शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

अचलपूरच्या पोलीस ठाण्यातील गर्दी ओसरली

By admin | Updated: August 25, 2015 00:37 IST

अमित बटाऊवाले यांची हत्या झाल्यानंतर ठाणेदारांच्या बदल्या झाल्यात. पोलीस ठाण्यात नेहमी दिसणारी गर्दी दिसेनासी झाली.

ठाण्यात परिवर्तन : शांतता समिती नव्याने गठित होणारअमरावती/अचलपूर : अमित बटाऊवाले यांची हत्या झाल्यानंतर ठाणेदारांच्या बदल्या झाल्यात. पोलीस ठाण्यात नेहमी दिसणारी गर्दी दिसेनासी झाली. ठाण्यातील ही गर्दी अचानक ओसरली कशी, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.रेती तस्करांनी अमित बटाऊवाले यांची हत्या करून मोहन बटाऊवाले यांना गंभीर जखमी केले. या घटनेमुळे पोलीस स्टेशनचे अनेक अलिखित नियम बदलले असल्याचे दिसून येत आहे. शांतता समिती बरखास्त करण्यात आली असून नव्याने ती गठित होणार आहे. पोलीस स्टेशनचा मागील तीन वर्षांत बारभाई कारभार झाल्यासारखा स्पष्ट दिसत होते. तत्कालीन ठाणेदार चक्षूपाल बहादुरे यांच्या केबीनमध्ये येणाऱ्या-जाणाऱ्यांसाठी १० ते १२ खुर्च्या ठेवलेल्या होत्या. तेथे नेहमी जुगारी, सट्टेबाज, पत्तेवाले, अवैध गुटखाविक्रेते, भंगारवाले यांचेसह दलाल म्हणून ओळखले जाणाऱ्यांची भाऊगर्दी लोकांना दिसत होती. प्रतिष्ठित आणि शांतताप्रिय लोक चुकूनही दृष्टीस पडत नव्हते. बऱ्याच वेळा ज्येष्ठ नागरिकांचा अपमान करण्याचीही कसूर बहादुरे यांनी सोडली नव्हती. पूर्वीच्या या चित्रात तूर्त परिवर्तन झालेले दिसत आहे. ठाणेदाराच्या केबीनमध्ये असलेल्या खुर्च्या गायब करण्यात आल्या आहेत. पोलीस ठाण्यात झालेल्या परिवर्तनाची चर्चा अचलपूर परिसरात सुरू आहे. (प्रतिनिधी)बहादुरेंच्या काळात अवैध धंदे फोफावले ठाणेदार बहादुरे यांच्या कार्यकाळात पोलीस ठाण्यात अवैध धंदेवाल्यांचा व एजंट म्हणून जनतेत प्रसिद्ध असणाऱ्यांचा वावर होता, हे चित्र नेहमीच दिसायचे. प्रतिष्ठित नागरिक ठाण्यात जात नव्हते. भाई लोक तर खुर्चीत दिसायचे. सध्यातरी त्याला ब्रेक बसला आहे, असे मत नगरसेवक नितीन डकरे, सतीश आकोलकर, माजी सरपंच दिलीप राऊत, नगरसेवक बाळासाहेब वानखडे, विनय चतूर, अनिल महाराज शर्मा, धर्मा यादव, गोविंद चरपटे, उत्तम साखरे, अभिजित सरोदे, नितीन भुयार, वर्षा हिरूळकर यांनी व्यक्त केले आहे.शहरातील रेती तस्करी, अवैध गुटखा, जुगार यावर खुफिया विभागाची नजर आहे. शांतता समितीत ज्यांचेवर गंभीर गुन्हे दाखल आहेत अशा लोकांना त्यातून काढून खरोखर प्रतिष्ठित व सुशिक्षित लोक घेण्यात येतील. शांतता समितीची सभा दर महिन्याला घेण्यात येईल. पोलीस आणि जनतेत समन्वय निर्माण करण्यात येईल. असामाजिक तत्त्व किंवा गुंड कुठल्याही जातीधर्माचा असो त्याची गय अजिबात केली जाणार नाही. दादागिरी करणाऱ्यांचीही माहिती घेऊन नोंद घेण्यात येत आहे.- नरेंद्र ठाकरे, ठाणेदार अचलपूर.हिंदू सणांदरम्यानच शहरात अराजकता का निर्माण होते? याचे मास्टर मार्इंड कोण आहेत, याचा शोध पोलिसांनी घ्यावा. यापूर्वी २००७ मध्ये देवी विसर्जन मिरवणुकीत दगडफेक कोणी केली? किंवा अशी वेळ कोण साधते याची मुळापासून पोलिसांनी चौकशी केल्यास सर्व प्रकार उघड होईल. बहादुरे यांच्या काळात कोणाची चलती होती, हे जनतेला सर्व माहीत आहे. - भोला चव्हाण,शहराध्यक्ष, भाजपा.