शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
4
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
5
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
6
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
7
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
8
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
11
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
12
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
13
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
14
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
19
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
20
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत

पोलीस संरक्षणात कंपोस्ट डेपोची जागा ताब्यात घेणार

By admin | Updated: May 25, 2014 23:13 IST

नजीकच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपो परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने लागणारी जागा महापालिका पोलीस संरक्षणात ताब्यात घेणार आहे.

अमरावती : नजीकच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपो परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने लागणारी जागा महापालिका पोलीस संरक्षणात ताब्यात घेणार आहे. त्याकरिता पोलिसांना पत्रसुध्दा देण्यात आले आहे.

नरखेड रेल्वे मार्गालगतच्या दक्षिणेकडील आठ शेतकर्‍यांच्या १८ हेक्टर जमिनीचा व्यवहार प्रशासनाने पूर्ण केला आहे. मात्र, या जमिनीसाठी दिलेला मोबदला पुरेसा नसल्याची बाब पुढे करून या शेतकर्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका सादर केली. या याचिकेवर न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. परंतु शेतकर्‍यांचा जमिनी देण्यास आजही विरोध कायम आहे. तर दुसरीकडे कम्पोस्ट डेपो ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने लगतच्या वस्त्यांमध्ये रोगराईची शक्यता बळावली आहे. यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकर्‍यांचा रोष पाहून अधिकार्‍यांना परतावे लागले. पुन्हा प्रशासनाने जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. येथील उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याशी जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात महापालिकेचे सहायक संचालक नगररचना अधिकारी कांबळे, आरोग्य अधिकारी देवेंद्र गुल्हाने, गणेश कुत्तरमारे आदींनी चर्चा करून उच्च न्यायालयाचा निकाल व खरेदीची कागदपत्रे दाखविली. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जमिनी ताब्यात घता आल्या नाही. मात्र, २७ मे नंतर या जमिनी पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याला अवगत करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी देवेंद्र गुल्हाने यांनी सांगितले. जमिनी खरेदीचे व्यवहार सहायक संचालक नगररचना विभागाने केले आहे. अडीच कोटी रूपये या जमिनीसाठी लागल्याची माहिती आहे. बाजार मूल्यानुसार ठरलेले दर शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत. हे व्यवहार एकूणच पारदर्शकतेने झाले असून जमिनीचे दर उपनिबंधक कार्यालयाने ठरविल्यानुसार देण्यात आले आहेत. जमिनीचे दर ठरविण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. हे शेतकर्‍यांनी समजून घ्यावे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. कम्पोस्ट डेपोत ६0 फूट कचर्‍याची टेकडी तयार झाली आहे. या कचर्‍याची लवकर विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अन्यथा मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागेल, हे वास्तव आहे.

घनकचरा व्यवस्थापन अंर्तगत कचर्‍यापासून खत व कोळसा निर्मितीचा प्रकल्प मुंबईच्या ईकोफील कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. महापालिकेने या कंपनीसोबत करारनामासुध्दा केला असून जमीन हस्तातंरणाची प्रक्रिया आटोपताच वर्षभराच्या आत हा प्रकल्प सुरू करण्याची प्रशासनाची तयारी आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच जमिनीचे सीमांकन करून ती ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती आहे.