शहरं
Join us  
Trending Stories
1
मान्सून एक्स्प्रेसला ‘बॅड पॅच’; १३ जूनपासून पुन्हा धो-धो..., शेतकरी सक्रिय मोसमी पावसाच्या प्रतीक्षेत
2
"मंदिरापासून ते स्मशानभूमीपर्यंत सगळ्यांना समान अधिकार हवा"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान
3
"PM मोदी युद्ध थांबवण्यात यशस्वी, जर ते लांबले असतं तर नुकसान झालं असतं"; चंद्राबाबू नायडूंनी केलं कौतुक
4
आजचे राशीभविष्य : ०९ जून २०२५; आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी, नोकरीत बढती संभवते
5
...तर गुप्ता, सुपेकरांची चौकशी होणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
6
अमेरिकेतील हॉलीवूडचे शहर पेटले; पोलिसांवर फेकले दगड अन् फटाके, अवैध प्रवाशांविरुद्धच्या मोहिमेला प्रचंड विरोध
7
मोबाइल, लॅपटॉपमधून येणाऱ्या प्रकाशामुळेही तुम्हाला होऊ शकतो कॅन्सर; डॉक्टर म्हणतात, मोबाइल पाहणे थांबवाच
8
लाचखोर उपजिल्हाधिकारी, डीवायएसपी, तहसीलदार यांना अभय कोणाचे?; ३६६ प्रस्ताव मंजुरीच्या प्रतीक्षेत
9
पारंपरिक पदवी अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के कौशल्याधारित शिक्षण, युजीसीकडून लवकरच मार्गदर्शक सूचना; विद्यार्थ्यांच्या रोजगार क्षमतेत होणार वाढ
10
यूपीपाठोपाठ दिल्लीत एन्काउंटरमध्ये वाढ, जूनच्या पहिल्या पाच दिवसांत पाच एन्काउंटर
11
नेपाळच्या ७ हजार लोकांना अमेरिका सोडावी लागणार, अमेरिकेने विशेष देशाचा दर्जा काढून घेतला
12
अंध वकिलाकडून सुप्रीम कोर्टात प्रथमच युक्तिवाद, भारतीय न्यायव्यवस्थेत ऐतिहासिक क्षण
13
जळक्या नोटा : न्या. वर्मांपुढे आता राजीनाम्याचाच पर्याय
14
मणिपूर पेटले, निदर्शकांनी अंगावर घेतले पेट्रोल ओतून
15
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
16
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
17
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
18
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
19
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
20
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...

‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन तर अमरावती व अचलपूर क्षेत्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, लग्नप्रसंगी ...

राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन तर अमरावती व अचलपूर क्षेत्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, लग्नप्रसंगी केवळ दहा जणांना परवानगीची मर्यादा आली. त्यामुळे जे विवाह सोहळे नियोजित होते, ते काहीशा नाराजीने पार पडत असले, तरी हौसमौजेला मर्यादा आल्याने अनेक लग्नाळूंनी ‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती दिली आहे.

आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नाच्या प्रसंगी गणगोताची सरबराई, आनंदाची उधळण, डोळे दीपवणारी रोशणाई, फटाके, वाजंत्री, आतशबाजी, नवीन कपडे न भरपूर एन्जॉयमेंट. मात्र त्यात? आनंदावर कोरोनाने विरजण घातले. म्हणे काय? तर वधू-वरांसह केवळ १० लोकांमध्ये लग्न करा. शक्य आहे का? अजिबात नाही. वधू-वर सोडून केवळ आठ लोक. कोण घ्यायचे त्यात? मुलामुलींचे आईवडील झाले चार. मुलामुलींचे मामा झाले एकूण सहा, भटजी सातवा अन् एखादी करवली. मामा, मावशी, आत्या, काका, भाऊ, बहिणी, आजोबा, आजी या आप्तांचे काय? त्यामुळे यंदा कर्तव्याला टांग दिलेलीच बरी! असा विचार करून अनेक विवाहेच्छुक उपवर वधू लग्न पुढे ढकलत आहेत.

या पंधरवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासनाने खबरदारी म्हणून परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यांत अडचणी आल्या आहेत. तर ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. ज्यांच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे आणि ज्यांची संपूर्ण तयारी झाली आहे अशा वधू-वरांकडील मंडळी ऐनवेळेवर लागलेल्या बंदीने चिंतित आहेत. ग्रामीण भागात पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर लग्न समारंभामध्ये गर्दी होऊ नये, याची जबाबदारी दिली आहे.

मंगल कार्यालयाकडून अ‍ॅडव्हान्स परत

दोन-तीन महिन्यांपूर्वी जी लग्ने निश्चित झालीत, त्यांचे विवाहस्थळ म्हणून जी मंगल कार्यालये ठरविण्यात आली, त्यांनी कारवाईचा बडगा नको, म्हणून वधू-वर पक्षांकडून घेतलेली अ‍ॅडव्हान्सची रक्कम परत करण्याची घाई चालविली आहे. १० व्यक्तींमध्येच विवाह आटोपायचा आहे, तर लोक वधूच्या घरी लग्न करण्यास पसंती देत आहेत. अनेकांनी लग्नानंतरचे रिसेप्शनदेखील रद्द केले आहे.