शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
3
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
4
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
5
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
6
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
7
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
8
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
9
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
10
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
11
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
13
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
14
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
15
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
16
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
17
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
18
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
19
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
20
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!

भाजप-सेनेत कुरघोडीचे राजकारण

By admin | Updated: February 2, 2015 22:58 IST

‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ असे म्हणत राज्यात सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप-शिवसेनेत मुंबईपासून तर बांधापर्यंत कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. सत्तेत सोबत असले

अमरावती : ‘तुझे माझे जमेना, तुझ्याविना करमेना’ असे म्हणत राज्यात सत्ता हस्तगत करणाऱ्या भाजप-शिवसेनेत मुंबईपासून तर बांधापर्यंत कुरघोडीचे राजकारण सुरु झाले आहे. सत्तेत सोबत असले तरी एकमेकांना पाण्यात पाहण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत. हे केवळ मंत्रालयापुरतेच सीमित नसून याचे लोण जिल्हास्तरावरही पोहचले आहे. पक्ष संघटन आणि कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी दोन-चार दिवसांनंतर भाजप-सेनेच्या मंत्र्यांचे दौरे सुरु आहेत.मागील २५ वर्षांपासून भाजप, सेना एकत्र निवडणूक लढवीत असताना यंदा विधानसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरुन भाजपने सेनेसोबतची युती संपुष्टात आणून ‘एकला चलो’ची भूमिका घेतली. विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेचा फायदा भाजपला मिळाला. विधानसभा निवडणुकीत सेनेला अपेक्षेप्रमाणे जागा मिळाल्या नाहीत. मात्र सत्तास्थापनेची कसरत सुरु असताना प्रारंभी सेनेने मुख्यमंत्रिपदाची दावेदारी केली. परंतु भाजपने सेनेच्या या मागणीला फार प्रतिसाद दिला नाही. किंबहुना सेनेला वाळीत टाकण्याची रणनीती भाजपने आखली. यात भाजपला बऱ्यापैकी यशसुद्धा मिळाले. अपक्ष, राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने भाजपने राज्यात सत्ता कायम ठेवण्याची व्यूहरचना आखली. मात्र राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर शासन चालविणे म्हणजे सिंचन घोटाळ्यावर पांघरुण घालणे होय, अशी प्रतिक्रिया राज्यभर गाजू लागली. परिणामी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने भाजपची कानउघाडणी करीत सेनेला सत्तेत घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार भाजपने हो-नाही करीत सेनेला दुय्यम दर्जाची खाती देत सत्तेत सामावून घेतले. भाजप नेत्यांची इच्छा नसताना सेनेला सत्तेत घेतले. मात्र विधानसभा निवडणुकीच्या काळात सेनेने-भाजप नेत्यांवर केलेल्या आरोप, प्रत्यारोपाच्या जखमा अद्यापही गेल्या नाहीत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूक काबीज करण्याची रणनीती भाजपने रचली आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक भाजप स्वबळावर लढवून सेनेला जय महाराष्ट्र करण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील भाजप, सेनेच्या कुरघोडीचे राजकारण संपूर्ण राज्यात पोहचले आहे. एकीकडे भाजपने सदस्य नोंदणीला जोरदार सुरुवात केली असून मंत्रीगण भाजप पदाधिकाऱ्यांच्या पाठीशी बळ उभे करीत आहे. भाजपने पक्ष बांधणीत मुसंडी मारल्याने सेनेत कमालीची अस्वस्थता पसरली आहे. परिणामी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांना दौरे करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम हे विदर्भाच्या दौऱ्यावर असून विधानसभा निवडणुकीत पराभवाची कारणमीमांसा शोधत असताना जुन्या, नवीन शिवसैनिकांना बळ देण्याचे काम करीत आहेत. शुक्रवारी ना. कदम यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी बंदद्वार चर्चा करुन ‘उद्धव पॅटर्न’ समजावून सांगितला आहे. अमरावती जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला होता, आहे आणि यापुढेही राहिल, असा कानमंत्र देत आपसातील हेवेदावे दूर करण्याचा सल्ला त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. सेना असेल तर आपण राहू, त्यामुळे अंतर्गत वाद बाजूला सारा, एकदिलाने काम करा, असे म्हणत ना. कदम यांनी शेतकरी, शेतमजूर, सामान्यांपर्यंत सेना पोहचविण्यासाठी शासन योजनेचा आधार घेण्याचे सांगितले. यापूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते, महसूल राज्यमंत्री संजय राठोड हे सुद्धा अमरावतीत येऊन गेलेत. एका सत्कार सोहळ्यातून सेना बांधणीचे उद्दिष्ट ठरविण्यात आले. भाजपची घोडदौड रोखण्यासाठी शिवसैनिकांना ‘चार्ज’ करण्यासाठी मंत्र्यांचे दौरे सुरु झाले आहेत. ज्या जिल्ह्यात भाजपचे मंत्री येऊन गेले, त्यानंतर पुढच्या आठवड्यात त्याच जिल्ह्यात सेनेचा मंत्री पाठवून नियोजन आखत असल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळ जिल्हा हा सेनेचा बालेकिल्ला करण्याची प्रतिज्ञा घेतली आहे. भाजप-सेनेत राजकीय कुरघोडी ही विदर्भात सर्वाधिक दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत विदर्भ भाजपच्या बाजूने राहिल्याचे निकालाअंती स्पष्ट झाले आहे. आघाडी शासनाच्या काळात मंत्र्यांचे लालदिवे हे कधी, कधी दिसून यायचे. मात्र आता अमरावती, अकोला व नागपुरात मंत्र्यांच्या लालदिव्यांची जणू मांदियाळीच सुरु असल्याचे चित्र आहे. विशेषत: सार्वजनिक बांधकाम, पर्यावरण, उद्योग राज्यमंत्री तथा अमरावतीचे पालकमंत्री प्रवीण पोटे तसेच राज्याचे गृह, सामान्य प्रशासनाचे राज्यमंत्री रणजित पाटील यांचे अमरावती आणि अकोला हे ‘घर आंगण’ झाले आहे. या दोन्ही राज्यमंत्र्यांनी भाजप सदस्य नोंदणीसाठी स्वत:ला झोकून दिले आहे. गत आठवड्यात केंद्रीय रासायनिक राज्यमंत्री हंसराज अहिर यांनी अमरावतीत येऊन भाजप सदस्य नोंदणीचा आढावा घेतला आहे.