शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

जिल्ह्यात पोलिसांना हवे रेकॉर्डवरील १७८ गुन्हेगार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST

संदीप मानकर /अमरावती : विविध प्रकारचे एकापेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून अद्यापही फरार असलेल्या जिल्ह्यातील १७८ रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा ...

संदीप मानकर /अमरावती : विविध प्रकारचे एकापेक्षा अधिक गंभीर स्वरुपाचे गुन्हे करून अद्यापही फरार असलेल्या जिल्ह्यातील १७८ रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध पोलीस घेत आहेत. जिल्ह्यात यावर्षी अचलपूर शहरातून गुन्हेगारी पार्शवभूमीच्या एका युवकाचे अपहरण करून त्याची निर्घृण हत्या करण्यात आली. त्यानंतर त्याचा मृतदेह जाळून तुकडे करून मध्यप्रदेशातील नदीत फेकले होते. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली होती.

१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२० पर्यंत जिल्ह्यात खूनाच्या ८८ घटना घडल्या. यापैकी ८४ खुनाच्या घटना उघड करून आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. खुनाच्या घटना जरी जिल्ह्यात घडल्या असल्या तरी संघटित गुन्हेगारीत मात्र, घट झाली आहे. ग्रामीण भागात गतवर्षी दोनच घटना संघटित गुन्हेगारीतून घडल्याचे पुढे आले. खुनाच्या २४ घटना शहर हद्दीत, तर ६४ घटना ग्रामीण भागात घडल्या होत्या. जिल्ह्यात खुनाचा प्रयत्नाच्या १०६, बलात्कार १९०, जबरी चोरीच्या ७३ घटना घडल्या. यापैकी ७० घटना शहर हद्दीतील आहेत. घडफोडीच्या ३५७ घटना जिल्ह्यात घडल्या आहेत. त्यापैकी १२२ घटना उघडकीस आल्या. घरफोडीतील चोरट्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

१) दाखल गंभीर गुन्हे- ४५७

२) फरार असलेले गुन्हेगार-१७८

बॉक्स

वर्षभरात केले १२४ आरोपी तडीपार

वारंवार गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असलेल्या व ज्या आरोपींमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते अशा १२४ जणांना जिल्ह्यातून पोलिसांनी तडीपार केले होते. त्यात सर्वाधिक १०७ तडीपार शहर हद्दीत, तर १७ तडीपार ग्रामीण पोलिसांनी घोषित केले होते. तडीपारी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शहरातील ८१ आरोपींना पोलिसांनी अटक केली होती.

बॉक्स:

गुंड प्रवृत्तीतून दोन हत्या

ग्रामीण भागातील अचलपूरातून एका संघटित गुन्हेगारीतून ३ डिसेंबर रोजी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या दोघांनी गुंड प्रवृत्तीच्या एका युवकाची हत्या केली. त्याचा मृतदेह जाळून तुकडे करून ते मध्यप्रदेशातील मेघा नदीत फेकले होते. दुसरी घटना तिवसा येथे ९ ऑगस्ट रोजी घडली होती. १४ जणांनी एका युवकाच्या घरात घुसून चाकूने भोसकले होते. शहरात एका दीड महिन्याच्या चिमुकल्याला विहिरीत टाकल्याची घटना घडली होती. याप्रकरणी राजापेठ पोलिसांनी त्याच्या आईला अटक केली होती. मात्र, या गुन्ह्याची अद्याप कबुली मिळाली नसल्याने हा गुन्हा उघड होऊ शकला नाही.

कोट

विविध गुन्ह्यांत पोलिसांना हवे असलेले रेकॉर्डवरील आरोपींची पथकाव्दारे शोधमोहीम सुरूच आहे. दर दोन ते तीन महिन्यांतून यासंदर्भात आढावासुद्धा घेण्यात येत आहे. गंभीर स्वरुपाचे अनेक गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.

- हरीबालाजी एन. जिल्हा पोलीस अधीक्षक, अमरावती