शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रगत तंत्राव्दारे बहरली डाळिंबे

By admin | Updated: March 14, 2015 00:42 IST

कृषी व्यवसायात नवनवीन बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे.

गजानन मोहोड अमरावतीकृषी व्यवसायात नवनवीन बदल होत आहे. त्यामुळे पारंपरिक शेतीमध्ये प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक झाला आहे. मूळचे तिवसा तालुक्यामधील शेंदूरजना बाजार येथील सध्या शहरात स्थायिक झालेले राजेश महादेवराव कुरळकर यांची बोरगाव (धर्माळे) येथील १० एकरातील डाळांबाची बाग पाहिल्यावर याची प्रचिती येते. शेती करायची, परंतु ध्येय समोर ठेवून, यासाठी त्यांनी पश्चिम महाराष्ट्र पालथा घातला. शेकडो बगीच्यांना भेटी दिल्यात, चर्चा केली व फक्त डाळिंबाची लागवड करायचा निश्चय केला. यासाठी वाशीम जिल्ह्यातील बागायतदार कुलदीप पाटील यांचा सल्ला मोलाचा ठरला. सध्या त्यांनी लागवड केलेली डाळिंबाची ३ हजार झाडे दीड वर्षांची झाली आहेत. पहिला बहर आला असून एका झाडाला सध्या १०० ग्रॅम वजनाची ७५ ते १०० फळे आहेत. या बहराला बाजार भाव योग्य मिळाल्यास ५० ते ६० लाखांचे उत्पन्न अपेक्षित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माळरानात नव्हे पश्चिम महाराष्ट्रातल्या एखाद्या बगीच्यात तर आपण उभे नाही, असा भास व्हावा, अशा प्रकारे डाळिंबाचा बगीचा बहरला आहे. वास्तविकत: कुरळकर यांचा व्यवसाय ठेकेदारीचा. परंतु शेती करायचीच असा निश्चय करुन त्यांनी नांदगाव पेठ लगतच्या बोरगाव (धर्माळे) या शिवारात १० एकर शेती विकत घेतली. ही मध्यम स्वरुपाची जमीन. येथे विहीर खोदून ३००० भगवा वानाची डाळिंबाची रोपे जालना येथून आणली. दोन रोपांच्या मधात १० फुटाचे अंतर व १४ फुटाचा रस्ता मशागतीसाठी अशी लागवड केली. खासगी कृषी कन्संल्टंटचा सल्ला ते घेतात. दर दोन आठवड्यांनी त्यांची भेट व मार्गदर्शन त्यांना मिळते. शेती करायची परंतु, कृषी तंत्रज्ञानाचा वापर करुनच असे मनाशी ठाम ठरवून सुरूवात केली. दररोज सकाळी ७ त ११ पर्यंत ते स्वत: राबतात. रोपांना ड्रिप पद्धतीने सिंचन करण्यात येते. सेंद्रीय खत, गांडूळ खत, शेणखत याचाच वापर करण्यात येतो. निंबोळी अर्काचा फवारादेखील मारण्यात येतो. यासाठी त्यांनी गांडूळ खताचा प्लाँट शेतात तयार केला आहे. मशागतीसाठी छोट्या ट्रॅकरचा वापर करण्यात येतो. कीटकनाशक फवारणीसाठी छोट्या ट्रॅक्टरला ‘ब्लोअर’ यंत्र जोडून फवारणी करण्यात येते. सध्या ही झाडे दीड वर्षांची झाली आहे. वर्षाला तीन बहर डाळींबाचा येतात. यामध्ये पाणी मुबलक असल्यास हस्त, कमी असल्यास मृग व आंबिया बहर उपयोगाचा असतो, असे त्यांनी सागितले. सुरूवातील उत्पादन खर्च येतो. परंतु हा उत्पादन खर्च पहिल्याच बहरात निघतो. नंतर झाडांची वाढ होते. फळांच्या संख्येतही वाढ होते. त्या तुलनेत उत्पादन खर्च कमी आहे. मात्र उत्पन्न अधिक आहे. प्रगत कृषी तंत्रज्ञानाचा सहकार्याने शेतीमधून हमखास असे उत्पन्न घेता येते. पहिला बहर एकरी किमान ५ लाखांचे उत्पन्न देतो. दरवर्षी फळांची संख्या वाढून कमी उत्पादन खर्चात भरघोस उत्पन्न घेता येते, असे त्यांनी सांगितले.पहिले नियोजन, मग सुरूवातपहिले नियोजन करावे व मग सुरूवात करावी, हा यशस्वी होण्याचा मूलमंत्र आहे. शेती करायची तर काय करावे, यासाठी राज्यात ३००० किमी फिरलो, प्रगत शेती आपल्या भागात कशी करता येईल याचे नियोजन केले. डाळिंबाची बाग करायची असे मनासी ठाम करुन सुरूवात केली. दरदिवशी किमान सहा तास शेतीला देतो. नंतर इतर व्यवसाय सांभाळतो. शेतीचे दर दिवसाचे नियोजन ठरले आहे. दर १५ दिवसांनी खासगी तज्ज्ञांचा सल्ला घेतो. पहिलाच बहर आला आहे. लोकं भेट देतात, योग्य भाव न मिळाल्यास स्वत: मार्केटिंग करु ६० ते १०० रुपये किलोपर्यंत भाव आहे. या अंदाजाने किमान ५० ते ६० लाखांचे उत्पन्न अपेक्षित आहे. जिल्ह्यातील युवकांनी पारंपरिक शेतीसोबत प्रगत कृषितंत्रज्ञानाचा वापर करावा, असे राजेश कुरळकर यांनी सांगितले.१८ महिन्यांनंतर बहराला सुरूवातसंत्र्याचे उत्पादन साधारणपणे पाचव्या वर्षांपासून सुरू होते. याउलट डाळिंबाला २५ ते १८ महिन्यांनंतर पहिला बहर घेता येतो. यासाठी तंज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार झाडाची फवारणी करुन पानगळ करावी लागते. दोन आठवड्यांनंतर झाडाला फुले येण्यास सुरूवात होते. झाडाच्या क्षमतेनुसार फुले ठेवावी. कुरळकर यांच्या शेतातील दीड वर्षांच्या एका झाडाला साधारणपणे ७५ ते १०० फळे आहेत. एका फळाचे वजन १०० ग्रॅम आहे. फळाच्या दर्जाची काळजी घ्यावी लागते. दररोज काय काम करावे, याचा तपशील तयार आहे.