शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

निंभोरा लाहे येथे तीन हेक्टरमध्ये झाडे खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 22:27 IST

नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.

ठळक मुद्देसामाजिक वनीकरणाचे दुर्लक्ष : साडे तीन हजार झाडे जळाली; पाच ते सहा लाखांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कबडनेरा : नजीकच्या पाच कि.मी. अंतरावर असलेल्या निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने गतवर्षी १३ कोटी वृक्ष लागवडी अंतर्गत लावलेली तीन हेक्टरमधील सुमारे साडे तीन हजार झाडे जळाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. मात्र, ही घटना सामाजिक वनीकरणाने दाबण्याचा प्रयत्न केला असता ही बाब ग्रामस्थांनी निदर्शनास आणून दिली.गतवर्षी जुलै महिन्यात निंभोरा लाहे येथील सामाजिक वनीकरणाने ८ ते १० हेक्टर परिसरात वृक्ष लागवड मोहिम राबविली. वर्षभरात ही रोपे तीन फुटापर्यंत पोहचली. दरम्यान तीन हेक्टरमध्ये वृक्ष लागवडीचे रोपे बहरली. ही रोपे जगविण्यासाठी सामाजिक वनीकरणाने प्रयत्न सुद्धा केले. तथापि, रोपे तीन फूट उंचीचे आणि गवत पाच फुटांच्यावर पोहचले. त्यामुळे रविवारी अचानक लागलेल्या आगीमुळे गवतासह तीन फुट लांबीचे झाडे जळून खाक झाली. ज्यावेळी सामाजिक वनीकरणाच्या वृक्ष लागवडीचे रोपे जळत होती, त्यावेळी सामाजिक वनीकरणाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी नव्हते, असे प्रत्यक्षदर्शनींचे म्हणने आहे. काही ग्रामस्थांनी जंगलात आग लागल्याची माहिती बडनेरा येथील महापालिका झोन कार्यालयाला दिली. त्यानंतर अग्निशमनचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले. परंतु, आग नियंत्रणात येईस्तोवर सामजिक वनीकरणाची झाडे गवतासह जळून खाक झाली होती. महापालिका अग्निशमन कर्मचाऱ्यांनी बंबाद्वारे आग विझविण्याचे पुरेपूर प्रयत्न केले मात्र त्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. जिवंत झाडांभोवती गवत वाढले असताना ते काढण्यात आले नाही. त्यामुळे गवतासह लाखो रुपयांची झाडेसुद्धा आगीचे लक्ष्य ठरली.साडे तीन हजार झाडे जळाल्याचा अंदाज आहे. ही झाडे १०० टक्के जगली होती. मात्र, आग कोणी, कशाने लागली, हे कळू शकले नाही. या आगीत पाच ते सहा लाख रूपयांची झाडे जळून खाक झाली आहे. याबाबत वरिष्ठांना कळविले आहे.- डी.बी. पवारआरएफओ, वनीकरणसामाजिक वनीकरणाने झाडांची काळजी घेतली नाही. त्यामुळे आगीत हिरवेगार तीन फुटापर्यंतची झाडे जळून खाक झाली. आग लागत असताना वनकर्मचारी कोणीही उपस्थित नव्हते. वेळीच दखल घेतली असती तर हिरवेगार झाडे वाचविता आले असते.- गणेश ढोरेग्रामस्थ, निंभोरा लाहे.