेमागृह, नाट्यगृह, जलतरण आदी ठिकाणी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने सामुदायिक कार्यक्रमास प्रतिबंध केलेला आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील कोविड-१९ च्या संसर्गजन्य आजरामुळे असणारी आपत्कालीन स्थिती लक्षात घेता ग्रामसभेतमध्ये असणारी ग्रामस्थांची उपस्थिती व त्यामुळे होणारी गर्दी ही आजाराच्या प्रादुभार्वाच्या दृष्टीने योग्य नाही. केंद्र व राज्य शासनाचे आदेश हे अशा प्रकारच्या सभा घेण्यास प्रतिबंध करतात. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम (१९५९ चा मुंबई अधिनियम क्र.)च्या कलम ७ नुसार ग्रामसभा घेण्यास पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत. सदर आदेश हे परिपत्रक निर्गमित झाल्याच्या दिनांकापासून म्हणजेच मंगळवार १२ मे पासून अंमलात आला असून, एक वर्ष किंवा पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे.ग्रामपंचायतीच्या ग्रामसभांच्या आयोजनास शासनाने स्थगिती दिली आहे. याबाबत १२ मे रोजी आदेश प्राप्त झाले. त्यानुसार अंमलबजावणीबाबत बीडीओ, विस्तार अधिकारी यांच्यामार्फत ग्रामपंचायतींना कळविण्यात आले आहे.- दिलीप मानकर,डेप्युटी सीईओ पंचायत

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस