शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

पोलीस संरक्षणात कंपोस्ट डेपोची जागा ताब्यात घेणार

By admin | Updated: May 25, 2014 23:13 IST

नजीकच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपो परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने लागणारी जागा महापालिका पोलीस संरक्षणात ताब्यात घेणार आहे.

अमरावती : नजीकच्या सुकळी येथील कम्पोस्ट डेपो परिसरात घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या अनुषंगाने लागणारी जागा महापालिका पोलीस संरक्षणात ताब्यात घेणार आहे. त्याकरिता पोलिसांना पत्रसुध्दा देण्यात आले आहे.

नरखेड रेल्वे मार्गालगतच्या दक्षिणेकडील आठ शेतकर्‍यांच्या १८ हेक्टर जमिनीचा व्यवहार प्रशासनाने पूर्ण केला आहे. मात्र, या जमिनीसाठी दिलेला मोबदला पुरेसा नसल्याची बाब पुढे करून या शेतकर्‍यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका सादर केली. या याचिकेवर न्यायालयाने महापालिकेच्या बाजूने निर्णय दिला. परंतु शेतकर्‍यांचा जमिनी देण्यास आजही विरोध कायम आहे. तर दुसरीकडे कम्पोस्ट डेपो ‘ओव्हर फ्लो’ झाल्याने लगतच्या वस्त्यांमध्ये रोगराईची शक्यता बळावली आहे. यापूर्वी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ही जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकर्‍यांचा रोष पाहून अधिकार्‍यांना परतावे लागले. पुन्हा प्रशासनाने जमीन ताब्यात घेण्याच्या हालचाली वेगाने सुरू केल्या आहेत. येथील उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे यांच्याशी जमीन ताब्यात घेण्यासंदर्भात महापालिकेचे सहायक संचालक नगररचना अधिकारी कांबळे, आरोग्य अधिकारी देवेंद्र गुल्हाने, गणेश कुत्तरमारे आदींनी चर्चा करून उच्च न्यायालयाचा निकाल व खरेदीची कागदपत्रे दाखविली. दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जमिनी ताब्यात घता आल्या नाही. मात्र, २७ मे नंतर या जमिनी पोलीस बंदोबस्तात ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने चालविली आहे. खोलापुरी गेट पोलीस ठाण्याला अवगत करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी देवेंद्र गुल्हाने यांनी सांगितले. जमिनी खरेदीचे व्यवहार सहायक संचालक नगररचना विभागाने केले आहे. अडीच कोटी रूपये या जमिनीसाठी लागल्याची माहिती आहे. बाजार मूल्यानुसार ठरलेले दर शेतकर्‍यांना देण्यात आले आहेत. हे व्यवहार एकूणच पारदर्शकतेने झाले असून जमिनीचे दर उपनिबंधक कार्यालयाने ठरविल्यानुसार देण्यात आले आहेत. जमिनीचे दर ठरविण्याचे अधिकार महापालिकेला नाहीत. हे शेतकर्‍यांनी समजून घ्यावे, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. कम्पोस्ट डेपोत ६0 फूट कचर्‍याची टेकडी तयार झाली आहे. या कचर्‍याची लवकर विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. अन्यथा मोठय़ा समस्येला सामोरे जावे लागेल, हे वास्तव आहे.

घनकचरा व्यवस्थापन अंर्तगत कचर्‍यापासून खत व कोळसा निर्मितीचा प्रकल्प मुंबईच्या ईकोफील कंपनीकडे सोपविण्यात आला आहे. महापालिकेने या कंपनीसोबत करारनामासुध्दा केला असून जमीन हस्तातंरणाची प्रक्रिया आटोपताच वर्षभराच्या आत हा प्रकल्प सुरू करण्याची प्रशासनाची तयारी आहे. पोलीस बंदोबस्त मिळताच जमिनीचे सीमांकन करून ती ताब्यात घेतली जाणार असल्याची माहिती आहे.