शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

दर्यापुरात प्लास्टिकबंदी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:57 IST

श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे.

ठळक मुद्देसरसकट उल्लंघन : सणासुदीला सर्रास वापर, पालिकेची कारवाई थंडावली

किरण होले।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. मात्र, प्लास्टिकबंदी राज्यात अनेक ठिकाणी फसली असल्याचेच दिसत आहे. शहरात प्लास्टिकबंदी कागदावरच दिसत असून, शहरातील हातगाड्यांसह दुकानांमध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत तर प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढला आहे. श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, ५० मायक्रॉनखालील प्लास्टिक कॅरी बॅगच्या वापरावर बंदी आहे. दुसरीकडे पर्यावरणास हानिकारक असलेल्या असलेल्या प्लास्टिकवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शहरा-शहरात प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या. दर्यापुरातही सुरुवातीला धडाक्यात कारवाई करण्यात आली. शासनाने प्लास्टिक कॅरी बॅग दिसल्यानंतर पाच हजार रुपयांचा दंड आकरण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांकडून शेकडो किलो प्लास्टिक जप्त केल्यानंतरही पाच हजारांचाच दंड आकारला जात असल्याने त्यांनी प्लास्टिकबंदी गांभीर्याने घेतली नाही. प्रशासनाकडून केवळ दंड आकरण्यात येत असल्याने व्यापाऱ्यानी प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला आहे. परिणामी शहरात प्लास्टिकबंदीचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी गणेशचतुर्थीच्या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होती. मात्र ७० टक्के ग्राहकांना प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधूनच साहित्य देण्यात आले. गणेशोत्सवासाठी लागणारे फळ तर हटकून प्रतिबंधित काळ्या रंगाच्या थैलीमधून देण्यात आले. प्रशासन त्याबाबत मौन आहे.नागरिकांमधून प्रश्नशहरातील अनेक दुकानांसह हातगाड्यांवरही प्लास्टिक पन्नीचा बिनधास्त वापर होताना दिसून येत आहे. दुकानदार व हातगाडेवाले प्लास्टिक बॅगेत साहित्य देत असल्याने नागरिकही मुक्तपणे वापर करीत आहेत. शहरातील हे चित्र झाल्यानंतर खरेच प्लॉस्टिकबंदीचा निर्णय झाला आहे का, असा प्रश्न सुजाण नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.

प्लास्टिक कचऱ्याची वाढती डोकेदुखीशहरात प्लास्टिकचा वापर सर्रास होत असल्याने त्याचा कचरा कमी झालेलाच नाही. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी प्लास्टिक कचºयाचा ढीग पहायला मिळत आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने ही स्थिती पाहायला मिळते. बाजारपेठेच्या कोपऱ्यात, हातगाड्यांजवळ प्लास्टिकचा सर्वाधिक कचरा दिसून येतो.बंदीनंतरही पुरवठा कसा?बंदीनंतरही प्लास्टिक बॅगचा पुरवठा कसा होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बंदीचा निर्णय झाल्यानंतरही उत्पादन सुरु आहे का, त्याच नियमित पुरवठा होता का, याची साधी कल्पनाही प्रशासन किंवा शासनाला नाही का, असे प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. मात्र, यासंबंधी उत्तर देण्यास ना लोकप्रतिनिधी पुढे येत, ना प्रशासकीय अधिकारी.

 

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019