शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
2
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
3
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
4
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
5
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा
6
आजचे राशीभविष्य- ४ ऑक्टोबर २०२५: पैशांच्या गुंतवणुकीवर लक्ष द्या, कमी वेळात जास्त लाभ घेण्याची लालसा सोडा
7
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
8
अमेरिकी रस्त्यावर भारतीय बाइक्सने अभिमान वाटतो; राहुल यांनी अमेरिकेत केला भारतीय कंपन्यांचा गौरव
9
लेह हिंसाचार : सोनम वांगचुक यांना अटक; न्याय मागण्यासाठी पत्नी कोर्टात
10
‘बाबा’ विद्यार्थिनींना रात्री खोलीत येण्यास भाग पाडायचा; मिळाली १४ दिवस कोठडी
11
आता सौरऊर्जेवर चालणारी ई-बुलेट आली; ऊर्जाबचत, प्रदूषण नियंत्रणासाठी मोठा फायदा
12
नवी मुंबई विमानतळास दि. बा. पाटील यांचेच नाव; नामकरणासाठी पंतप्रधान मोदी सकारात्मक : मुख्यमंत्री 
13
अमेरिकेच्या टॅरिफ संकटात भारतासह युरोपियन देशांची भूमिका मोलाची; स्वेन ओस्टबर्ग यांचे मत
14
संपादकीय : आता खरी लढाई! मेळावे झाले, घोषणा झाल्या... आता सीमोल्लंघन कधी?
15
पाणंद रस्ते मोकळे करा,  तरच मिळेल सरकारी लाभ; प्रस्ताव विचाराधीन
16
सोमवारपासून परतीच्या सरी; चक्रीवादळ 'शक्ती'मुळे महाराष्ट्रात पुन्हा पाऊस? हवामान खात्याचा नेमका अंदाज काय?
17
डोनाल्ड ट्रम्प आता सिनेमावाल्यांवर का भडकले?
18
आपण जंगलाला आग लावली, पूर गावात बोलावला!
19
मनोज जरांगेंचा १९९४ च्या जी. आर. विरोधात एल्गार! 'या' दोन मोठ्या जातींच्या आरक्षणावर बोलले
20
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट

शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी प्रहारचा मोर्चा

By admin | Updated: November 17, 2014 22:45 IST

अमरावतीसह विदर्भात दुष्काळ घोषित करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार, किसान मित्र-शेतकरी संघटना यांच्यावतीने नेहरू मैदान येथून सोमवारी सायंकाळी ७ वाजता

प्रशासनाची तारांबळ : विभागीय आयुक्त रात्री पोहोचले कार्यालयातअमरावती : अमरावतीसह विदर्भात दुष्काळ घोषित करावा व शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी प्रहार, किसान मित्र-शेतकरी संघटना यांच्यावतीने नेहरू मैदान येथून सोमवारी सायंकाळी ७ वाजता मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा रात्री ८.३० वाजता विभागीय कार्यालयावर पोहोचला. आमदार बच्चू कडू यांच्यासह मोर्चेकऱ्यांना कार्यालयाच्या गेटवर पोलिसांनी रोखून धरले. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. रात्री ९ वाजता विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर यांनी कार्यालयात येऊन शिष्टमंडळाशी चर्चा केली. भाजपा सरकारच्या वचननाम्यात शेतकऱ्यांच्या स्थितीची जाणीव ठेऊन पन्नास टक्के नफा धरून शेतमालाचे भाव देऊ व डॉ. स्वामीनाथन शेती आयोगाची व डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालातील ज्या शिफारसी आहेत त्या लागू करू अशी शेतकऱ्यांची हमी घेणाऱ्या शासनाने पन्नास टक्के नफा धरून शेतमालाचे भाव काढून जाहीर करावे. याला वेळ लागत असेल तर सद्याचे जाहीर भाव व पन्नास टक्के नफा धरून मिळणारे भाव यामधील तफावतीची रक्कम शेतकऱ्यांना बोनस म्हणून द्यावी, वचननाम्यानुसार शेतकऱ्यांना दिवसा १२ तास पूर्ण व्होल्टेजसह वीज मिळावी, सद्या नादुरूस्त असलेल्या डीबी दुरूस्त कराव्यात व पुढे नादुरूस्त होणाऱ्या डीबी २४ तासाच्या आत दुरूस्त होतील असे आदेश द्यावे, अनिश्चित लहरी पावसामुळे शेतकऱ्यांवर आलेल्या परिस्थितीचा विचार करून विदर्भ, मराठवाडा दुष्काळग्रस्त घोषित करावा व शेतकऱ्यांना जीवन जगण्यासाठी प्रति हेक्टर १० हजार रूपये मदत द्यावी, कोरडवाहू शेती जोपर्यंत सिंचनाची व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्या शेतकऱ्याला दरवर्षी प्रति एकर १० हजार रूपये आर्थिक सहाय्यता देण्यात यावी, राज्याच्या नरेंद्र जाधव समितीने केलेल्या शिफारसीची अंमलबजावणी त्वरीत करावी व केंद्र सरकारने डॉ. एस. एस. स्वामीनाथन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेल्या शेतकरी आयोगाच्या शिफारसीवर अंमलबजावणी करावी यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे पाठपुरावा करावा, अशा विविध मागण्यांचा समावेश होता.