शहरं
Join us  
Trending Stories
1
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
2
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
3
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
4
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
5
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
6
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
7
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
8
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
9
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
10
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
11
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला
12
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
13
'तुम्ही कुणाला त्रास दिला, तर अजिबात ऐकणार नाही'; अजित पवारांचा इशारा
14
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
15
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
16
शेअर बाजारातील जोखीम घटक काय असतो? तुमची गुंतवणूक वाचवून चांगला नफा कसा कमवायचा?
17
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
18
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
19
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
20
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?

दर्यापुरात प्लास्टिकबंदी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:57 IST

श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे.

ठळक मुद्देसरसकट उल्लंघन : सणासुदीला सर्रास वापर, पालिकेची कारवाई थंडावली

किरण होले।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. मात्र, प्लास्टिकबंदी राज्यात अनेक ठिकाणी फसली असल्याचेच दिसत आहे. शहरात प्लास्टिकबंदी कागदावरच दिसत असून, शहरातील हातगाड्यांसह दुकानांमध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत तर प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढला आहे. श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, ५० मायक्रॉनखालील प्लास्टिक कॅरी बॅगच्या वापरावर बंदी आहे. दुसरीकडे पर्यावरणास हानिकारक असलेल्या असलेल्या प्लास्टिकवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शहरा-शहरात प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या. दर्यापुरातही सुरुवातीला धडाक्यात कारवाई करण्यात आली. शासनाने प्लास्टिक कॅरी बॅग दिसल्यानंतर पाच हजार रुपयांचा दंड आकरण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांकडून शेकडो किलो प्लास्टिक जप्त केल्यानंतरही पाच हजारांचाच दंड आकारला जात असल्याने त्यांनी प्लास्टिकबंदी गांभीर्याने घेतली नाही. प्रशासनाकडून केवळ दंड आकरण्यात येत असल्याने व्यापाऱ्यानी प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला आहे. परिणामी शहरात प्लास्टिकबंदीचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी गणेशचतुर्थीच्या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होती. मात्र ७० टक्के ग्राहकांना प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधूनच साहित्य देण्यात आले. गणेशोत्सवासाठी लागणारे फळ तर हटकून प्रतिबंधित काळ्या रंगाच्या थैलीमधून देण्यात आले. प्रशासन त्याबाबत मौन आहे.नागरिकांमधून प्रश्नशहरातील अनेक दुकानांसह हातगाड्यांवरही प्लास्टिक पन्नीचा बिनधास्त वापर होताना दिसून येत आहे. दुकानदार व हातगाडेवाले प्लास्टिक बॅगेत साहित्य देत असल्याने नागरिकही मुक्तपणे वापर करीत आहेत. शहरातील हे चित्र झाल्यानंतर खरेच प्लॉस्टिकबंदीचा निर्णय झाला आहे का, असा प्रश्न सुजाण नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.

प्लास्टिक कचऱ्याची वाढती डोकेदुखीशहरात प्लास्टिकचा वापर सर्रास होत असल्याने त्याचा कचरा कमी झालेलाच नाही. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी प्लास्टिक कचºयाचा ढीग पहायला मिळत आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने ही स्थिती पाहायला मिळते. बाजारपेठेच्या कोपऱ्यात, हातगाड्यांजवळ प्लास्टिकचा सर्वाधिक कचरा दिसून येतो.बंदीनंतरही पुरवठा कसा?बंदीनंतरही प्लास्टिक बॅगचा पुरवठा कसा होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बंदीचा निर्णय झाल्यानंतरही उत्पादन सुरु आहे का, त्याच नियमित पुरवठा होता का, याची साधी कल्पनाही प्रशासन किंवा शासनाला नाही का, असे प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. मात्र, यासंबंधी उत्तर देण्यास ना लोकप्रतिनिधी पुढे येत, ना प्रशासकीय अधिकारी.

 

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019