शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
2
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
3
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
4
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
5
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
6
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
7
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
8
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
9
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
10
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
11
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
12
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
13
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
14
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
15
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
16
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
17
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
18
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
19
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)

‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन तर अमरावती व अचलपूर क्षेत्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, लग्नप्रसंगी ...

राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन तर अमरावती व अचलपूर क्षेत्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, लग्नप्रसंगी केवळ दहा जणांना परवानगीची मर्यादा आली. त्यामुळे जे विवाह सोहळे नियोजित होते, ते काहीशा नाराजीने पार पडत असले, तरी हौसमौजेला मर्यादा आल्याने अनेक लग्नाळूंनी ‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती दिली आहे.

आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नाच्या प्रसंगी गणगोताची सरबराई, आनंदाची उधळण, डोळे दीपवणारी रोशणाई, फटाके, वाजंत्री, आतशबाजी, नवीन कपडे न भरपूर एन्जॉयमेंट. मात्र त्यात? आनंदावर कोरोनाने विरजण घातले. म्हणे काय? तर वधू-वरांसह केवळ १० लोकांमध्ये लग्न करा. शक्य आहे का? अजिबात नाही. वधू-वर सोडून केवळ आठ लोक. कोण घ्यायचे त्यात? मुलामुलींचे आईवडील झाले चार. मुलामुलींचे मामा झाले एकूण सहा, भटजी सातवा अन् एखादी करवली. मामा, मावशी, आत्या, काका, भाऊ, बहिणी, आजोबा, आजी या आप्तांचे काय? त्यामुळे यंदा कर्तव्याला टांग दिलेलीच बरी! असा विचार करून अनेक विवाहेच्छुक उपवर वधू लग्न पुढे ढकलत आहेत.

या पंधरवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासनाने खबरदारी म्हणून परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यांत अडचणी आल्या आहेत. तर ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. ज्यांच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे आणि ज्यांची संपूर्ण तयारी झाली आहे अशा वधू-वरांकडील मंडळी ऐनवेळेवर लागलेल्या बंदीने चिंतित आहेत. ग्रामीण भागात पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर लग्न समारंभामध्ये गर्दी होऊ नये, याची जबाबदारी दिली आहे.

मंगल कार्यालयाकडून अ‍ॅडव्हान्स परत

दोन-तीन महिन्यांपूर्वी जी लग्ने निश्चित झालीत, त्यांचे विवाहस्थळ म्हणून जी मंगल कार्यालये ठरविण्यात आली, त्यांनी कारवाईचा बडगा नको, म्हणून वधू-वर पक्षांकडून घेतलेली अ‍ॅडव्हान्सची रक्कम परत करण्याची घाई चालविली आहे. १० व्यक्तींमध्येच विवाह आटोपायचा आहे, तर लोक वधूच्या घरी लग्न करण्यास पसंती देत आहेत. अनेकांनी लग्नानंतरचे रिसेप्शनदेखील रद्द केले आहे.