शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

भाजप-सेनेत कुरघोडीचे राजकारण

By admin | Updated: February 2, 2015 22:58 IST

‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ असे म्हणत राज्यात सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप-शिवसेनेत मुंबईपासून तर बांधापर्यंत कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. सत्तेत सोबत असले

अमरावती : ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ असे म्हणत राज्यात सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप-शिवसेनेत मुंबईपासून तर बांधापर्यंत कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. सत्तेत सोबत असले तरी एकमेकांना पाण्यात पाहण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. हे केवळ मंत्रालयापुरतेच सीमित नसून याचे लोण जिल्हास्तरावरही पोहचले आहे. पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दोन-चार दिवसांनंतर भाजप-सेनेच्या मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत.मागील २५ वर्षांपासून भाजप, सेना एकत्र निवडणूक लढवीत असताना यंदा विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरुन भाजपने सेनेसोबतची युती संपुष्टात आणून ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजपला मिळाला. विधानसभा निवडणुकीत सेनेला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. मात्र सत्तास्थापनेची कसरत सुरु असताना प्रारंभी सेनेने मुख्यमंत्रिपदाची दावेदारी केली. परंतु भाजपने सेनेच्या या मागणीला फार प्रतिसाद दिला नाही. किंबहुना सेनेला वाळीत टाकण्याची रणनीती भाजपने आखली. यात भाजपला बऱ्यापैकी यशसुद्धा मिळाले. अपक्ष, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात सत्ता कायम ठेवण्याची व्यूहरचना आखली. मात्र राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शासन चालविणे म्हणजे सिंचन घोटाळ्यावर पांघरुण घालणे होय, अशी प्रतिक्रिया राज्यभर गाजू लागली. परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपची कानउघाडणी करीत सेनेला सत्तेत घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार भाजपने हो-नाही करीत सेनेला दुय्यम दर्जाची खाती देत सत्तेत सामावून घेतले. भाजप नेत्यांची इच्छा नसताना सेनेला सत्तेत घेतले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात सेनेने-भाजप नेत्यांवर केलेल्या आरोप, प्रत्यारोपाच्या जखमा अद्यापही गेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक काबीज करण्याची रणनीती भाजपने रचली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवून सेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील भाजप, सेनेच्या कुरघोडीचे राजकारण संपूर्ण राज्यात पोहचले आहे. एकीकडे भाजपने सदस्य नोंदणीला जोरदार सुरुवात केली असून मंत्रीगण भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी बळ उभे करीत आहे. भाजपने पक्ष बांधणीत मुसंडी मारल्याने सेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना दौरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीत पराभवाची कारणमीमांसा शोधत असताना जुन्या, नवीन शिवसैनिकांना बळ देण्याचे काम करीत आहेत. शुक्रवारी ना. कदम यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा करुन ‘उद्धव पॅटर्न’ समजावून सांगितला आहे. अमरावती जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि यापुढेही राहिल, असा कानमंत्र देत आपसातील हेवेदावे दूर करण्याचा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. सेना असेल तर आपण राहू, त्यामुळे अंतर्गत वाद बाजूला सारा, एकदिलाने काम करा, असे म्हणत ना. कदम यांनी शेतकरी, शेतमजूर, सामान्यांपर्यंत सेना पोहचविण्यासाठी शासन योजनेचा आधार घेण्याचे सांगितले. यापूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे सुद्धा अमरावतीत येऊन गेलेत. एका सत्कार सोहळ्यातून सेना बांधणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. भाजपची घोडदौड रोखण्यासाठी शिवसैनिकांना ‘चार्ज’ करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरु झाले आहेत. ज्या जिल्ह्यात भाजपचे मंत्री येऊन गेले, त्यानंतर पुढच्या आठवड्यात त्याच जिल्ह्यात सेनेचा मंत्री पाठवून नियोजन आखत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. भाजप-सेनेत राजकीय कुरघोडी ही विदर्भात सर्वाधिक दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भ भाजपच्या बाजूने राहिल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले आहे. आघाडी शासनाच्या काळात मंत्र्यांचे लालदिवे हे कधी, कधी दिसून यायचे. मात्र आता अमरावती, अकोला व नागपुरात मंत्र्यांच्या लालदिव्यांची जणू मांदियाळीच सुरु असल्याचे चित्र आहे. विशेषत: सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, उद्योग राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे तसेच राज्याचे गृह, सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांचे अमरावती आणि अकोला हे ‘घर आंगण’ झाले आहे. या दोन्ही राज्यमंत्र्यांनी भाजप सदस्य नोंदणीसाठी स्वत:ला झोकून दिले आहे. गत आठवड्यात केंद्रीय रासायनिक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी अमरावतीत येऊन भाजप सदस्य नोंदणीचा आढावा घेतला आहे.