शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन तर अमरावती व अचलपूर क्षेत्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, लग्नप्रसंगी ...

राजुरा बाजार : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विकेंड लॉकडाऊन तर अमरावती व अचलपूर क्षेत्रात संचारबंदीसह लॉकडाऊन जाहीर झाला. परिणामी, लग्नप्रसंगी केवळ दहा जणांना परवानगीची मर्यादा आली. त्यामुळे जे विवाह सोहळे नियोजित होते, ते काहीशा नाराजीने पार पडत असले, तरी हौसमौजेला मर्यादा आल्याने अनेक लग्नाळूंनी ‘यंदा कर्तव्य आहे’ला स्थगिती दिली आहे.

आयुष्यात एकदाच येणारा प्रसंग म्हणजे लग्न. लग्नाच्या प्रसंगी गणगोताची सरबराई, आनंदाची उधळण, डोळे दीपवणारी रोशणाई, फटाके, वाजंत्री, आतशबाजी, नवीन कपडे न भरपूर एन्जॉयमेंट. मात्र त्यात? आनंदावर कोरोनाने विरजण घातले. म्हणे काय? तर वधू-वरांसह केवळ १० लोकांमध्ये लग्न करा. शक्य आहे का? अजिबात नाही. वधू-वर सोडून केवळ आठ लोक. कोण घ्यायचे त्यात? मुलामुलींचे आईवडील झाले चार. मुलामुलींचे मामा झाले एकूण सहा, भटजी सातवा अन् एखादी करवली. मामा, मावशी, आत्या, काका, भाऊ, बहिणी, आजोबा, आजी या आप्तांचे काय? त्यामुळे यंदा कर्तव्याला टांग दिलेलीच बरी! असा विचार करून अनेक विवाहेच्छुक उपवर वधू लग्न पुढे ढकलत आहेत.

या पंधरवड्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असताना प्रशासनाने खबरदारी म्हणून परिस्थितीचा आढावा घेऊन संचारबंदी व जमावबंदी लागू केली आहे. संचारबंदी जाहीर झाल्याने सर्व लग्न सोहळ्यांत अडचणी आल्या आहेत. तर ग्रामीणमध्ये काही ठिकाणी कारवाईचा धडाका सुरू झाला आहे. ज्यांच्या लग्नाची तारीख जवळ येत आहे आणि ज्यांची संपूर्ण तयारी झाली आहे अशा वधू-वरांकडील मंडळी ऐनवेळेवर लागलेल्या बंदीने चिंतित आहेत. ग्रामीण भागात पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्यावर लग्न समारंभामध्ये गर्दी होऊ नये, याची जबाबदारी दिली आहे.

मंगल कार्यालयाकडून अ‍ॅडव्हान्स परत

दोन-तीन महिन्यांपूर्वी जी लग्ने निश्चित झालीत, त्यांचे विवाहस्थळ म्हणून जी मंगल कार्यालये ठरविण्यात आली, त्यांनी कारवाईचा बडगा नको, म्हणून वधू-वर पक्षांकडून घेतलेली अ‍ॅडव्हान्सची रक्कम परत करण्याची घाई चालविली आहे. १० व्यक्तींमध्येच विवाह आटोपायचा आहे, तर लोक वधूच्या घरी लग्न करण्यास पसंती देत आहेत. अनेकांनी लग्नानंतरचे रिसेप्शनदेखील रद्द केले आहे.