शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचे केबल घेणाऱ्याला पोलिसांचे अभय!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:22 IST

वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : शेतकऱ्यांच्या शेतातून चोरलेल्या बोअरवेलचे केबल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अंजनगाव सुर्जी ...

वनोजा बाग (अंजनगाव सुर्जी) : शेतकऱ्यांच्या शेतातून चोरलेल्या बोअरवेलचे केबल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अंजनगाव सुर्जी पोलिसांनी अभय दिल्याचा आरोप करून शेतकऱ्यांनी पोलीस प्रशासनाविषयी संताप व्यक्त केला. स्थानिक पोलिसांच्या भूमिकेविरोधात पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांकडे त्यांनी धाव घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या तक्रारीनुसार, महिनाभरापासून भंडारज शिवारातून केबल सातत्याने चोरीला जात आहेत. यासंबधी तक्रार करण्यासाठी भंडारज येथील शेतकरी १४ फेब्रुवारी रोजी अंजनगाव ठाण्यात गेले, मात्र, त्यांची तक्रार घेण्यात आली नाही. २५ फेब्रुवारी रोजी गावातीलच एका शेतकऱ्याने चोराला रंगेहाथ पकडले. यासंबंधी राजकुमार वानखडे यांनी १४ फेब्रुवारी रोजी दिलेल्या लेखी तक्रारीवरून २७ तारखेला अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसरीकडे २५ फेब्रुवारी रोजी रंगेहाथ पकडलेल्या सतीश नामक व्यक्तीने चोरलेले केबल अंजनगावातील एका भंगार विक्रेत्याला विकत असल्याची कबुली शेतकऱ्यांसमोर दिली. तरीही त्या भंगार विक्रेत्याविरुद्ध पोलीस गुन्हा का दाखल करीत नाहीत, असा संतप्त सवाल करीत भंडारज येथील नागरिकांनी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. परिणामी, शेतकऱ्यांच्या दबावानंतर आरोपी सतीश रवींद्र राक्षसकर याच्याविरुद्ध भादंविचे कलम ११९, १५२, ३७९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. उपविभागीय अधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीवर राजकुमार वानखडे, प्रवीण गिते, नितीन पडोळे, ब्रिजमोहन शर्मा, शेख सलीम, हरिभाऊ बेंदरकर, गुणवंत गिते यांच्यासह ३० शेतकऱ्यांची स्वाक्षरी आहे.

कोट

ज्या भंगार विक्रेत्याकडे चोराने केबल विकला, त्याच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. उलट प्रकरण दाबण्यासाठी आमिष देण्यात येते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेऊन ठाणेदाराविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी वरिष्ठांकडे केली आहे.

- सागर हुरबडे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.

कोट२

आरोपी सतीश राक्षसकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आरोपी पोलीस कोठडीत आहे. चोरीचा मुद्देमाल विकत घेणाऱ्याचे नाव मिळताच त्याला सहआरोपी केले जाईल.

राजेश राठोड, ठाणेदार, अंजनगाव सुर्जी