शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

खिरगव्हाण ग्रामपंचायतीकडून मुलींसाठी मुदत ठेवीची योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 21:57 IST

स्त्री-पुरुष समानतेसाठी आपला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवार, १७ फेब्रुवरीपासून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे.

ठळक मुद्देस्त्रीजन्माला प्रोत्साहन : सरपंचांची संकल्पना, राज्यातील पहिला प्रयोग

रवींद्र वानखडे ।आॅनलाईन लोकमतवनोजा बाग : स्त्री-पुरुष समानतेसाठी आपला हातभार लागावा, या दृष्टिकोनातून तालुक्यातील खिरगव्हाण ग्रामपंचायतीच्यावतीने शनिवार, १७ फेब्रुवरीपासून अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. गावात मुलगी जन्माला आली, तर तिच्या नावाने ग्रामपंचायत दोन हजार रुपयांचे फिक्स डिपॉझिट करेल, शिवाय आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलींच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये जमा केले जातील.सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांच्या संकल्पनेतून ही अभिनव योजना सुरू करण्यात आली आहे. खिरगव्हाण (समशेरपूर) हे एक हजार लोकसंख्येचे छोटेसे गाव. ग्रामपंचायतच्यावतीने स्त्रीजन्म प्रोत्साहनाला चालना देणारी अभिनव योजना सुरू करण्यात आली असून, महाराष्ट्रातील हा प्रथमच उपक्रम असावा.ग्रामपंचायत हद्दीत मुलगी जन्माला आल्यास तिच्या नावे दोन हजार रुपये फिक्स डिपॉझिट करण्यात येईल, शिवाय गावातील आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या मुलीच्या नावानेसुद्धा दोन हजार रुपये भरले जातील. शनिवार, १७ फेब्रुवारीला सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी ग्रामसेवक, इतर सदस्य, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष यांच्या उपस्थितीत या उपक्रमाची घोषणा केली.गाव हगणदारीमुक्त, शिक्षणाला प्राधान्यवर्षभरापूर्वी थेट निवडून आलेले सरपंच पुरुषोत्तम घोगरे यांनी शिक्षणाला प्राधान्य देऊन कार्य सुरू केले. गावात असलेल्या जिल्हा परिषद शाळेची अवस्था सुधारली व स्वच्छ महाराष्ट्र अभियानात सहभागी होऊन संपूर्ण गावाचे स्वरूप पालटले. यानंतर हगणदरीमुक्तीकडे गावाचा मोर्चा वळला. गाव पूर्णपणे हगणदारीमुक्त होऊन गोदरीच्या ठिकाणी संत गाडगेबाबा स्मारक उद्यान तयार करण्यात आले आहे. आणि घाणीचा येथे लवलेशही राहिलेला नाही.स्त्रीजन्म नितांत गरज आज स्त्री-पुरुष सामाजिक असमतोल बघता, भविष्यातील चित्र भयावह आहे. समानतेसाठी आपला कुठे तरी हातभार लागावा, या दृष्टिकोणातून या उपक्रमाचे पाऊल उचलले आहे.- पुरुषोत्तम घोगरे,सरपंच, खिरगव्हाण