अमरावती : गर्ल्स हायस्कूल चौकामध्ये विस्तीर्ण जागा असल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी हा चौक उत्तम पर्याय ठरू शकतो, यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी तालुका, शहरस्तरावर समितींचे गठन करण्यात आले आहे. तालुक्यातील प्रत्येक गावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन या बैठकीत करण्यात आले. सोशलमिडिया शहर आणि काही गावखेड्यांपुरताच मर्यादित असल्याने गाव आणि तालुकास्तरावरील समन्वयकांनी २२ सप्टेंबरच्या मोर्चाबाबत महत्तम जनजागृती करावी, याखेरीज शहरातील प्रत्येक कॉलनी, वसाहतीमध्ये कॉर्नर बैठकी घेण्याचे या नियोजन बैठकीमध्ये ठरविण्यात आले. मोर्चाच्या मुख्यस्थळी काय सुरु आहे, याची संपूर्ण माहिती शेवटच्या टोकावरील मराठ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी चौकाचौकात लाउडस्पिकर लावण्याची सूचना करण्यात आली. यासोबतच मंगळवारी तिवसा, वलगाव आणि अन्य ठिकाणी पूर्वनियोजनासाठी बैठकी घेण्यात आल्यात. ‘कोपर्डीच्या चिमणीवर आभाळ कोसळलं ,अन मराठ्यांचं रक्त सळसळलं’.अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. (प्रतिनिधी)
गावापर्यंत पोहोचण्याचे नियोजन
By admin | Updated: September 14, 2016 00:15 IST