शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

अचलपूर-परतवाड्यात नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले.

ठळक मुद्देअमृत योजनेत घोळ; पाणीपुरवठ्यावर खर्ची घातलेले शंभर कोटींहून अधिक ठरले व्यर्थ

लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : अचलपूर नगरपालिका क्षेत्रात पाण्याच्या नियोजनासह वितरण व्यवस्था कोलमडली आहे. त्यात अमृत योजनेतील घोळाने अधिक भर पडली आहे. शहरवासीयांना पाण्याकरिता भटकंती करावी लागत आहे. पाणी असूनही नागरिकांना मिळत नसल्यामुळे दहा वर्षांत पाणीपुरवठा योजनेच्या नावे खर्ची पडलेली शंभर कोटींहून अधिकची रक्कम व्यर्थ ठरली आहे.केंद्र शासनाच्या एकात्मिक विकास योजनेंतर्गत २००७ मध्ये चंद्रभागा धरणावरून वाढीव पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेची कामे पूर्ण करून २०११ पर्यंत नागरिकांना २४ तास पाणी मिळणे अपेक्षित होते. पण, यात विलंब झाला. ४०.४१ कोटींची योजना शंभर कोटींच्या घरात गेली. यात ३२.५ दलघमी क्षमतचे जलशुद्धीकरण केंद्र देवगाव येथे उभारले गेले. तेथून २२ किलोमीटर लांबीची शुद्ध पाण्याची गुरुत्ववाहिनी (पाइप लाइन) टाकली गेली. शहरात नव्याने पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. या टाक्यांवरून ९१.४ किमी लांबीची नवीन वितरण व्यवस्था अंथरली गेली. २५ किमी लांबीची जुनी पाइप लाइन बदलविली गेली. पण, नागरिकांना अपेक्षेनुसार पाणी उपलब्ध करून देण्यास योजना सक्षम ठरली नाही.दरम्यान, दहा वर्षांच्या आतच नवीन पाइप लाइन टाकली गेली. शहराच्या अनुषंगाने कार्यालयात उपलब्ध रेखाटने आणि प्रत्यक्ष पाइप लाइन याचा कुठे मेळच बसत नाही. या पाइप लाइनचे जॉइंट जोडले गेले नाहीत. काही भागात दुहेरी पाइप लाइन आली आहे. दोन्ही पाइपवर नळ कनेक्शन दिले गेले. मात्र, मीटर बसविले गेले नाहीत.अमृत योजनेतील पाइप लाइनवर मोठे लीकेज आहेत. शहरात रस्त्याच्या एका बाजूला पाणी, तर दुसऱ्या बाजूला पाण्यासाठी ओरड असल्याची स्थिती शहरात दिसत आहे.२० कोटी थकीतअचलपूर-परतवाडा या जुळ्या शहरांतील नळधारकांकडे पिण्याच्या पाण्याचे २० कोटी थकीत आहेत. यात साडेपंधरा कोटी अचलपूर शहरातील, तर साडेचार कोटी परतवाडा शहरातील नळधारकांकडे थकबाकी आहे. व्याजानुसार ही रक्कम दरवर्षी वाढत असून, थकीतदारांचा पाणीपुरवठा आजही सुरू आहे.नळधारकांकडे २० कोटी थकीत आहेत. व्याजमाफीचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित आहेत. अमृत योजनेतील पाइप जोडले गेलेली नाहीत.- मिलिंद वानखडेअभियंता, पाणी पुरवठा न.प. अचलपूरचौकशीची मागणीअमृत योजनेतील पाइप लाइनची चौकशी करण्याची मागणी काही नगरसेवकांसह नागरिकांनी केली आहे. संबंधित ठेकेदार काम सोडून गेल्याची महिती आहे. काम अपूर्ण असतानाही काम पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देण्याची लगबग सध्या सुरू आहे. चंद्रभागा धरणावरील पाणीपुरवठा योजनेचे आॅटोमायझेशन प्रस्तावित होते. ते दहा वर्षांपासून झालेले नाही.

टॅग्स :Socialसामाजिक