शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले.

ठळक मुद्देअमृत योजनेत घोळ; पाणीपुरवठ्यावर खर्ची घातलेले शंभर कोटींहून अधिक ठरले व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात पाण्याच्या नियोजनासह वितरण व्यवस्था कोलमडली आहे. त्यात अमृत योजनेतील घोळाने अधिक भर पडली आहे. शहरवासीयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. पाणी असूनही नागरिकांना मिळत नसल्यामुळे दहा वर्षांत पाणीपुरवठा योजनेच्या नावे खर्ची पडलेली शंभर कोटींहून अधिकची रक्कम व्यर्थ ठरली आहे.केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले. तेथून २२ किलोमीटर लांबीची शुद्ध पाण्याची गुरुत्ववाहिनी (पाइप लाइन) टाकली गेली. शहरात नव्याने पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. या टाक्यांवरून ९१.४ किमी लांबीची नवीन वितरण व्यवस्था अंथरली गेली. २५ किमी लांबीची जुनी पाइप लाइन बदलविली गेली. पण, नागरिकांना अपेक्षेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यास योजना सक्षम ठरली नाही.दरम्यान, दहा वर्षांच्या आतच नवीन पाइप लाइन टाकली गेली. शहराच्या अनुषंगाने कार्यालयात उपलब्ध रेखाटने आणि प्रत्यक्ष पाइप लाइन याचा कुठे मेळच बसत नाही. या पाइप लाइनचे जॉइंट जोडले गेले नाहीत. काही भागात दुहेरी पाइप लाइन आली आहे. दोन्ही पाइपवर नळ कनेक्शन दिले गेले. मात्र, मीटर बसविले गेले नाहीत.अमृत योजनेतील पाइप लाइनवर मोठे लीकेज आहेत. शहरात रस्त्याच्या एका बाजूला पाणी, तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी ओरड असल्याची स्थिती शहरात दिसत आहे.२० कोटी थकीतअचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नळधारकांकडे पिण्याच्या पाण्याचे २० कोटी थकीत आहेत. यात साडेपंधरा कोटी अचलपूर शहरातील, तर साडेचार कोटी परतवाडा शहरातील नळधारकांकडे थकबाकी आहे. व्याजानुसार ही रक्कम दरवर्षी वाढत असून, थकीतदारांचा पाणीपुरवठा आजही सुरू आहे.नळधारकांकडे २० कोटी थकीत आहेत. व्याजमाफीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. अमृत योजनेतील पाइप जोडले गेलेली नाहीत.- मिलिंद वानखडेअभियंता, पाणी पुरवठा न.प. अचलपूरचौकशीची मागणीअमृत योजनेतील पाइप लाइनची चौकशी करण्याची मागणी काही नगरसेवकांसह नागरिकांनी केली आहे. संबंधित ठेकेदार काम सोडून गेल्याची महिती आहे. काम अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची लगबग सध्या सुरू आहे. चंद्रभागा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचे आॅटोमायझेशन प्रस्तावित होते. ते दहा वर्षांपासून झालेले नाही.

टॅग्स :Socialसामाजिक