शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

निंभोरा लाहे येथे तीन हेक्टरमध्ये झाडे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:27 IST

नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरणाचे दुर्लक्ष : साडे तीन हजार झाडे जळाली; पाच ते सहा लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.गतवर्षी जुलै महिन्यात निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने ८ ते १० हेक्टर परिसरात वृक्ष लागवड मोहिम राबविली. वर्षभरात ही रोपे तीन फुटापर्यंत पोहचली. दरम्यान तीन हेक्टरमध्ये वृक्ष लागवडीचे रोपे बहरली. ही रोपे जगविण्यासाठी सामाजिक वनीकरणाने प्रयत्न सुद्धा केले. तथापि, रोपे तीन फूट उंचीचे आणि गवत पाच फुटांच्यावर पोहचले. त्यामुळे रविवारी अचानक लागलेल्या आगीमुळे गवतासह तीन फुट लांबीचे झाडे जळून खाक झाली. ज्यावेळी सामाजिक वनीकरणाच्या वृक्ष लागवडीचे रोपे जळत होती, त्यावेळी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी नव्हते, असे प्रत्यक्षदर्शनींचे म्हणने आहे. काही ग्रामस्थांनी जंगलात आग लागल्याची माहिती बडनेरा येथील महापालिका झोन कार्यालयाला दिली. त्यानंतर अग्निशमनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परंतु, आग नियंत्रणात येईस्तोवर सामजिक वनीकरणाची झाडे गवतासह जळून खाक झाली होती. महापालिका अग्निशमन कर्मचाऱ्यांनी बंबाद्वारे आग विझविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. जिवंत झाडांभोवती गवत वाढले असताना ते काढण्यात आले नाही. त्यामुळे गवतासह लाखो रुपयांची झाडेसुद्धा आगीचे लक्ष्य ठरली.साडे तीन हजार झाडे जळाल्याचा अंदाज आहे. ही झाडे १०० टक्के जगली होती. मात्र, आग कोणी, कशाने लागली, हे कळू शकले नाही. या आगीत पाच ते सहा लाख रूपयांची झाडे जळून खाक झाली आहे. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.- डी.बी. पवारआरएफओ, वनीकरणसामाजिक वनीकरणाने झाडांची काळजी घेतली नाही. त्यामुळे आगीत हिरवेगार तीन फुटापर्यंतची झाडे जळून खाक झाली. आग लागत असताना वनकर्मचारी कोणीही उपस्थित नव्हते. वेळीच दखल घेतली असती तर हिरवेगार झाडे वाचविता आले असते.- गणेश ढोरेग्रामस्थ, निंभोरा लाहे.