शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
2
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
3
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
4
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
5
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
6
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
7
कंडोम बनवणाऱ्या कंपनीची कमाल...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; गेल्या महिन्यातच बाजारात उतरली, दिला बंपर परतावा
8
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
9
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
10
माझी पत्नी रात्रीच्या वेळी बनते नागीण आणि..., भयभीत पतीने थेट DM यांनां केली अशी विनंती, प्रकरण काय  
11
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
12
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
13
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
14
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
15
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
16
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
17
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
18
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
19
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
20
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत

योजना तीच केवळ नावात बदल

By admin | Updated: March 1, 2015 00:22 IST

ग्रामीण भागात वीज जाण्याचे प्रमाण कमी व्हावे आणि कृषी पंपांसाठीही वीज मिळून शेतीकामे सुलभ व्हावीत यासाठी देशासह राज्यात नव्याने दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू करण्यात आली आहे.

अमरावती : ग्रामीण भागात वीज जाण्याचे प्रमाण कमी व्हावे आणि कृषी पंपांसाठीही वीज मिळून शेतीकामे सुलभ व्हावीत यासाठी देशासह राज्यात नव्याने दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना सुरू करण्यात आली आहे. यापूर्वी सुरू असलेल्या राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे नाव बदलवून केंद्र शासनाने दिनदयाल उपाध्याय योजना सुरू केली. मात्र योजनेतील उद्देश जुनेच ठेवण्यात आले आहेत. गुजरातमधील प्रतिसाद लक्षात घेता ही योजनेला संपूर्ण देशात व राज्यात राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिनदयाल उपाध्याय ग्रामीण ज्योती योजना केवळ ग्रामीण भागासाठीच आहे. त्यामध्ये शेती आणि बिगरशेती असे दोन वेगवेगळे फिडर बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे शेतीपंपांना वीज मिळेल. त्यामुळे मोटार जळण्याचे प्रमाणही कमी होणार आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागात प्रत्येक ठिकाणी मीटर बसविण्यात येणार असून उपकेंद्र फिडर्स, वितरण संहित्रे आणि ग्राहकांचे एनर्जी आॅडिटही करण्यात येणार आहेत. यापूर्वीही राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत फिडर वेगळे करण्याचे काम करण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून या योजनेसाठी ४३ हजार ३३ कोटी रूपयांची गुंतवणूक करण्याची गरज भासणार आहे. यामध्ये शासन ३३ हजार ४५३ कोटींची मदत करणार आहे. ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे सशक्तीकरण हा या योजनेचा चेहरा असून यामध्ये येणाऱ्या विविध घटकांसाठी आराखडा तयार करून तो केंद्र शासनाकडे पाठविला जाणार आहे. या योजनेकरिता ग्रामीण विद्युतीकरण समिती नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. ही समिती ऊर्जा सचिवांच्या अध्यक्षतेखाली काम करणार आहे. योजनांना मंजुरी देणे आणि त्याची पाहणी करणे, असे काम करावे लागणार आहेत. (प्रतिनिधी)