शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
4
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
5
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
6
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
7
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
8
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
9
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
10
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
11
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
12
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
13
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
14
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
15
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
16
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
17
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
18
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
19
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
20
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 

दर्यापुरात प्लास्टिकबंदी फसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 00:57 IST

श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे.

ठळक मुद्देसरसकट उल्लंघन : सणासुदीला सर्रास वापर, पालिकेची कारवाई थंडावली

किरण होले।लोकमत न्यूज नेटवर्कदर्यापूर : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून प्लास्टिकबंदीचा निर्णय घेतला. मात्र, प्लास्टिकबंदी राज्यात अनेक ठिकाणी फसली असल्याचेच दिसत आहे. शहरात प्लास्टिकबंदी कागदावरच दिसत असून, शहरातील हातगाड्यांसह दुकानांमध्ये सर्रास प्लास्टिकचा वापर होत आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत तर प्लास्टिकचा वापर बेसुमार वाढला आहे. श्रीगणेशाच्या मुर्तीलाही प्लास्टिकचे आवरण सर्रास पाहावयास मिळत आहे. याशिवाय सजावटीचे साहित्यही प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधून दिले जात आहे. याबाबत पालिका प्रशासनाने सोईस्कर मौन धारण केले आहे. पालिकेची कारवाई थंडावली आहे.केंद्र सरकारच्या निर्णयानुसार, ५० मायक्रॉनखालील प्लास्टिक कॅरी बॅगच्या वापरावर बंदी आहे. दुसरीकडे पर्यावरणास हानिकारक असलेल्या असलेल्या प्लास्टिकवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. त्यानंतर नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून शहरा-शहरात प्लास्टिक कॅरी बॅगचा वापर करणाऱ्यांवर कारवाया करण्यात आल्या. दर्यापुरातही सुरुवातीला धडाक्यात कारवाई करण्यात आली. शासनाने प्लास्टिक कॅरी बॅग दिसल्यानंतर पाच हजार रुपयांचा दंड आकरण्याचा निर्णय घेतला. व्यापाऱ्यांकडून शेकडो किलो प्लास्टिक जप्त केल्यानंतरही पाच हजारांचाच दंड आकारला जात असल्याने त्यांनी प्लास्टिकबंदी गांभीर्याने घेतली नाही. प्रशासनाकडून केवळ दंड आकरण्यात येत असल्याने व्यापाऱ्यानी प्लास्टिकचा वापर सुरूच ठेवला आहे. परिणामी शहरात प्लास्टिकबंदीचा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सोमवारी गणेशचतुर्थीच्या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी होती. मात्र ७० टक्के ग्राहकांना प्रतिबंधित प्लास्टिक बॅगमधूनच साहित्य देण्यात आले. गणेशोत्सवासाठी लागणारे फळ तर हटकून प्रतिबंधित काळ्या रंगाच्या थैलीमधून देण्यात आले. प्रशासन त्याबाबत मौन आहे.नागरिकांमधून प्रश्नशहरातील अनेक दुकानांसह हातगाड्यांवरही प्लास्टिक पन्नीचा बिनधास्त वापर होताना दिसून येत आहे. दुकानदार व हातगाडेवाले प्लास्टिक बॅगेत साहित्य देत असल्याने नागरिकही मुक्तपणे वापर करीत आहेत. शहरातील हे चित्र झाल्यानंतर खरेच प्लॉस्टिकबंदीचा निर्णय झाला आहे का, असा प्रश्न सुजाण नागरिकांतून विचारला जाऊ लागला आहे.

प्लास्टिक कचऱ्याची वाढती डोकेदुखीशहरात प्लास्टिकचा वापर सर्रास होत असल्याने त्याचा कचरा कमी झालेलाच नाही. परिणामी शहरातील अनेक ठिकाणी प्लास्टिक कचºयाचा ढीग पहायला मिळत आहे. प्लास्टिकबंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी नीट होत नसल्याने ही स्थिती पाहायला मिळते. बाजारपेठेच्या कोपऱ्यात, हातगाड्यांजवळ प्लास्टिकचा सर्वाधिक कचरा दिसून येतो.बंदीनंतरही पुरवठा कसा?बंदीनंतरही प्लास्टिक बॅगचा पुरवठा कसा होतो, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बंदीचा निर्णय झाल्यानंतरही उत्पादन सुरु आहे का, त्याच नियमित पुरवठा होता का, याची साधी कल्पनाही प्रशासन किंवा शासनाला नाही का, असे प्रश्न यानिमित्त उपस्थित होत आहेत. मात्र, यासंबंधी उत्तर देण्यास ना लोकप्रतिनिधी पुढे येत, ना प्रशासकीय अधिकारी.

 

टॅग्स :Ganesh Mandal 2019गणेश मंडळ 2019