शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

निवडणूक आयोगाने मागितली लोकसंख्येची माहिती

By admin | Updated: June 27, 2016 00:18 IST

सन २०१७ च्या फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे.

जिल्हा प्रशासनाला पत्र : जिल्हा परिषद, पंचायत निवडणुकीचे समितीला वेधजितेंद्र दखने अमरावतीसन २०१७ च्या फेब्रुवारीमध्ये होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. जि.प. अध्यक्षपदाची आरक्षण सोडत काही दिवसांपूर्वीच काढण्यात आले. त्यामुळे आता या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने प्रभाग रचनेची कार्यवाही येत्या १ सप्टेंबरपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १४ तालुक्यांची सन २०११ च्या लोकसंख्येची माहिती अनुुसूचित जाती, जमातीसह येत्या ५ जुलैपर्यंत सादर करण्याचे निर्देश जिल्हा निवडणूक विभागाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने १४ तहसीलदारांना तालुक्याची लोकसंख्या अनुसूचित जाती, जमातीसह २८ जूनपर्यंत जिल्हा कार्यालयाकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांची मुदत मार्च २०१७ मध्ये संपुष्टात येत असल्याने तत्पूर्वी त्यांच्या सार्वत्रिक निवडणुका घेणे आयोगावर बंधनकारक आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९(१)(अ) अनुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकारी राज्य निवडणूक आयोगास आहेत. मार्च २०१७ पूर्वी जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांच्या संभाव्य निवडणुका लक्षात घेता १ सप्टेंबर २०१६ नंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईस्तोवर जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत बदल करू नये, असे राज्य निवडणूक आयोगाने केले आहे. जनगणना २०११ नुसार जिल्हा परिषद क्षेत्रातील तालुकानिहाय एकूण लोकसंख्या, (अनुसूचित जाती, जमातीसह) जनगणना कार्यालयाकडून प्राप्त करून जिल्हाधिकारी यांनी प्रमाणित करून राज्य निवडणूक आयोगाला पाठवावी लागणार आहे. ही माहिती पाठविताना महापालिका, नगर परिषदा, छावणी क्षेत्र, कटक क्षेत्र आदी नागरी भागातील लोकसंख्येचा समावेश नसावा, नवनिर्मित नगरपंचायती, नगरपरिषदा व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांची हद्दवाढ यातील लोकसंख्या वगळल्याची खात्री करून घ्यावी लागेल. लोकसंख्येची माहिती सादर करताना अनुसूचित जाती, जमातीची लोकसंख्येची माहिती स्वतंत्र अहवालात नमूद करून आयोगाने मागविली आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार ग्रामीण क्षेत्रात लोकसंख्येतील बदलाचा तपशील विस्तृत माहितीसह आयोगास येत्या ५ जुलैपर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर करावा लागणार आहे. (प्रतिनिधी)