शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले.

ठळक मुद्देअमृत योजनेत घोळ; पाणीपुरवठ्यावर खर्ची घातलेले शंभर कोटींहून अधिक ठरले व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात पाण्याच्या नियोजनासह वितरण व्यवस्था कोलमडली आहे. त्यात अमृत योजनेतील घोळाने अधिक भर पडली आहे. शहरवासीयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. पाणी असूनही नागरिकांना मिळत नसल्यामुळे दहा वर्षांत पाणीपुरवठा योजनेच्या नावे खर्ची पडलेली शंभर कोटींहून अधिकची रक्कम व्यर्थ ठरली आहे.केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले. तेथून २२ किलोमीटर लांबीची शुद्ध पाण्याची गुरुत्ववाहिनी (पाइप लाइन) टाकली गेली. शहरात नव्याने पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. या टाक्यांवरून ९१.४ किमी लांबीची नवीन वितरण व्यवस्था अंथरली गेली. २५ किमी लांबीची जुनी पाइप लाइन बदलविली गेली. पण, नागरिकांना अपेक्षेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यास योजना सक्षम ठरली नाही.दरम्यान, दहा वर्षांच्या आतच नवीन पाइप लाइन टाकली गेली. शहराच्या अनुषंगाने कार्यालयात उपलब्ध रेखाटने आणि प्रत्यक्ष पाइप लाइन याचा कुठे मेळच बसत नाही. या पाइप लाइनचे जॉइंट जोडले गेले नाहीत. काही भागात दुहेरी पाइप लाइन आली आहे. दोन्ही पाइपवर नळ कनेक्शन दिले गेले. मात्र, मीटर बसविले गेले नाहीत.अमृत योजनेतील पाइप लाइनवर मोठे लीकेज आहेत. शहरात रस्त्याच्या एका बाजूला पाणी, तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी ओरड असल्याची स्थिती शहरात दिसत आहे.२० कोटी थकीतअचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नळधारकांकडे पिण्याच्या पाण्याचे २० कोटी थकीत आहेत. यात साडेपंधरा कोटी अचलपूर शहरातील, तर साडेचार कोटी परतवाडा शहरातील नळधारकांकडे थकबाकी आहे. व्याजानुसार ही रक्कम दरवर्षी वाढत असून, थकीतदारांचा पाणीपुरवठा आजही सुरू आहे.नळधारकांकडे २० कोटी थकीत आहेत. व्याजमाफीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. अमृत योजनेतील पाइप जोडले गेलेली नाहीत.- मिलिंद वानखडेअभियंता, पाणी पुरवठा न.प. अचलपूरचौकशीची मागणीअमृत योजनेतील पाइप लाइनची चौकशी करण्याची मागणी काही नगरसेवकांसह नागरिकांनी केली आहे. संबंधित ठेकेदार काम सोडून गेल्याची महिती आहे. काम अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची लगबग सध्या सुरू आहे. चंद्रभागा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचे आॅटोमायझेशन प्रस्तावित होते. ते दहा वर्षांपासून झालेले नाही.

टॅग्स :Socialसामाजिक